साधनारत साधकाची अत्यंत उन्नत अवस्था असते साक्षीभावात राहणे. सहज सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर आपले विचार आणि कृती (जे आपल्याला आपले वाटतात), आपले अनुभव, अनुभूती ह्या सर्वाकडे तटस्थ त्रयस्थ दृष्टीने पाहणे. स्वतःच्या देहाकडे आणि जीवनाकडे वेगळे पणाने पाहणे म्हणजे साक्षी भाव अशी व्याख्या पुज्य बाबा बेलसरे ह्यांनी केली आहे. एक अभ्यास आहे. साधना पथावरील प्रगतीचे काही टप्पे आहेत. हा त्या पैकी एक. समजण्यासाठी थोडे अवघड आहे तरी इथे लिहितो. साधनारत असताना आपल्या उपास्य दैवाताशी जेव्हा साधक एकरूप होतो तेव्हा त्याला साक्षीभावाचा अनुभव आपोआप येतो. स्वामी रामतीर्थ ह्यांचे उदाहरण घेऊया. त्यांना जेव्हा भूक लागायची तेव्हा ते म्हणायचे रामाला भूक लागली. तहान लागली तर म्हणायचे रामाला तहान लागली. बाहेर जायचे असले कि रामाला आज फिरायला जायचे आहे. थंडी असली कि, काल खूप मजा आली राम थंडीने अगदी कुडकुडत होता. कोणी काही अपमानास्पद बोलले तर म्हणायचे आज रामाचा अपमान झाला. व्याकरणाच्या भाषेत सांगायचे तर ते सतत तृतीय पुरुषात बोलायचे. त्यांचा एक नवीन शिष्य गोंधळून गेला. त्याने स्वामी रामतीर्थांना विचारले. असे का? ते म्हणाले. "मी आणि माझे शरीर वेगळे आहोत. " "भूक, तहान, इच्छा वगैरे शरीराच्या आहेत."
साधनेच्या ह्या प्रवासात साधकाचे शरीराचे आणि त्याच्याशी संबंधित अथवा संलग्न गोष्टींचे ममत्व रहात नाही. तो विरक्त होतो. एका उपास्य दैवता शिवाय त्याला कशाशीही कर्तव्य रहात नाही. स्वामी रामतीर्थांची अवस्था अशीच होती.
ह्या साक्षी भावाची काय आवश्यकता आहे? कारण साक्षी भावाचा कर्माशी घनिष्ट संबंध आहे. आपण सतत काहीना काहीतरी कर्म करत असतो. एका कर्मातून दुसरे कर्म निर्माण होते. काहीही न करता स्वस्थ राहणे हे देखील कर्मच. कारण कर्मावाचून ह्या जगात जीवाची सुटका नाही. अनैच्छिक कर्म सुद्धा असतातचकी उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या नकळत होणारे पचन, रक्ताभिसरण, पापण्याची हालचाल. तर हि कर्माची साखळी निर्माण होते त्यामुळेच जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्म भोग भोगण्यासाठी. कर्म मग ते चांगले असो कि वाईट. पुनर्जन्माचे कारण बनते. भगवान श्री कृष्णांनी गीतेमध्ये ह्यासंबधी भाष्य केले आहेच.

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते॥५- १२॥
ह्याचा अर्थ आता सांगतो.
आपण काहीतरी काम करतो त्यापासून काही तरी आपल्याला साध्य करायचे असते. जे साध्य करायचे ते कर्मफल. पण साधक जर कर्म फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत असेल तर त्याला कर्म योग प्राप्त होतो. थोडक्यात परा शांती. मोक्ष. किव्वा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर साधनेची सफलता. मुक्ती. त्याउलट जर साधकाने कर्म फळाची अपेक्षा ठेवली तर? तर तो त्या कर्माशी व कर्म फलाशी बांधला जातो. त्यातून दुसरे कर्म जन्म घेते आणि मग पुनरपि जननम. पुनरपि मरणं. कारण क्रम फळ मिळणे न मिळणे हे जीवाच्या हातात नसते.म्हणून कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याकरिता साधकाला साक्षीभावाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. ह्याला आणखी एक उपाय आहे. संपूर्ण शरणागती. जे काही कराल ते तुमच्या उपास्य दैवताला अर्पण करा. तुमच्या प्रत्येक कृतीला तुमच्या उपास्य दैवताचे अधिष्ठान असू द्या. परम पुज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात ना - राम हा कर्ता. भावना अशी असू द्या कि आयुष्यात जे काही चांगले आहे ती त्याची (रामाची) इच्छा. जे काही वाईट आहे ती त्याची (रामाची) इच्छा. त्याने ठेवले तसे राहावे. त्याने जे दाखवले ते पाहावे. त्याने जे ऐकवले ते ऐकावे. अशाप्रकारे आपोआप एक समज निर्माण होते. जे रामाला आवडणार नाही ते तुम्ही कसे कराल? जे तुम्हाला रामापासून दूर नेईल त्याचा तुम्ही अंगीकार कराल काय? अशाने मग कर्म आपोआप सुधारतील. साक्षी भाव हा आहे सोडून देण्याचा मंत्र. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण निरनिराळी कामे करतो. करावी लागतात त्यांच्या फळ स्वरूप आपल्याला सुख, दुःख, मान, अपमान, अशा, निराशा, यश, अपयश, राग, द्वेष, मोह इत्यादी वृत्तींचा सामना करावा लागतो. ह्या सर्वातून स्थिर होण्यासाठी आहे साक्षीभाव. हाच सोडून देण्याचा मंत्र आपणास मुक्तीचा आनंद देऊ शकतो. कुठल्याही पाशात ना राहता.
