मननात त्रायते इति मंत्र... शब्दांची विशिष्ठ मांडणी म्हणजे मंत्र. याविषयी एक संस्कृत वचन आहे. अमंत्रमक्षरम नास्ति, नास्ति मुलमनौशधम | अयोग्य पुरुषः नास्ति, योजक तत्र दुर्लभः || याचा अर्थ असा कि अमंत्र असे अक्षर नाही. औषधी नाही असे वनस्पतीचे मुळ नाही. अयोग्य असा कोणी पुरुष नाही. वास्तविक योग्य मंत्र, औषधी, गुणी माणूस परखणारा मात्र दुर्लभ आहे. म्हणून असे म्हणता येईल कि आपण जे जे म्हणून उच्चारतो ते प्रत्येक अक्षर, तो प्रत्येक शब्द हा मंत्रच असतो. मंत्र म्हणजे मुमुक्षु आणि साधकांचा जिव्हाळ्याचा विषय. अनेक जण आजही चाचपडत आहेत. ईश्वराच्या साधनेसाठी, वैयक्तिक उपासनेसाठी कोणती मंत्र साधना करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. मंत्र हा गुरुकडून घ्यावा असा प्रघात आहे. पण योग्य गुरु मिळणे हि गोष्ट आज दुरापास्त झाली आहे. जरी मिळाला तरी त्या व्यक्तीवर गुरुतुल्य श्रद्धा निर्माण होणे कठीण. पुन्हा अनेक तथा कथित बुवा, बाबा, अण्णा, बापू, दादा अशा लोकांनी भक्तीचा बाजार मांडला आहे ते वेगळच. मग अशा परिस्थितीत करायचं काय? याच उत्तर अगदी सोप्प आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी यावर अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. स्वतःची पात्रता वाढवा. शिष्य हाहि अधिकारीच असावा नाहीका! खरा सद्गुरू कोणाही सोम्यागोम्याला शिष्यत्व देत नाहीत, किंवा कोणाही अनधिकारी व्यक्तीला शिष्यत्व प्रदान करत नाहीत. येथे पाहिजेत जातीचे. शिष्याची परीक्षा होतेच. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध या ग्रंथात उत्तम शिष्याची लक्षण सांगितली आहेत. त्या तपशिला जाण्याचा सध्या आपल्या या लेखाचा विषय नाही पण साधना, उपासना, धार्मिकता याविषयी सध्या जो प्रचंड गोंधळ मनात झाला आहे त्याच निराकरण करणे गरजेचे वाटते. साधना मार्गातही अनेक मत मतांतरे आहेत. साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेत कोणत्या देवतेची उपासना करावी या संबंधी साधकाच्या मनात संभ्रम असतो. मुळात आपल्याला नेमके काय हवे हेच कळत नसते. तत्कालीन सुखाची प्राप्ती व्हावी. मनोकामना पूर्ण व्हावी. संसारिक अडचणींचे निवारण व्हावे यासाठी उपासना किंवा भक्तीचा मार्ग सुरुवातीला अनुसरला जातो. पण साधनेचे, भक्तीचे, उपासनेचे अंतिम ध्येय हे 'परमात्म प्राप्ती' असावे हि जाण कालांतराने येते. अशाच या साधनेच्या सुरुवातीच्या अवस्थेत उपासनेचे विविध मार्ग सुचवणारे अनेक जण भेटतात त्यातून मग कोणी कृष्ण भक्त आहे. कोणी राम भक्त. कोणी हनुमान उपासक आहे तर कोणी दत्त भक्तीत लीन. कोणी गणपती बाप्पा मोरया म्हणणारे तर कोणी शिव भक्त. पण बरेच जण असेही आहेत जे सोमवारी शिव भक्तीत रममाण असतात तर मंगळवारी श्री गणेशच्या मंदिरात रांगा लावतात. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, हरिहर, शैव, महानुभाव, नाना संप्रदाय आणि नाना मार्ग. सामान्य माणसाचा गोंधळ हा होणारच. वास्तविक हे सर्व संप्रदाय, पंथ, मठ, मंदिर, उपासना पद्धती या एकाच सूर्याची अनेक किरणे आहेत. या सर्वातून एकच ईश्वर - आई जगदंबा आदिशक्ती कार्य करते. म्हणून हे आवर्जून निवेदन करावेसे वाटते कि यापैकी एखादाच मार्ग निवडा पण एकदा निवडला कि धरसोड नको. आज ब्र्ह्मकुमारीज च्या प्रवचनाला जाऊन बसलो, परवा बैठकीला जाऊन आलो यामुळे निष्पन्न काहीच होणार नाही उलट अध्यात्मिक आणि मानसिक गोंधळ वाढेल. प.पु. मुंगळे महाराजांनी आपल्या एका ग्रंथात असे प्रतिपादन केले आहे कि साधकाच्या आयुष्यात एकच उपास्य दैवत असावे. एकच मंत्र. एकच ग्रंथ आणि एकच जप माळ. अक्कलकोट स्वामी महाराजही म्हणतात 'भजावे एका देवास'. भक्तिमार्ग हा त्यातल्या त्यात सोपा आहे, कारण त्यामुळे सामान्य प्रापंचिक माणसाला आपली विहित कर्तव्यकर्मे करीत असतानाच आराध्य दैवताच्या उपसानेद्वारे आपले अंतिम ध्येय साध्य करता येते. ज्ञानेश्वरीत माउली म्हणतात -
