पितृदोष.
पितृदोष निवारणार्थ नारायण नागबली हा काम्य श्राद्ध विद्धि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच करावा.
हा विधी विधी विवाहितांना व अविवाहितांना हि करता येतो. कुटुंबातील विवाह, मुंज अथवा मृत्यू ह्यानंतर वर्षभर हा विधी करू नये असा शास्त्र संकेत आहे. पण अयन अथवा संवत्सर बदलल्यावर करता येतो. आई वडील हयात असतानाही हा विधी करती येतो. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्या पर्यंत करता येतो. पौष मास, अधिक मास, क्षय मास गुरु शुक्र अस्त ह्याचा विचार करू नये. रविवार, सोमवार, गुरुवार हे वार, अश्विन, पुष्य, स्वाती, हस्त, श्रवण हि नक्षत्रे उत्तम. आश्लेषा, मृग, आर्द्रा आणि मूळ हि नक्षत्रे सुद्धा चालू शकतात. धनिष्ट पंचक, त्रिपाद नक्षत्रे अशुभ. भद्रा, वैधृती, क्षय व वृद्धी तिथी वर्ज.
हा विधी केल्यानंतर सरळ आपल्या घरी यावे. कुठेही तीर्थक्षेत्री, नातेवाईकाकडे, मित्र मंडळी कडे जाऊ नये. कोणाकडे काहीही खाऊ नये. पितरांच्या सणवारांना दान धर्म व अन्नदान करावे. अगदी २४ तासात मानसिक अवस्थेत शुभ फरक पडतो. ऐहिक अध्यात्मिक जीवनात अडचणींचे निवारण होते. धंद्यात, नोकरीतील अडचणींचे निवारण होते. अडलेली कामे मार्गी लागतात, शत्रू पिडा परिहार होतो, उदार निर्वाहाच्या साधन सुविधेत अनुकुलता येते, घरात बरकत व पुरवठा राहतो. नात्यागोत्याचे संबंध सुधारतात. तापत पण कमी होतो. आंतरजातीय विवाह टळतात . गर्भपाताचे प्रसंग टळतात , मुलांचे आयुष्मान व आरोग्य सुधारते. विवाह अपेक्षेपेक्षाही लवकर व सुस्थळी कमी खर्चात होऊन जातो. सबब आपली कुंडली तज्ञ ज्योतीर्विदाला दाखवून पितृ दोषाचे निदान करून घ्यावे व आवश्यक ती उपाययोजना लवकरात लवकर करावी.
आपल्या हिंदू धर्मात श्राद्ध हा विधी सांगितला आहे. आपल्या स्वर्गवासी म्हणजे मृत नातेवाईकांचे श्राद्ध केले पाहिजे अशी धर्माज्ञा आहे. काही जण हि बाब टिंगल म्हणून उडवून लावतात. आपल्या पितरांना आणि मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत हविष्य युक्त पिंड प्रदान कर्म करणे याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धामध्ये समंत्र पिंडदान आणि सज्जनास भोजन हि मुख्य कर्मे असतात. जे लोक नियमित श्राद्धादी कर्मे करतात, त्यांना पितरांच्या संतुष्टीमुळे आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, संसारसुख, आरोग्य, सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. पितरांच्या तृप्तीमुळे ऐहिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादा शिवाय अध्यात्म प्रगती आणि इष्ट दैवताच्या कृपा प्राप्ती मध्ये हि अडथळे येतात. प्रथम पितरांचा आशीर्वाद नंतर कुलदैवत, कुलस्वामिनी मग इष्ट देवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात ऐहिक व पारलौकिक सुख देण्यास मूळ पितरच कारणीभूत असतात.
