'सर, माझं साहिल वर जीवापाड प्रेम आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचंय'.
'सर तुम्ही प्लीज सांगा ना, माझं त्याच्याशी लग्न होईल का?'
'सर, प्लीज बघा ना, मी खूप प्रोब्लेम मध्ये आहे.'
वीणा, वय वर्ष २३. माझ्यासमोरच्या खुर्चीत ती बसली होती. फिकट करड्या रंगाचा थोडासा तंग पंजाबी ड्रेस तिच्या गोर्या वर्णाला साजेसा होता. नाजूक आणि बारीक अशी सोन्याची चेन तिच्या गळ्यात शोभून दिसत होती. उजव्या हाताच्या तर्जनीत टपोरा पुष्कराज सोन्याच्या अंगठीत तिने धारण केला होता. कुणी प्रेमात पडावे असं तीच रूप निश्चितच होत.तिच्या बोलण्याने मी व्यथित झालो. तिचा ओला स्वर अत्यंत आगतिक आणि हताश होता. काय बोलावं क्षणभर सुचतच नव्हत. सकाळपासून ४ पत्रिका पाहून झाल्या होत्या. विषय तेच विवाह, अफेअर, फसवणूक... विवाहबाह्य संबंध वगैरे. प्रेम प्रकरण हे कुंडलीत पंचम स्थानातून पाहतात. पंचम स्थान, पंचमातील ग्रह, ते ग्रह कोणत्या राशीत आहेत, कोणत्या नक्षत्रात, कोणत्या ग्रहाच्या युतीत तसेच दृष्टीत आहेत. कोणत्या ग्रहाबरोबर त्यांचे शुभ योग किंवा कुयोग झालेत, पंचम स्थानाचा अधिपती - पंचमेश, तो कुठल्या स्थानात आहे, त्याची राशिगत, नक्षत्रगत अवस्था, त्याचे इतर ग्रहांशी झालेले शुभयोग किंवा कुयोग, कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे ग्रहांचे कार्येशत्व इतका सगळा सखोल विचार किंवा विश्लेषण करावं लागतं. त्याच बरोबर दशास्वामी, अंतर्दशा स्वामी, त्यांचे कार्येशत्व. लग्न कुंडली, नवमांश कुंडली, चलित कुंडली, कस्प कुंडली असं बरंच काही पाहून मग फलादेश देता येतो. आपण कोणालातरी आवडतो हि भावनाच किती सुखद असते. नकळत्या वयात स्वप्न पाहतो आपण. त्या कोणाच्यातरी प्रेमात पडतो. प्रसंगी त्याला सर्वस्व बहाल करतो. प्रेम हि अतिशय उदात्त भावना आहे नाही. प्रेमात अतिशय ताकत असते म्हणतात. And they lived happily forever!!! कुठल्याही प्रेमकथेचा शेवट हा असा गोड व्हायला हवाना! पण तसं होत नाही आणि आपल्या अवतीभवती प्रेमाच्या अशा अनेक शोकांतिका निर्माण होतात होत राहतात. उभी आयुष्य उध्वस्त होतात. नियती सूड उगवते. प्रेमाचे रंग अधिक गडद, गहिरे होण्याऐवजी पुसट होतात. विस्कटून जातात. उदासीनतेच्या खोल गर्तेत तो किंवा ती रुतत जातात. प्रेमाचा प्रवास कधी सूडाचा प्रवास बनतो लक्षात येत नाही. प्रेमाचा शाश्वत वर कधी अभिशाप बनतो कळत नाही. का होत असं? एकमेकांच्या सुखासाठी झटणारे दोन जीव का विलग होतात? कुठे जाते त्या प्रेमाची ताकत? त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी ती, तिच्यासाठी आसुसलेला तो, कुठे हरवून जातात? का आटून जातो आयुष्यातला प्रेमाचा हा झरा? कुठे लुप्त होते प्रेमाची ती लुकलुकणारी लोभस चांदणी? विचारांचा आणि प्रश्नांचा हा भुंगा माझं मन कुरतडत चालला होता. प्रेमाची यशस्वी सांगता मंगल विवाहात व्हावी यासारखं भाग्य नाही, पण ते भाग्य सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. कदाचित अशा अशाश्वत बेगडी प्रेमाचं होऊ घातलेलं आणखी एक थडग मला पाहावं लागणार असं वाटलं.