अगा जया जे विहित | ते ईश्वराचे मनोगत | ते करता निभ्रांत | सापडेची तो || ज्ञा. १८.९११ ||
विहित कर्मे निष्काम भावनेने करीत भक्तिमार्गाची वाटचाल केली तर भगवत कृपेची प्राप्ती निश्चित होते. पण हि वाटही सोपी नाही. माउली हरिपाठात म्हणतात,
पारियाचा रवा घेता भूमीवरी | यत्न परोपरी साधन तैसे|| हरी. १२.३||
जमिनीवर सांडलेला पारा जसा महत्प्रयासाने गोळा करता येतो तसे भगवंताची प्राप्ती होण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात. आयुष्यात रोज येणाऱ्या अडचणी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांशी झगडत वाट काढावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात,
रात्रंदिन आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१ ॥ जिवाही अगोज पडती आघात । येऊनिया नित्य नित्य करि ॥२॥ तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळे । अवघीयांचे काळे केले तोंड ॥
म्हणून असे म्हणता येईल कि अध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग म्हणजे नामस्मरण. भगवान पूर्ण ब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण भक्तांसाठी महामंत्र म्हणजे - ' श्री स्वामी समर्थ'
लेखाच्या सुरवातीला जो उल्लेख आला आहे कि आपण जे बोलतो ते प्रत्येक अक्षर म्हणजे मंत्र, प्रत्येक शब्द म्हणजे मंत्र हे समजून सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. मंत्र जेव्हा पठण केला जातो त्यावेळी आपल्या कंठातल्या स्वर यंत्रातून एक विशिष्ठ ध्वनी निर्माण होऊन आपल्या मुखातून बाहेर पडतो. ध्वनीमुळे स्पंदन निर्माण होतात. या स्पंदनांमुळे आपल्या शरीरावर, सूक्ष्म शरीरावर, शरीरातील ग्रंथींवर सुपरिणाम होतो व अपेक्षित परिणाम साध्य होतो. जसे बाळाला शु येत नसेल तर आई तोंडाने श श श असा आवाज करते, त्याबरोबर बाळाला शु होते. खरेतर श हे अक्षरच इथे मंत्राचे काम करते. श हे बीजाक्षर आहे जे शरीरातील मूलाधार चक्राला उद्दिपीत करते. हे मूलाधार चक्र आपल्या शरीरात शु शी च्या जागी असते. आता समजा कोणी तुम्हाला शिवी दिली तर काय होईल? आपल्याला राग येईल. आपणही शिवीगाळ सुरु करू. प्रसंग विकोपालाहि जाऊ शकतो. याचा अर्थ विशिष्ठ शब्द व त्याचा अर्थ आपल्या मानस पिंडावर, शरीरावर, मनावर परिणाम करतो. शाळेत आपण सर्वच बाराखडी शिकलो. त्यात मुळाक्षरे आणि व्यंजनांचा आपण अभ्यास केला तीच मुळाक्षरे जसे अ आ इ, क ख, ग घ , प फ ब भ .. इत्यादी बीजाक्षरे आहेत. प्रत्येक अक्षराचे मंत्र शास्त्राच्या दृष्टीने विशेष असे महत्व आहे. बीज हा शब्दच अर्थपूर्ण आहे. एका बिजामधुनच विश्वाची उत्पत्ती होते. एक बीज पेरले कि कि ते जसे अनंत पटीने परतफेड करते म्हणून बीज मंत्राचे सामर्थ्य प्रचंड आहे. म्हणून मंत्रशास्त्राच्या आधारे 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा अर्थ आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ यामागील मंत्राचे विज्ञान जाणून घेऊया.