ह्याचा अभ्यास करायलाच हवा. कठीण आहे. अशक्य नक्कीच नाही. तूर्तास आपली राजा घेतो. आणखी बऱ्याच अध्यात्मिक गुणांची चर्चा करूया. तो पर्यंत.. श्री राम राम राम | श्री राम राम राम | श्री राम राम राम |
टीप: ह्या संबंधी तुमचे काही प्रश्न असल्यास कृपया नक्की विचारा. सूचना असल्यास स्वागतच आहे. अगदी टीका देखील करू शकता. धन्यवाद.
साधनेच्या ह्या प्रवासात साधकाचे शरीराचे आणि त्याच्याशी संबंधित अथवा संलग्न गोष्टींचे ममत्व रहात नाही. तो विरक्त होतो. एका उपास्य दैवता शिवाय त्याला कशाशीही कर्तव्य रहात नाही. स्वामी रामतीर्थांची अवस्था अशीच होती.
ह्या साक्षी भावाची काय आवश्यकता आहे? कारण साक्षी भावाचा कर्माशी घनिष्ट संबंध आहे. आपण सतत काहीना काहीतरी कर्म करत असतो. एका कर्मातून दुसरे कर्म निर्माण होते. काहीही न करता स्वस्थ राहणे हे देखील कर्मच. कारण कर्मावाचून ह्या जगात जीवाची सुटका नाही. अनैच्छिक कर्म सुद्धा असतातचकी उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या नकळत होणारे पचन, रक्ताभिसरण, पापण्याची हालचाल. तर हि कर्माची साखळी निर्माण होते त्यामुळेच जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्म भोग भोगण्यासाठी. कर्म मग ते चांगले असो कि वाईट. पुनर्जन्माचे कारण बनते. भगवान श्री कृष्णांनी गीतेमध्ये ह्यासंबधी भाष्य केले आहेच.

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते॥५- १२॥
ह्याचा अर्थ आता सांगतो.
आपण काहीतरी काम करतो त्यापासून काही तरी आपल्याला साध्य करायचे असते. जे साध्य करायचे ते कर्मफल. पण साधक जर कर्म फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत असेल तर त्याला कर्म योग प्राप्त होतो. थोडक्यात परा शांती. मोक्ष. किव्वा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर साधनेची सफलता. मुक्ती. त्याउलट जर साधकाने कर्म फळाची अपेक्षा ठेवली तर? तर तो त्या कर्माशी व कर्म फलाशी बांधला जातो. त्यातून दुसरे कर्म जन्म घेते आणि मग पुनरपि जननम. पुनरपि मरणं. कारण क्रम फळ मिळणे न मिळणे हे जीवाच्या हातात नसते.म्हणून कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याकरिता साधकाला साक्षीभावाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. ह्याला आणखी एक उपाय आहे. संपूर्ण शरणागती. जे काही कराल ते तुमच्या उपास्य दैवताला अर्पण करा. तुमच्या प्रत्येक कृतीला तुमच्या उपास्य दैवताचे अधिष्ठान असू द्या. परम पुज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात ना - राम हा कर्ता. भावना अशी असू द्या कि आयुष्यात जे काही चांगले आहे ती त्याची (रामाची) इच्छा. जे काही वाईट आहे ती त्याची (रामाची) इच्छा. त्याने ठेवले तसे राहावे. त्याने जे दाखवले ते पाहावे. त्याने जे ऐकवले ते ऐकावे. अशाप्रकारे आपोआप एक समज निर्माण होते. जे रामाला आवडणार नाही ते तुम्ही कसे कराल? जे तुम्हाला रामापासून दूर नेईल त्याचा तुम्ही अंगीकार कराल काय? अशाने मग कर्म आपोआप सुधारतील. साक्षी भाव हा आहे सोडून देण्याचा मंत्र. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण निरनिराळी कामे करतो. करावी लागतात त्यांच्या फळ स्वरूप आपल्याला सुख, दुःख, मान, अपमान, अशा, निराशा, यश, अपयश, राग, द्वेष, मोह इत्यादी वृत्तींचा सामना करावा लागतो. ह्या सर्वातून स्थिर होण्यासाठी आहे साक्षीभाव. हाच सोडून देण्याचा मंत्र आपणास मुक्तीचा आनंद देऊ शकतो. कुठल्याही पाशात ना राहता.
ह्याचा अभ्यास करायलाच हवा. कठीण आहे. अशक्य नक्कीच नाही. तूर्तास आपली राजा घेतो. आणखी बऱ्याच अध्यात्मिक गुणांची चर्चा करूया. तो पर्यंत.. श्री राम राम राम | श्री राम राम राम | श्री राम राम राम |
टीप: ह्या संबंधी तुमचे काही प्रश्न असल्यास कृपया नक्की विचारा. सूचना असल्यास स्वागतच आहे. अगदी टीका देखील करू शकता. धन्यवाद.