Sunday, March 11, 2018

मला परीक्षेत यश मिळेल काय?

स्मार्ट फोनची रिंग वाजली, नंबर ओळखीचा होता. अनघा. तसा आज पर्यंत तिच्याशी मी बरेच वेळा बोललो आहे. ज्योतिष शास्त्रावर डोळस विश्वास असणाऱ्या व्यक्तींपैकी एक अशी अनघा. तिचा फोन घेणं आलच. पण काय करावे, रस्त्यावरच्या ट्राफिक मधून वाट काढत गाडी चालवणं म्हणजे एक दिव्यच. तरी देखील तिचा फोन घेतलाच. त्यातून शनिवार, रस्त्यावर तशी वाहनांची बरीच गर्दी होती. फोन ब्लूटूथ वर घेतल्याने गाडी चालवता चालवता तिच्याशी सहज बोलू शकणार होतो. Thanks to the technology. शक्य तितक्या शांत स्वरात मी हॅलो म्हणण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरच्या ट्रॅफिकने वैताग आणला होता. काही लोक किती धांदरट असतात, दिसतेय गाडी येतेय समोरून तरीही असे चालतील कि तीर्थरुपांनी अख्खा रस्ता विकत घेतला असावा. एव्हाना एक जण कडमडलाच. बघतात कुठे, चालतात कुठे... करकच्चून ब्रेक दाबला, आणि पुढचा अनर्थ टळला. बहुदा त्याचा बुध बिघडला असावा. आधीच शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार त्यातून हे ट्राफिक.
"हॅलो"?
"हॅलो सर, अनघा बोलतेय."
पलीकडचा अनघाचा परिचित आवाज. थोडा काळजीचा सूर. मीही माझा मूड बदलत माझ्या आवाजात शक्य तितका  उत्साह भरण्याचा प्रयत्न करत तिला अटेंड केलं.
"यस, आज कशी काय आठवण झाली माउली ? काय सेवा?"
समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना मनातून कम्फर्टेबल असली पाहिजे तरच ती तिची समस्या तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल. त्या व्यक्तीला कम्फर्टेबल वाटावं म्हणून ज्योतिषाला विशेष मेहनत घ्यावीच लागते. तुमच्या आवाजातून आणि तुमच्या बोलण्याच्या पद्धतीतून तुम्ही ते कमवू शकता.
"सर, एक प्रश्न आहे. मी एक परीक्षा दिली आहे जानेवारीत. आपण बोलू शकतो का?"
अनघाच्या प्रश्नाचा मला अंदाज आलाच होता. पण नाईलाजाने तिचा प्रस्न पाहून सांगणं मला त्यावेळी शक्य नव्हतं.
" डोन्ट व्हरी अनघा, आता Drive करतोय. २० एक मिनिटात घरी पोहोचेन मग बघितला प्रश्न तर चालेल ना?
" ओके सर, काहीच problem नाही. मी तासाभराने फोन करते."
अनघाला काही करून तिच्या प्रश्नच उत्तर हवच होत. पण जर तिचा प्रश्न मी आणखी तासाभराने देखील पहिला असता तरी रुलिंग मध्ये शनी येणारच हे माझ्या लक्षात आलं, मी ताबडतोब तिला विचारलं,
"अगं, आता तसा उशीर पण झालाय. आपण उद्या बोलूया का?"
माझं विचारणं भाग होत पण त्यातूनही मी अशी तयारी ठेवलीच होती कि तासाभराने जरी तिने आग्रह केला असता तरी मी प्रश्न पाहिला असता. कारण प्रश्न कुंडली मांडताना जातकाच्या मनात प्रश्नांची intensity महत्वाची. मी तिला तसं बोललोही, म्हटलं - " मॅडम, तसाहि आज शनिवार आहे, you know what I meant to say."
"नक्कीच सर. उद्या किती वाजता फोन करू?"
अनघा आता चांगलीच कम्फर्टेबल होती. उद्याची वेळ दिल्याने व्यवस्थित सविस्तर बोलता येणार होते. गुड नाईट सर म्हणत तिने फोन ठेवला. मला परीक्षेत यश मिळेल काय? असा तिचा प्रश्न असावा असा अंदाज मी बांधला. गाडी समोरून शाळकरी विद्यार्थ्यांचा मोठ्ठा घोळका रस्ता क्रॉस करता झाला होता. मलाही माझे परीक्षेचे दिवस आठवले.
दुसऱ्या दिवशी रविवार. बरोब्बर ११:३० वाजता अनघाचा फोन आला.