श्री स्वामी समर्थ या महामंत्रात अनेक बीजाक्षरे आहेत ती पुढील प्रमाणे. 'स + र + इ = श्री (इथे एक महत्वाचे सांगायचे आहे श्री चा उच्चार आपण अजाणतेपणी श+र+इ असा करतो. तो तसा करू नये.) स +व+आ+म+इ = स्वामी. स+म+र+थ=समर्थ, त्याच बरोबर अ आणि आ हि बीजाक्षरे देखील ह्यात समाविष्ट होतात.
अ - अनादी, अनंत, अविनाशी ईश्वरी तत्व ज्यात सामावले आहे ते बीजाक्षर म्हणजे अ. याची स्पंदने संरक्षक असतात. स्मरणशक्तीला चालना देणारी असतात. ज्ञान, बुद्धी, नवनिर्माणाची क्षमता वाढवणाऱ्या मज्जातन्तुना उद्दिप्तीत करतात. याच्या सतत उच्चारामुळे स्मरणशक्ती वाढते. नेतृत्व गुणांना चालना मिळते. मान, सन्मान, प्रतिष्ठा जपण्याकडे कल वाढतो. सर्वश्रेष्ठ मानला गेलेला मंत्र ओम याची सुरुवात अ पासूनच होते नाही का. आ - निर्मळ, निरागस प्रेम व्यक्त करण्याकरिता आ या व्यंजनाचा वापर होतो. आपण आपल्नाया जवळच्या मित्राला नाहीका, मित्रा - गड्या अशी हाक मारतो. पंकजचा पक्या, परेशचा परश्या हे त्या प्रेमभावनेतूनच होते. याच प्रेम भावनेला, ममत्व भावेनेला खतपाणी घालणारे बीजाक्षर म्हणजे आ. जीवाभावाचे मैत्र निर्माण करणारे, संरक्षक पालकत्वाची भावना निर्माण करणारे हे बीजाक्षर म्हणूनच आपल्या मराठी भाषेत वयाने वडील असणाऱ्या व्यक्तींना आपण मामा, काका, दादा इ संबोधन वापरतो. अ मधील बुद्धी ज्ञान आणि संरक्षण आ मध्ये जास्त वृद्धिंगत होते. शाश्वत आनंदाचे आगर म्हणजे आ हे बीजाक्षर. आणि म्हणूनच आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जिला आपण आई म्हणून हाक मारतो. त्याच आई यातले इ हे बीजाक्षर शक्ती निर्मितेचे कार्य करते. पण हि शक्ती अशी आहे कि जी प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नाही. इ ची स्पंदने आपल्या बुद्धी, स्मृती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती जागृत करणाऱ्या मेंदूतील केंद्रांना उद्दीपित करते. मेंदूच्या सर्व कार्यांना चालना देण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इ या बीजमंत्राच्या जपाचा प्रचंड फायदा होतो. इ हे बुद्धीबीज असल्याने बुद्धिदेवता, ज्ञान देवता, स्मृती देवता भगवती सरस्वती मातेचा बीजमंत्र 'ऐं' - अ+इ+म यामध्ये इ चा समावेश आहेच. दृढ इच्छा शक्ती विकसित करण्यासाठी इ ह्या बिजाक्षाराचा उपयोग होतो. आपण आता 'र' या बीज मंत्राचा विचार करूया. अग्नी तत्वाचे, तेज तत्वाचे कारक म्हणजे 'र' हे बीजाक्षर. पंच ज्ञानेन्द्रीयांपैकी दृष्टी या ज्ञानेंद्रियाची क्षमता वाढवणारे 'र' हे बीजाक्षर आहे. नेत्र विकारांवर 'र' ह्या बीजमंत्राचा सतत उच्चार उपकारक ठरतो. 'र' ह्या बिजाक्षरामुळे अध्यात्माची, तपाची, साधनेची ओढ निर्माण होते. सर्व पापांचे निराकरण होते. श्री राम, हरे राम हरे राम राम राम हरे हरे ... इ मंत्रांमध्ये 'र' बीजमंत्राचा झालेला वापर हेच दर्शवतो. र या बिजाक्षरापासून निर्माण झालेला 'रां' या मंत्रासंबंधी सुद्धा भगवान शिवाने देवी पार्वतीला हेच प्रतिपादन केले होते कि केवळ 'रां' या मंत्राच्या पठणामुळे संपूर्ण विष्णूसहस्त्र नाम स्तोत्राच्या पठणाचे फळ मिळते. साधनेचे