श्राद्धाचे एकूण ५ प्रकार आहेत. और्ध्व दैविक, सावन्त्सरिक, एकद्दिष्ट, पार्वण, तीर्थश्राद्ध, नारायण नागबली, व त्रिपिंडी. और्ध्व दैविक हे मृताचे श्राद्ध आहे. व्यक्तीच्या अंत्येष्टी कर्मात ह्याचा समावेश होतो. सावन्त्सरिक हे मृत व्यक्तीच्या मृत तिथीला वर्षातून एकदा करावयाचे कर्म आहे. एकद्दिष्ट हे हि मृत व्यक्तीला उद्देशून केलेलं श्राद्ध कर्म आहे. पार्वण म्हणजेच महालय श्राद्ध यात तिन्ही पिढ्या एकावेळी येतात. हे भाद्रपद कृष्ण पक्षात केले जाते. म्हणजेच पितृ पंधरवड्यात त्या त्या तिथीला किंवा सर्व पितरी अमावास्येला केले जाते. प्रत्येक अमावास्येला हि श्रद्धा करतात त्याला हिरण्य श्राद्ध असे म्हणतात. तीन वर्षे श्रद्धाचा लोप झाला तर त्रिपिंडी श्राद्ध करणे आवश्यक होते.
शास्त्रोक्त विधीने अंत्येष्टी दशांत क्रिया न होणे. श्राद्धादी कर्माचा लोप होणे, मागील पिढीत कोणी पूर्वज कोणाचा शाप घेऊन मृत्यू पावणे, आकस्मिक, भाजून, खुना मुळे , बुडून, अपघातात मृत्यू पावणे इ कारणांनी पितृदोष निर्माण होतो. अशा मृतात्म्यांना सद्गतीसाठी पितर लोकात जाण्यास गती मिळत नाही. त्यांना चांगली गती मिळावी म्हणूनच त्यांच्या वंशजांनी इहलोकी श्राद्धादी कर्मे करावी असे शास्त्र सांगते. अन्यथा अशा प्रेतात्म्याच्या वंशजास त्यांचा खूप ऊपद्रव सुरु होतो. कृतज्ञतेने आणि श्रद्धेने त्यांच्या वंशजांनी मृत प्रेतात्म्याच्या सद्गतीसाठी प्रयत्न केले म्हणून पितर आनंदाने पितर लोकात जाताना आशीर्वाद देऊन जातात. त्या आशीर्वादाने वंशजांची सर्वार्थाने भरभराट होते हे सत्य आहे.
हल्ली प्रेतांना मंत्रविरहित असा भडाग्नी देण्याची पद्धत पडली आहे. अन्त्येष्टीच्या क्रियेत त्रुटी राहतात. वार्षिक व नैमित्तिक श्राद्धाचा लोप इ मुले ९० टक्के कुटुंब कमी अधिक प्रमाणात पितृ दोषाने पिडीत आहेत. प्रखर पितृ दोषामुळे पुढील अनेक प्रकारचे दु:ख लोकांना भोगावयास लागत आहे. नातेवाइकांशी संबंध अकारण दुरावतात, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला अकारण डोकेदुखी, उदासीनपणा, भयग्रस्तता, ह्रदयात धडधड, रात्री शांत झोप न येणे, झोपेत अचानक दडपून, दचकून जाग येणे, दु:स्वप्न पडणे, मृत व्यक्ती स्वप्नात येऊन जग येणे, असे प्रकार घडतात. संततीचे आरोग्य, शिक्षण, विवाह ह्या बाबतीत अडचणी निर्माण होतात. मुलांची अभ्यासात प्रगती मंदावते. मुले हट्टी असतात. कुसंगती मुळे नुकसान होते. काही कुटुंबात पुत्र संततीच होत नाही. विवाहास विलंब होतो. मंदबुद्धी, अपंग, वेडसर संतती निपजते, मुलींचे कनिष्ट जातीत किंवा अंतर्धर्मिय विवाह होणे, मुली पळून जाणे, मुलीना विलंबाने मासिक पाळी येणे. घरात सारखे क्षुल्लक कारणावरून भांडणे होणे. रोज घरात चीड चीड , कटकट अस्वस्थता, उदासीनता राहणे, उत्पन्नात अकारण घट, धंदा व्यवसायात नुकसान, कर्जबाजारीपण, डॉक्टरला निदान न होणारे आजार, घरात करणी, भानामती, पिशाच्च बाधा संचार याचा त्रास, कशातच बरकत नसणे, पुरवठा कमी पडणे, व्यसनाधीनता, धार्मिक विधी न होणे, घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंगात कनिष्ट देवता, प्रेतात्मा याचा संचार इ पिडा पितृदोष असल्यामुळे भोगावी लागते.