'शांत हो वीणा , काय झालं?'
मी काळजीच्या सुरात विचारलं.
'सर, साहिलने लग्नाला नकार दिलाय.'
'का?'
'त्याचं असं मत आहे कि आम्ही लग्नानंतर सुखी संसार नाही करू शकणार.'
'तुझ्या घरी माहित आहे?'
'हो सर, माझ्या घरी माहित आहे. माझ्या घरून आमच्या लग्नाला परवानगी आहे.'
'त्याच्या घरी?'
'सर , त्याच्या घरूनही काही प्रोब्लेम नाही'.
'मग, त्याने कारण नाही सांगितलं?'
'सर, तो म्हणतो त्याला इतक्यात जबाबदारी नकोय.'
'हल्ली तर तो माझा फोनही घेत नाही.'
'मी तर त्याच्याशिवाय नाही राहू शकत. ' मी स्वतःला ..................................'
डोळ्यातल्या अश्रूंना वाट करून देत तिने सर्व कहाणी मला सांगितली.
'हे काय कारण झालं का? हा असा साक्षात्कार कसा झाला त्याला?'
शितावरून भाताची परीक्षा करायची तर चित्र सगळ स्पष्ट होते. प्रेमात पडण कठीण नाही पण ते निभावणं कठीण. हि म्हणजे साहिलच्या हलकट पणाची परिसीमा होती. लग्नाचं आमिष दाखवून, सुखी संसाराची स्वप्न दाखवून प्रेमाशी केलेली प्रतारणा होती. तिच्या निर्मळ भावनांना स्वतःच्या अनिर्बंध वासनेपायी चूड लावायचा हे कितपत बरोबर होत. काय गुन्हा होता वीणाचा ? तिने प्रेम केलं हा? विश्वास टाकला हा? आपलं सर्वस्व बहाल केलं हा? आवडलं तर वापरलं नाहीतर फेकून दिलं, साहिलचे आडाखे माझ्या लक्षात आलेच होते. तिरस्काराची एक सणक माझ्या डोक्यात गेली होती. वीणाचा त्याने पद्धतशीर वापर केला होता. कुंडलीतल्या पंचम स्थानाचा आणि पंचमेशाचा राहुशी असलेला संबंध बोलका होता. फसवणूक. शुद्ध फसवणूक. आता ह्या निष्पाप पोरीला मी कसं सांगू? साहिल सारख्या हरामखोरांना धडा शिकवण गरजेचं होत नाही का? तीच प्रेम उदात्त होत. निष्कलंक होत. त्याच्याबरोबरच्या भावी आयुष्याची गोड स्वप्न तिने रंगवली होती. एक परीपूर्ण सुखी संसार तिला करायचा होता. कुंडलीतल्या ग्रहांची साथ मात्र नव्हती. पुढे कुठल्या दिव्यातून तिला जावं लागणार आहे याची स्पष्ट जाणीव मला झालीच होती, पण तिला कसा सांगू? सर्वकाही स्पष्ट सांगून तिच्या भावनांच्या चिंधड्या उडवायच्या नव्हत्या. अतिशय खोलवर रुतलेला काटा हळुवारपणे काढायचं कसब हवं. भूकंपात सर्व उद्ध्वस्त झाल्यावर एक एक चीज वस्तू पुन्हा जमा करायची. शून्यातून पुन्हा सर्व उभं करायचं. आव्हान तर होतंच. तिच्या बोलण्यात आलेल्या आत्महत्येच्या विचारापासून तिला परावृत्त करणे हे महत्वाच. तशी ती समजूतदार होती. डोळ्यातल्या अश्रुंचे चेहऱ्यावर आलेल ओघळ त्यामुळे तिचा चेहरा कसनुसा झाला होता. आरक्त झालेलं तिचे पराभूत डोळे न बोलताच खूप काही सांगत होते.