तेज धारण करण्यासाठी 'र' ह्या बीज मंत्राचे पठण उपयुक्त ठरते. श्री स्वामी समर्थ महामंत्रात समाविष्ट असलेले आणखी एक बीजाक्षर म्हणजे 'व'. हे जल तत्वाचे कारक हे. साधनेसाठी, तपासाठी, कुठलेही कार्य करण्यासाठी मनोबल तर आवश्यक असतेच पण त्याच बरोबर त्या कामाप्रती निष्ठा हि महत्वाची. पराक्रमाला भावनेची साथ लाभणे महत्वाचे. आपल्यातली भावुकता वाढवण्याचे काम 'व' हे बीजाक्षर करते. स्वामींची पूजा अर्चना करताना भक्त बरेचदा सद्गदित होतात. डोळ्यातून अश्रुपात होतो. एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती येते त्याचे रहस्य म्हणजे 'व' हे बीजाक्षर. शरीरांतर्गत सप्त चक्रांपैकी अनाहत चक्र उद्दीपित होते. ह्रदय, पचनसंस्था, मूत्राशय, रक्त इ संबंधी विकार बरे होतात. शिवाय 'व' हे बीजाक्षर लक्ष्मी कारक, संपत्ती कारक, समृद्धीकारक आहे. 'व' बिजाक्षाराच्या सततच्या पठणामुळे वाचासिद्धी प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्राची सुरुवातच 'स' या बिजाक्षाराने होते. 'स' हे पृथ्वी तत्वाचे बीजाक्षर आहे. 'स' हे कामनापुर्तीचे बीजाक्षर आहे. सृजनाचे कारक आहे. 'स' ची स्पंदने हि तृप्तीची स्पंदने आहेत. समाधानाची स्पंदने आहेत. सकारात्मक आहेत. नाथ पंथ पुरस्कृत शबरी विद्येतील अनेक मंत्रात 'स' हे बीजाक्षर समाविष्ट झालेले आढळते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रात सुद्धा 'स' हे बीजाक्षर ३ वेळा येते, हे हि नसे थोडके. प्रातःकाली स्नान झाल्यावर नुसती स ची बाराखडी १६ वेळा म्हणावी असे वर्षभर तरी करावे, पहा अनुभव घ्या... मनःशांती, समाधान, समृद्धी जीवनात प्रवेश करती होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील शेवटचे बीजाक्षर म्हणजे 'थ'. पृथ्वी तत्वाचे हे बीजाक्षर सर्व शुद्धीकारक आहे. लक्ष्मी दायक आहे. कामवासना नियंत्रित करणारे, स्थिरत्व प्रदान करणारे आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील महत्वाच्या 'म' या बिजाक्षाराचा विचार करू. 'म' म्हणजे आकाश तत्व. 'म' म्हणजे अथांग. शांतता. तृप्तीची परिसीमा. प्रत्येक देवतेच्या मंत्रात शेवट नमः ने होतो. अध्यात्मिक प्रगती, सिद्धी, प्रतिष्ठा, साहित्य लेखन, अभिनय , गायन या क्षेत्रात उपयुक्त. कुंडलिनी जागृती, ध्यान धारणा, साधना स्तोत्रपाठ इ साठी उपयुक्त. मंत्र राज ओम सुद्धा शेवटी 'म'कारात लोप पावतो. 'म' हे तारक बीज असल्याची अनुभूती येते. अशाप्रकारे आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील प्रत्येक बिजाक्षराचे मंत्र विज्ञान जाणून घेतले, म्हणूनच श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करणाऱ्या साधकांच्या जीवनात प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगती होतेच होते. लौकिक जीवनाचे सोने करून पारमार्थिक जीवनाला स्वामींच्या कृपेचा परीस स्पर्श अनुभूत चारही पुरुषार्थ साध्य करत आयुष्याचे सार्थक करून देणारा हा महामंत्र समस्त स्वामी भक्तांनी अखंड पठन करत राहावा हि सदिच्छा व्यक्त करत लेखणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थार्पणमस्तू .