प्रखर पितृ दोषामुळे अनेक शाप सूचक, दुःस्वप्ने पडतात जसे नदी तलाव विहीर याचे पाणी दिसणे, पाण्यात बुडतोय असे भयग्रस्त अवस्थेत स्वतःला पाहणे, होडीतून कुठेतरी अज्ञात ठिकाणी जातोय असे दिसणे, भांडण दिसणे, कोणाशी तरी भांडतोय असे दिसणे, जेवण बनविणे चालू आहे, स्वतः जेवतोय, खोल दारीतून वर येतोय, नाग दिसणे, नागाला मारणे, रात्री घरात कोणी अदृश्य शक्ती वावरत आहे असे भास होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे असो.
जन्म लग्न अगर राशी कुंडलीत पंचमात अगर नवमात केतू, अष्टमात अगर व्ययस्थानात गुरु अगर पिडीत रवी चंद्र अथवा कुंडलीत कुठेही राहू पिडीत गुरु किंवा केतू युक्त रवी इत्यादी लक्षणे पितृदोष दर्शवितात.
पितृदोष निवारणार्थ नारायण नागबली हा काम्य श्राद्ध विद्धि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच करावा.
हा विधी विधी विवाहितांना व अविवाहितांना हि करता येतो. कुटुंबातील विवाह, मुंज अथवा मृत्यू ह्यानंतर वर्षभर हा विधी करू नये असा शास्त्र संकेत आहे. पण अयन अथवा संवत्सर बदलल्यावर करता येतो. आई वडील हयात असतानाही हा विधी करती येतो. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्या पर्यंत करता येतो. पौष मास, अधिक मास, क्षय मास गुरु शुक्र अस्त ह्याचा विचार करू नये. रविवार, सोमवार, गुरुवार हे वार, अश्विन, पुष्य, स्वाती, हस्त, श्रवण हि नक्षत्रे उत्तम. आश्लेषा, मृग, आर्द्रा आणि मूळ हि नक्षत्रे सुद्धा चालू शकतात. धनिष्ट पंचक, त्रिपाद नक्षत्रे अशुभ. भद्रा, वैधृती, क्षय व वृद्धी तिथी वर्ज.
हा विधी केल्यानंतर सरळ आपल्या घरी यावे. कुठेही तीर्थक्षेत्री, नातेवाईकाकडे, मित्र मंडळी कडे जाऊ नये. कोणाकडे काहीही खाऊ नये. पितरांच्या सणवारांना दान धर्म व अन्नदान करावे. अगदी २४ तासात मानसिक अवस्थेत शुभ फरक पडतो. ऐहिक अध्यात्मिक जीवनात अडचणींचे निवारण होते. धंद्यात, नोकरीतील अडचणींचे निवारण होते. अडलेली कामे मार्गी लागतात, शत्रू पिडा परिहार होतो, उदार निर्वाहाच्या साधन सुविधेत अनुकुलता येते, घरात बरकत व पुरवठा राहतो. नात्यागोत्याचे संबंध सुधारतात. तापत पण कमी होतो. आंतरजातीय विवाह टळतात . गर्भपाताचे प्रसंग टळतात , मुलांचे आयुष्मान व आरोग्य सुधारते. विवाह अपेक्षेपेक्षाही लवकर व सुस्थळी कमी खर्चात होऊन जातो. सबब आपली कुंडली तज्ञ ज्योतीर्विदाला दाखवून पितृ दोषाचे निदान करून घ्यावे व आवश्यक ती उपाययोजना लवकरात लवकर करावी.
शुभम भवतु ||
#_पितृदोष ,#_श्राद्ध
#_pitrudosh , #_sharaddha
#_पितृदोष ,#_श्राद्ध
#_pitrudosh , #_sharaddha
No comments:
Post a Comment