'बाळा, जे काही घडलंय ते खूपच त्रासदायक आहे. यातून पूर्णपणे बाहेर पडायला मी तुला पूर्ण मदत करीन, पण तू माझं ऐकशील तरच तुला फायदा होईल. शास्त्रावर तुझा विश्वास आहे म्हणून तू माझ्याकडे आली आहेस. उपासना करशील?'
'हो सर, तुम्ही म्हणाल ते मी करेन.'
माझ बोलणे पूर्ण होताच तिने पटकन प्रतिसाद दिला ह्या गोष्टीच मला समाधान वाटल. मी बोलू लागलो.
'आयुष्य म्हटलं कि चढ उतार आले. यश अपयश आले. मान अपमान आले. कधी मनासारख्या गोष्टीमुळे हरखून जावं तर मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीनी नैराश्य याव. आनंदाच्या आणि वैफल्याच्या या भावना आणि विचार त्यांची आंदोलन होतच राहतात. कुणाला मातृवियोग होतो, कुणाला अपंगत्व येत, कुणाची दृष्टी जाते, कुणाची घोर फसवणूक होते. कुणी बेघर होतो, कुणी कर्जाच्या बोज्याखाली दबून जातो. आयष्य म्हणजे वैराण, उजाड रेताड जमीन होऊन जाते. कुणाला सासुरवास सहन करावा लागतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, असह्य मानसिक यातना, सदैव पाण्यात पाहणारी आपलीच माणसे. बलात्कारी नवरा. वाटत संपवून टाकाव सगळं. ठीक आहे तू त्याच्यावर प्रेम केलंस. त्याला सर्वस्व अर्पण केलंस, तुझ्या जागी कोणीही तरुणी असती तर तिने हेच केलं असत. त्यात काही चुक नाही. प्रेम हि देवाघरची अप्रतिम भावना आहे. परमेश्वराने दिलेला तो एक सुंदर वर आहे. एक तरल आणि सुखद अनुभूती. पूर्णपणे नैसर्गिक आणि स्वच्छ. त्यामुळे मी हे काय करून बसले हि गिल्ट पहिलं तुझ्या मनातून काढून टाक. दुसरी गोष्ट जे तू म्हणतेस, मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही, हे पण बरोबर. पण ज्याच्या मनात तुझ्याविषयी प्रेम नाही, ज्याने तुझा वापर केला, ज्याने तुझ्या भावनांचा प्रेमाचा अपमान केला. ज्याच्या मनात तुझ्याविषयी आदर नाही, सदिच्छा नाही अशा माणसाविषयी तुला अजून प्रेम वाटत हा तुझा आशावाद झाला. तो नक्कीच कौतुकास्पद आहे. आज न उद्या त्याला त्याच्या चुकांची जाणीव होईल आणि तो परत तुझ्याकडे येईल अशी आशा तुला वाटते आणि ते साहजिकच आहे कारण तू मनाने त्याच्यात गुंतली आहेस. पण अजून किती काळ तू अस सहन करत राहणार? अजून कितीकाळ तू उपेक्षेचे, अपमानाचे कडू घोट पचवत राहणार? रडूबाई होऊन तुला काही साध्य होणार नाही, उलट तुझ्या या पराभूत मानसिकतेचा तो आणखी गैरफायदा घेईल. तू नव्या युगाची नवी तरुणी आहेस. शिकलेली आहेस. स्वतःच्या पायावर उभी आहेस. तुला तुझ्या पालकांची मदत आहे. डोळे पुसून, पदर खोचून तुला परिस्थितीच्या छाताडावर खंबीरपणे आणि ठामपणे उभे राहावे लागेल. तू प्रसंगी प्रेमासाठी सर्वस्व अर्पण करणारी प्रेयसी आहेस पण तुला दुर्गा व्हाव लागेल. प्रेमाच्या नावाखाली स्वतःच्या वासनांचा नंगा नाच करणाऱ्या नराधमांना आणि त्या वृतींना ठेचून काढावं लागेल. समाजात अशा असंख्य तरुणी आहेत ज्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. हात पाय गाळून उपयोगाच नाही. प्रेमात पराकोटीची ताकद असते. जो चुकतोय त्याला वठणीवर