अ - अनादी, अनंत, अविनाशी ईश्वरी तत्व ज्यात सामावले आहे ते बीजाक्षर म्हणजे अ. याची स्पंदने संरक्षक असतात. स्मरणशक्तीला चालना देणारी असतात. ज्ञान, बुद्धी, नवनिर्माणाची क्षमता वाढवणाऱ्या मज्जातन्तुना उद्दिप्तीत करतात. याच्या सतत उच्चारामुळे स्मरणशक्ती वाढते. नेतृत्व गुणांना चालना मिळते. मान, सन्मान, प्रतिष्ठा जपण्याकडे कल वाढतो. सर्वश्रेष्ठ मानला गेलेला मंत्र ओम याची सुरुवात अ पासूनच होते नाही का. आ - निर्मळ, निरागस प्रेम व्यक्त करण्याकरिता आ या व्यंजनाचा वापर होतो. आपण आपल्नाया जवळच्या मित्राला नाहीका, मित्रा - गड्या अशी हाक मारतो. पंकजचा पक्या, परेशचा परश्या हे त्या प्रेमभावनेतूनच होते. याच प्रेम भावनेला, ममत्व भावेनेला खतपाणी घालणारे बीजाक्षर म्हणजे आ. जीवाभावाचे मैत्र निर्माण करणारे, संरक्षक पालकत्वाची भावना निर्माण करणारे हे बीजाक्षर म्हणूनच आपल्या मराठी भाषेत वयाने वडील असणाऱ्या व्यक्तींना आपण मामा, काका, दादा इ संबोधन वापरतो. अ मधील बुद्धी ज्ञान आणि संरक्षण आ मध्ये जास्त वृद्धिंगत होते. शाश्वत आनंदाचे आगर म्हणजे आ हे बीजाक्षर. आणि म्हणूनच आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जिला आपण आई म्हणून हाक मारतो. त्याच आई यातले इ हे बीजाक्षर शक्ती निर्मितेचे कार्य करते. पण हि शक्ती अशी आहे कि जी प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नाही. इ ची स्पंदने आपल्या बुद्धी, स्मृती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती जागृत करणाऱ्या मेंदूतील केंद्रांना उद्दीपित करते. मेंदूच्या सर्व कार्यांना चालना देण्यासाठी, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी इ या बीजमंत्राच्या जपाचा प्रचंड फायदा होतो. इ हे बुद्धीबीज असल्याने बुद्धिदेवता, ज्ञान देवता, स्मृती देवता भगवती सरस्वती मातेचा बीजमंत्र 'ऐं' - अ+इ+म यामध्ये इ चा समावेश आहेच. दृढ इच्छा शक्ती विकसित करण्यासाठी इ ह्या बिजाक्षाराचा उपयोग होतो. आपण आता 'र' या बीज मंत्राचा विचार करूया. अग्नी तत्वाचे, तेज तत्वाचे कारक म्हणजे 'र' हे बीजाक्षर. पंच ज्ञानेन्द्रीयांपैकी दृष्टी या ज्ञानेंद्रियाची क्षमता वाढवणारे 'र' हे बीजाक्षर आहे. नेत्र विकारांवर 'र' ह्या बीजमंत्राचा सतत उच्चार उपकारक ठरतो. 'र' ह्या बिजाक्षरामुळे अध्यात्माची, तपाची, साधनेची ओढ निर्माण होते. सर्व पापांचे निराकरण होते. श्री राम, हरे राम हरे राम राम राम हरे हरे ... इ मंत्रांमध्ये 'र' बीजमंत्राचा झालेला वापर हेच दर्शवतो. र या बिजाक्षरापासून निर्माण झालेला 'रां' या मंत्रासंबंधी सुद्धा भगवान शिवाने देवी पार्वतीला हेच प्रतिपादन केले होते कि केवळ 'रां' या मंत्राच्या पठणामुळे संपूर्ण विष्णूसहस्त्र नाम स्तोत्राच्या पठणाचे फळ मिळते. साधनेचे तेज धारण करण्यासाठी 'र' ह्या बीज मंत्राचे पठण उपयुक्त ठरते. श्री स्वामी समर्थ महामंत्रात समाविष्ट असलेले आणखी एक