"हॅलो सर"
अनघाचा मूड आजही थोडा अपसेट वाटला.
"गुड मॉर्निंग अनघा."
"बोल, तुझ्या फोनची वाटच पाहत होतो."
समोरच्या व्यक्तीला importance देणेही खूप महत्वाचे असते. जातकाला विश्वास वाटला पाहिजे. आपल्या बोलण्यात अवाजवी चिंता नसावी. खूप पोक्तपणा नसावा. उगाच एखाद्या गोष्टीचा बाऊ करू नये. शांत, सहज आणि अत्यंत संयत बोलावं. अनघाने direct प्रश्नालाच हात घातला. \
" सर, मी जानेवारीत एक परीक्षा दिली आहे. पेपरही चांगले गेले आहेत, तरी रिझल्ट कसा असेल असं मनात येतंय. काय करू?"
मी शांतपणे तीच बोलणं ऐकून घेतलं.
" एव्हढच ना , तुझ्या प्रश्नाच उत्तर आपण प्रश्न कुंडली वरून बघूया. आत्ता ५-१० मिनिटात!"
जातकाला acknowledge करणं महत्वाचं.
" मला दिलियेल्या परीक्षेत यश मिळेल काय? असा प्रश्न मनात धरून १ ते २४९ मधला जो आकडा उत्स्फूर्तपणे देता येईल तो दे."
मीही अनघाला प्रश्नकुंडली करीत आकडा द्यायला सांगितला. कधी कधी जातकाच्या मनात बऱ्याच प्रश्नांची गर्दी असते. आपला प्रश्न, समस्या ज्योतिर्विदाला कशी सांगायची हे देखील समजत नाही. काहींना ते शब्दात व्यक्त करता येत नाही. म्हणून मी प्रश्नच फ्रेम केला आणि तिला त्याबद्दल मार्गदर्शन केले. नेहमीच्या सवयी प्रमाणे अनघाने श्री गणेशाचे ध्यान केले. स्वतःशी प्रश्न ३ वेळा रिपीट केला आणि ७ हा आकडा दिला. रविवार ११ मार्च २०१८ सकाळी ११. वा. ४७ मिनिटे वसई येथे अनघाचा प्रश्न घेतला. के पी नंबर #७. त्याप्रमाणे प्रश्नकुंडली मांडली. मेष लग्न होते. सर्व प्रथम लाभ स्थानाचा उप नक्षत्र स्वामी पाहिला जो गुरु होता. गुरु सप्तम स्थानात २६अंश ११ कला आणि ४२ विकला असा पण वक्री होता. गुरूच्या राशी नवमात आणि व्यय स्थानात होत्या. गुरुची लाभ, लग्न आणि तृतीय स्थानावर दृष्टी होती. गुरू स्वत:च्या स्थानापासून ५, ७, ९ ह्या स्थानाला बघत असतो म्हणजे त्या स्थानांवर व त्या स्थानातील ग्रहांवर गुरूची दृष्टी असते .गुरु कोणाच्याही युतीत नव्हता. कोणाच्याही दृष्टीत नव्हता. गुरु पुढील प्रमाणे कार्येश होत होता - ७,१२,९, १०. it was a good sign. गुरु स्वनक्षत्रात म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी रवी देखील ७,११,९,१०,१२ स्थानांचा कार्येश होत होता. त्यानंतर चतुर्थ स्थानाचा उप नक्षत्र स्वामी पाहिला तो लाभ स्थानाचा कार्येश होत होता. मी क्षणाचाही विलंब न लावता अनघाला म्हटलं, "कधी येतेस पेढे घेऊन?"
तिला माझा रोख कळलाच. तशी ती आहेच हुशार. प्रश्न कुंडलीचा दशा स्वामी पाहिला. शुक्र. शनीच्या नक्षत्रात. दोघेही लाभाचे कार्येश ह्याचा अर्थ सरळ होता. अनघाला परीक्षेत उत्तम यश मिळणार हे नक्की. आता माझेही डोळे तिच्या रिझल्ट वर लागले. पण त्यासाठी आम्हा दोघांना हि अजून २ महिने वाट पाहावी लागणार. म्हणतात ना अज्ञातात हि सुख असतं. अब इंतजार हि लिखा है भाग्य में, तो क्या गिला क्या शिकवा? फक्त एकच चिंता होती. गुरु वक्री होता . लाभाचा उप नक्षत्र स्वामी मार्गी असून मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असेल व ४,९,किंवा ११ ह्यापैकी स्थानाचा कार्येश असेल तर यश मिळते. तसेच चातुर्थाचा उप नक्षत्र स्वामी सुद्धा लाभ स्थानाचा कार्येश असावा. ह्या नियमाची प्रचिती काय येईल? कळेल लवकरच.