आणायलाच हवं. प्रेमाने नाहीतर ठोकून. कठोर होणे गरजेच. धडक देण गरजेचं. नियती आपल्याला नेहमी पर्याय देत असते. आपण जो पर्याय निवडतो त्यावर पुढचे परिणाम आणि भविष्य अवलंबून असते. बर्याचदा आपण सोल्युशन ऐवजी प्रॉब्लेम वरच विचार करत बसतो. आता माझं कसं होणार? तो असा का वागतोय? आता मी काय करू? मला खूप टेन्शन येतंय. अशा घातकी विचारांवर आपणच पूर्णपणे मात करायला हवी. यु नीड टू बी ब्रेव्ह, ब्लंट, क्लीअर, स्ट्रेट आणि सडेतोड. मुळूमुळू रडत बसून काडीचा उपयोग नाही. या तो इस पार नही तो उस पार. आता शेवटचा धक्का द्यायलाच हवा. आता आपण एक असा विचार करूया, जरी तू खूप प्रयत्न करून त्याला शेवटी लग्नाला तयार केलंस आणि तुमचं लग्न झालं तरी जर त्याच तुझ्यावर प्रेमच नसेल, त्याला तुझ्याबरोबर संसार करायचाच नसेल तर तू त्याच्याबरोबर सुखी होशील का? both of you will nothing but drag your days. शेवटी काय निष्पन्न होईल? आगीतून फुफाट्यात अशी तुझी गत होईल. पूर्ण अर्थाने तू सुखी होशील अस तुला वाटत, नाही. आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार. you need to think practically. आता तुझी कुंडली काय सांगते ते पाहूया. माझ्या अभ्यासाप्रमाणे तुझ्या कुंडलीत यशस्वी प्रेम नाहीये. तुझ्यासमोर तुझं उभं आयुष्य आहे. जगायचं कोणासाठी? तर जन्मदात्या आई वडिलांसाठी, समाजासाठी, देशासाठी. दुखीतांसाठी, वंचितांसाठी, जे तुला विचारतात, जे तुझा विचार करतात. आणि आयुष्यात प्रेम हे नक्कीच असत आता नाही तर नंतर केव्हा तरी. शिवाय तुझी कुंडली सांगते, तुझ्या आयुष्यात विवाह आहे. म्हणजे जर तू Arrange Marriage केलंस तर निश्चितच सुखी होशील. निर्णय तुला घ्यायचा आहे. मदत तयार आहे. तुला एक पाउल पुढे टाकायचं. एक म्हणजे तुझ्या पालकांच्या विचाराने तू लग्न केलस तर तुला कायमच त्यांची मदत मिळत राहील. आता दुसरा विचार, त्याला धडा शिकवायचा तर तेही शक्य आहे. पण मला विचारशील तर झालं गेलं विसरून जा. आयुष्यात दुः स्वप्न पडतात. कठीण आहे पण अशक्य नाही. अनेकवेळा पडझड होते. पुन्हा पुन्हा उठायचं. नवी स्वप्न पहायची. नवीन आकाश, नवीन सूर्य, नवीन विचार. जे बरोबर आहेत त्यांना बरोबर घेऊ जे नाहीत त्यांना सोडून देऊ. प्रेम स्वतःवर करायचं. एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत सुद्धा तू घ्यावीस असं मला वाटत. जस्ट क्लोज धीज साहिल्स चाप्टर फॉर एव्हर and गो अहेड. A new promising life is awaiting for your!
डोळ्यातले अश्रू आणि गालावरचे ओघळ तिने केव्हाच पुसले होते. तिच्या चेहऱ्यावरचे बदलेले भाव न्याहाळत तिला विचारलं , 'काय विणाबाई - काय ठरलं?'
एक अनामिक आत्मविश्वास तिच्या डोळ्यात तरळला. खुर्चीतच ती ताठ बसली. हातातला कॉफीचा मग आणखी घट्ट धरत ती म्हणाली, 'आता त्याची ठासतेच!'
जाता जाता - टीव्हीवर न्यूज पाहिली, आजच सकाळी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला म्हणे!
आपला
आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२