बीजाक्षर म्हणजे 'व'. हे जल तत्वाचे कारक हे. साधनेसाठी, तपासाठी, कुठलेही कार्य करण्यासाठी मनोबल तर आवश्यक असतेच पण त्याच बरोबर त्या कामाप्रती निष्ठा हि महत्वाची. पराक्रमाला भावनेची साथ लाभणे महत्वाचे. आपल्यातली भावुकता वाढवण्याचे काम 'व' हे बीजाक्षर करते. स्वामींची पूजा अर्चना करताना भक्त बरेचदा सद्गदित होतात. डोळ्यातून अश्रुपात होतो. एक वेगळीच अध्यात्मिक अनुभूती येते त्याचे रहस्य म्हणजे 'व' हे बीजाक्षर. शरीरांतर्गत सप्त चक्रांपैकी अनाहत चक्र उद्दीपित होते. ह्रदय, पचनसंस्था, मूत्राशय, रक्त इ संबंधी विकार बरे होतात. शिवाय 'व' हे बीजाक्षर लक्ष्मी कारक, संपत्ती कारक, समृद्धीकारक आहे. 'व' बिजाक्षाराच्या सततच्या पठणामुळे वाचासिद्धी प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्राची सुरुवातच 'स' या बिजाक्षाराने होते. 'स' हे पृथ्वी तत्वाचे बीजाक्षर आहे. 'स' हे कामनापुर्तीचे बीजाक्षर आहे. सृजनाचे कारक आहे. 'स' ची स्पंदने हि तृप्तीची स्पंदने आहेत. समाधानाची स्पंदने आहेत. सकारात्मक आहेत. नाथ पंथ पुरस्कृत शबरी विद्येतील अनेक मंत्रात 'स' हे बीजाक्षर समाविष्ट झालेले आढळते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रात सुद्धा 'स' हे बीजाक्षर ३ वेळा येते, हे हि नसे थोडके. प्रातःकाली स्नान झाल्यावर नुसती स ची बाराखडी १६ वेळा म्हणावी असे वर्षभर तरी करावे, पहा अनुभव घ्या... मनःशांती, समाधान, समृद्धी जीवनात प्रवेश करती होते. श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील शेवटचे बीजाक्षर म्हणजे 'थ'. पृथ्वी तत्वाचे हे बीजाक्षर सर्व शुद्धीकारक आहे. लक्ष्मी दायक आहे. कामवासना नियंत्रित करणारे, स्थिरत्व प्रदान करणारे आहे. आता आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील महत्वाच्या 'म' या बिजाक्षाराचा विचार करू. 'म' म्हणजे आकाश तत्व. 'म' म्हणजे अथांग. शांतता. तृप्तीची परिसीमा. प्रत्येक देवतेच्या मंत्रात शेवट नमः ने होतो. अध्यात्मिक प्रगती, सिद्धी, प्रतिष्ठा, साहित्य लेखन, अभिनय , गायन या क्षेत्रात उपयुक्त. कुंडलिनी जागृती, ध्यान धारणा, साधना स्तोत्रपाठ इ साठी उपयुक्त. मंत्र राज ओम सुद्धा शेवटी 'म'कारात लोप पावतो. 'म' हे तारक बीज असल्याची अनुभूती येते. अशाप्रकारे आपण श्री स्वामी समर्थ या महामंत्रातील प्रत्येक बिजाक्षराचे मंत्र विज्ञान जाणून घेतले, म्हणूनच श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करणाऱ्या साधकांच्या जीवनात प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगती होतेच होते. लौकिक जीवनाचे सोने करून पारमार्थिक जीवनाला स्वामींच्या कृपेचा परीस स्पर्श अनुभूत चारही पुरुषार्थ साध्य करत आयुष्याचे सार्थक करून देणारा हा महामंत्र समस्त स्वामी भक्तांनी अखंड पठन करत राहावा हि सदिच्छा व्यक्त करत लेखणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थार्पणमस्तू .