Saturday, March 10, 2018

ग्रहांची रत्ने व जंतर यंत्रे (भाग २)


साडेसाती असताना शनीचे जंतर यंत्र वापरावे. कुंडलीत मंगळ नीच राशीत असेल किंवा ८ व १२ स्थानी असेल तर मंगळाचे जंतर यंत्र वापरावे. ज्यावेळी एखादा ग्रह नीच राशीतअसेल निर्बली असेल किंवा कुंडलीत अशुभ स्थानात पडला असेल, अशुभ स्थानाचा स्वामी असेल अशावेळी त्या ग्रहाचे जंतर यंत्र वापरावे.
ज्या ग्रहाचे जंतर यंत्र वापरायचे त्या ग्रहाचे वारी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन त्या ग्रहाचे जंतर यंत्र भोजपत्रावर अष्ट गंधाने लिहून ते उजव्या हातात दिलेल्या संख्ये इतका त्याच दिवशी जप करावा. नंतर ते यंत्र धूप दाखवून ताईतात घालून पाकिटात ठेवावे.


रवी यंत्र : - रवी ग्रहाचे अशुभ फळात घट होऊन शुभ फळात वृद्धी होण्यासाठी रविचे यंत्र वापरता येते,  कुंडलीत रवी ग्रह बिघडला असता अनेक अशुभ फळे प्राप्त होतात जसे, पितृसुखात कमतरता, सतत अपमान आणि उपेक्षा वाट्याला येणे, सर्व साधारण अनारोग्य राहणे, आपल्या शब्दाला किंमत नसणे, करिअर मध्ये अडचणी, रवी ग्रह बिघडला असता कुंडलीतील इतर ग्रहांची अवस्था कितीही चांगली असली तरी एकंदर उर्जितावस्था येण्यास उशीर होतो. सतत चिंता ग्रस्त राहणे, शत्रू पिडा, नीटनेटकेपणाचा अभाव, सौंदर्य दृष्टी, तारतम्य, जबाबदारीची जाणीव इ गोष्टी अभावानेच आढळतात.. हाती घेतलेल्या कामात अपयश, विलंब, वरिष्ठांशी न पटणे, हृदयविकार, पाठीचे मणक्याचे आजार, रक्त विकार, हाडांची दुखणी इ आजार डोकं वर काढतात. अशा परिस्थितीत रवीचे यंत्र खूप निर्धोक आणि फायदेशीर ठरते. रवीच्या शुभ परिणामात वाढ होते जसे प्रतिकार शक्ती, कीर्ती, आरोग्य, ईश्वरभक्ती, सद्गुण, भरभराट, यश, प्रगती, प्रवास, भाग्य, पितृसुख इ.सदर यंत्र हे सोने, चांदी किंवा तांबे यापैकी धातूमध्ये बनवून घ्यावे आणि ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः ह्या मंत्राने अभिमंत्रित करावे. जप संख्या ७० माळा. 

चंद्र यंत्र :कुंडलीमध्ये चंद्र बिघडला असेल आणि चंद्राचे रत्न मोती वापरता येत नसेल अशावेळी खात्रीचा उपाय म्हणून चंद्राचे यंत्र वापरता येते. जसे कर्क लग्नास लग्नेश चंद्र अष्टमात, षष्ठात किंवा व्याव्यात असेल तर मोती वापरता येत नाही. त्यामुळे चंद्राच्या अशुभ परिणामात वाढच होईल म्हणून त्याला पर्याय म्हणजे चंद्र यंत्र. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक आहे. तो मातेचा कारक आहे. कुंडलीतील अशुभ स्थितीतील चंद्र मानसिक विकार निर्माण करतो. कितीही लौकिक सुख असले तरी काहीतरी न्यून राहतेच. मानसिक असमाधान राहते. सर्दी, पडसे, कफ, गळा व छातीचे विकार, दृष्टीदोष इ आजार होऊ शकतात. चंद्र राहू युती, चंद्र केतू ग्रहण योग, वृश्चिकेचा चंद्र, चंद्राचा पाप कर्तरी योग, अशुभ ग्रहाच्या दृष्टीत, अशुभ ग्रहाच्या प्रतियोगात चंद्राचे अशुभ फालत वाढ होते. ह्या व्यतिरिक्त चंद्राच्या शुभ फळात वाढ होण्यासाठी चंद्र यंत्र उपयुक्त ठरते. चंद्र यंत्र सिद्ध करण्याकरिता एखाद्या शुभ सोमवारी ॐ श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः ह्या मंत्राचा ११० माळा जप करत जलाभिषेक करावा.

मंगळ यंत्र : मंगळ दोष परीहारासाठी मंगळाचे यंत्र वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते. मंगळाच्या शुभ फळात वृद्धी होण्यासाठी मंगल यंत्राचा उपयोग होतो. कुंडलीत अशुभ मंगळ असल्यास मंगळाचे रत्न पोवळे वापरता येत नाही अशावेळी मंगल यंत्र वापरणे तितकेच प्रभावी ठरते. कुंडलीत प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि व्यय स्थानात मंगळ असल्यास अशुभ होतो. मंगळ हा कर्क राशीत नीचेचा होतो. तोही अशुभच. शुभ स्थितीतील मंगळामुळे जातकाला त्याच्या भावंडा पासून लाभ होतो. मित्रांशी चांगले संबंध राहतात. शतृपिडा असल्यास निवारण होते. मानसन्मान, प्रतिष्ठा ह्यात वृद्धी होते. मंगळ यंत्र सिद्ध करण्याकरिता शुभ मंगळवारी ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः या मंत्राचा १०० माळा जप करत जलाभिषेक करावा. 

इतर नव ग्रहांविषयी यंत्रांची सविस्तर माहिती पुढच्या भागात. तूर्तास शुभम भवतु.....