काय होतंय तेच कळत नाही. जिथे हात लाऊ त्याची माती होतेय. कुठ्ल्याही कामात अपयश. कर्जबाजारी पणा. जरा बँकेत चार पैसे साठत आहे असे वाटत होते, तर गेले आजारपणात. व्यवसायात अपयश. मुलगा व्यवस्थित शिकत नाही. वाढती व्यसनाधीनता. व्यवहारात फसवले जाणे. आयुष्य म्हणजे समस्या समस्या आणि समस्या. घरात सतत कटकटी. तरुण मुलाशी पटत नाही. काय सांगावे आणि किती सांगावे.
आपल्या ऋषीमुनींनी मानवजातीवर किती प्रचंड उपकार करून ठेवले आहेत. ज्योतिष शास्त्राच्या रूपाने. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला ज्योतिष शास्त्रात अचूक आणि उपकारक अशी सापडतात. आपल्या पूर्वजन्माच्या आणि ह्या जन्माच्या कर्मामुळे, संचित कर्म, प्रारब्ध ह्यामुळे आपल्याला अनेक सुख दुखाचा सामना करावा लागतो. पण पापाला प्रायश्चित्त असते तसे जिथे समस्या आहे तिथे उपाय हा असतोच.
जन्म लग्न कुंडली, नवमांश कुंडली, भाव चलित कुंडली, चालू महादशा आणि अंतर्दशा इ कुंडलीतील विविध घटकांचा सखोल अभ्यास करुन तज्ञ ज्योतिषी आपल्या समस्येच निराकरण करण्यासाठी काही खात्रीचे उपाय सुचवू शकतात. त्यांचा निश्चितच चांगल उपयोग होऊ शकतो. कुंडलीतील १२ स्थानातील ग्रहांचे अस्तित्व. ग्रहांची भावगत, नक्षत्रगत, राशिगत अवस्था, विविध योग, बलाबल इ गोष्टींमुळे आपल्या समस्या व त्यांची परिणामकारता यात व्यक्ती सापेक्ष फरक पडतो. शास्त्रात शुभ अशुभ असे ग्रह आहेत. ग्रह शत्रू राशीत असला कि त्याच्या फालत न्यूनता येते. उदा. शनी सिंह राशीत म्हणजे रवीच्या राशीत असल्यास त्यासंबंधी समस्या निर्माण होते. ग्रह काही राशीत नीच म्हणजे निर्बली असतात तर काही राशीत उच्च म्हणजेच बलवान असतात. ग्रह नीचेचा असेल तर तो ज्या भावात आहे त्याच्या कारक फालत समस्येला कारणीभूत होतो. उदा. पंचम स्थान हे संततीचे स्थान आहे. ह्या पंचमात म्हणजे पंचम स्थानात राहू असेल जो एक नंबरचा पाप ग्रह आहे तर संतती संबंधी फलात खूप त्रासदायक प्रकार घडतात. उदा. संतती न होणे, झाली तर दुर्धर आजार असणे, वेडसर असणे, परागंदा होणे, अल्पायु निपजणे इ. अशावेळी तज्ञ ज्योतिषी राहू संबंधी ग्रह शांतीचे उपाय सुचवतात ज्यामुळे समस्या काही प्रमाणात सुसह्य होय शकते. पंचमेश शनी दृष्ट असता, किंवा पाप कर्तरी योगात असता पंचमेश ग्रहाची शांती केल्याने जातकास आराम मिळू शकतो. जिथे ग्रहाचे रत्न वापरणे शक्य नसते तिथे त्या ग्रहाचे जंतर रत्न वापरावे व ग्रह शांती साठी काही उपाय करावेत. जे ग्रह जन्मलग्न कुंडलीत अशुभ स्थानी पडलेले असतात किंवा अशुभ युतीत, निर्बल राशीत असतात ते जातकास जीवनात खूप त्रासदायक ठरतात. अशा ग्रहांची शांती करणे आवश्यक असते. अशी बरीच उदाराहरण देता येतील पण विस्तार भयास्तव सध्या इथे देत नाही. पण पुढे आपण ग्रह शांतीचे सुलभ उपाय पाहूया.
जन्म लग्न कुंडलीत रवी आणि केतू जर पंचम, सप्तम किंवा अष्टमात असतील, मंगळ किंवा राहू धन, अष्टम किंवा भाग्य स्थानात असतील, चंद्र षष्ठ किंवा अष्टम स्थानात असेल, गुरु कन्या किंवा मकर राशीत असेल, शनी तूळ, मकर, कुंभ, धनु, मीन राशी व्यतिरिक्त इतर राशीत असेल, शुक्र ३,६,८,१२ स्थानात असेल तर ग्रहशांती करणे इष्ट ठरते.
उपाय हे सलग ४० दिवस करायचे आहेत. उपायात खंड पडू नये म्हणून दुधात भिजवलेले तांदूळ (अगदी थोडेसे) जवळ ठेवावेत. एखादा शुभ दिवस पाहून उपाय सुरु करावेत.
ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांनी लग्नाचे अगोदर हे उपाय करावेत.
मंगळ :
१) दुधात धुतलेले जव वाहत्या प्रवाहात मुठभर फेकावेत.
२) २-३ रेवड्या वाहत्या प्रहावत फेकाव्यात.
३) थोडा गुळ वाहत्या पाण्यात फेकावा.
४) दिवसा पाण्यात खलुन केशर बेंबी जवळील भागास लावावे.
५) विवाहाचे अगोदर दोन लाल पोवळी घेऊन एक वाहत्या प्रवाहात फेकून दुसरे जवळ ठेवणे (हा उपाय एक वेळच करावा )
गुरु:
१) विवाहाचे अगोदर मुलीने दोन सारख्या वजनाची हळकुंडे एक वाहत्या पाण्यात फेकावे आणि दुसरे कायमचे जवळ ठेवावे. हळकुंड ऐवजी केशरहि वापरता येईल.
२) ४० दिवस रोज दिवसा केशराचे ३-४ तुकडे जिभेवर ठेऊन खावेत.
चंद्र:
१) रात्री उशाला थोडे पाणी भांड्यात ठेऊन सकाळी ते बाभळीच्या झाडास घालणे.
२) दोन मोती किंवा दोन पुड्या तांदूळ घेऊन एक वाहत्या पाण्यात फेकावे व दुसरे जवळ ठेवावे.
रवी:
१) थोडा गुळ वाहत्या पाण्यात फेकावा.
राहू :
थोडे कोळसे रोज वाहत्या पाण्यात फेकावेत.
केतू :
कावळ्यांना पिवळ्या गाठ्या रोज नियमित खाऊ घालाव्यात.
शनी:
कावळ्यांना नियमित ताजे अन्न द्यावे.
बुध:
रंगीत कुत्र्यास ताजे अन्न खावयास घालावे.
वरील उपाय करताना त्या त्या ग्रहाचा पौराणिक मंत्र९ वेळा म्हणावा .
पुढच्या लेखात ग्रहांची रत्ने आणि जंतर यंत्रे ह्याविषयी सविस्तर लिहीन. तूर्तास ... श्री स्वामी समर्थ.
शुभम भवतु
No comments:
Post a Comment