"हॅलो सर आहात का, मी चिंतामणी रानडे बोलतोय".
आवाजापेक्षा मला नाव ओळखीचं वाटलं.
"चिंतामणी, होय आहे घरी. संध्याकाळी ५ नंतर भेटू."
"सर, तुमचा पत्ता व्हाट्स अप करा प्लिज."
“शुअर! मी लोकेशन पण सेंड करतो.”
“आभारी आहे सर, मी येतो ५ वाजेपर्यंत.”
नुकतच फोनवर एक कन्सल्टेशन संपवलं होत. आणि आता हा फोन.
चिंतामणी रानडे. आवाज थोडा स्त्रैण वाटला. एक प्रकारचं आर्जव होत आवाजात. जगातला
मी शेवटचा ज्योतिषी उरलो असावा, अस श्री चिंतामणी साहेबांच्या बोलण्यावरून वाटलं.
अर्थात मला थोड्या गुदगुल्या झाल्याच. नुकत्याच संपवलेल्या कन्सल्टेशनचे नोटस घेतल्या
आणि व्हाट्स अप वर उपाय दिले. घडाळ्यात साडेचार वाजले होते. उन्ह आता बर्यापैकी कलली
होती. मस्त गरमागरम चहा हवासा वाटत होता. अशावेळी मदतीला येणारं हक्काचं माणूस
म्हणजे कन्यारत्न. मस्त पैकी चहापान चालूच होत आणि बेल वाजली. दरवाजा मीच उघडला.
दारात साधारण साडेपाच फूट उंचीचा इसम उभा होता. नखशीकांत गोरा. डोक्यावरचे विरळ
झालेच होते. डोळ्यावर चष्मा. चेहऱ्यावर हास्य. भाव असे कि सापडला! मीही चेहऱ्यावर
माझं ठेवणीतलं स्मित आणत म्हटलं , “नमस्कार चिंतामणी, या!”
आम्ही दोघेही समोरासमोर बसलो. मध्ये बराच वेळ गेला. माठातलं थंडगार पाणी एव्हाना
चिंतामणीनि संपवलं.
“बोला देवा”, मी म्हटलं.
पिशवीतून कुंडली काढत त्यानी ती माझ्या हातात दिली. कपाळाला लावत मी ती उघडली.
जन्म लग्न कुंडली, भाव चलित आणि नवमांश कुंडली नजरेखालून घालत मी विचारल, “तुमची जन्मवेळ अचूक आहे?”
“आहे ना, म्हणजे सकाळी ९:४२ कि ९:५२ हे निश्चित नाही.”
नाकावरचा चष्मा वर सरकवत चिंतामणी म्हणाले.
त्यांनी दिलेली कुंडली सकाळी ९:४२ या वेळेप्रमाणे बनवली होती. म्हणजे माझी
शंका रास्त होती.
Birth
rectification करणे गरजेचे होते.
मी त्यांना विचारलं, “ तुमचा काय प्रॉब्लेम आहे?”
“मला वाटत, करिअर विषयी काहीतरी समस्या असावी.”
अनुराधा नक्षत्र मला खुणावत होत. मला आठवल, एक ज्योतिर्विद पेपर मध्ये जाहिरात
देतात्त. आश्चर्य चकित व्हाल, तुमची समस्या तुम्ही न सांगता ओळखणार. स्वतः येऊन खात्री
करा. तर महाराजा त्याच असं आहे कि अनुराधा नक्षत्र असताना आलेला जातक बहुदा करिअर
किंवा आर्थिक समस्येवर सल्ला घेण्यासाठी आलेला असतो असा अनुभव आहे.
एव्हाना आश्चर्य चकित व्हायची वेळ चिंताग्रस्त चिंतामणी साहेबांवर आली होती.
चेहरा आणि डोळे बोलत होते. बसल्याजागी माझं फेस रीडिंग चालूच होत.
“गेली काही वर्ष बांधकाम क्षेत्रात काम करतोय.”
“पण सध्या मंदी आहे, पहिल्यासारखी परिस्थिती नाही. दुसरा कुठलातरी व्यवसाय
करावा म्हणतोय.”
चिंतामणी नि आपल्या चिंतेच गाठोड क्षणार्धात माझ्यासमोर उघड केलं.
“ठीक आहे, आपण आपल्या प्रश्नाच उत्तर प्रश्न कुंडली मांडून सोडवू”.
अर्थातच १ ते २४९ पैकी कुठलाही एक नंबर मी त्यांना मागितला.
“श्री गजाननाच ध्यान करा. प्रश्न स्वतःशी मनात ३ वेळा विचारा आणि नंबर द्या.”
चिंतामणी नि त्वरित श्री चिंतामणीचे ध्यान केले व सांगितल्याप्रमाणे २३ हा
नंबर दिला.
तारीख: १५ सप्टेंबर २०११. वेळ: १८:०३:२४ स्थळ: वसई. KP # २३.
मी कुंडलीचा अभ्यास करू लागलो.
प्रश्न: कुठला व्यवसाय करावा?
चिंतामणीना मी प्रश्न विचारला, “तुम्ही
तसा काही विचार केला आहे का? “
नारळाचा घाऊक व्यापार करावा असं
त्यांना वाटत होत.
प्रश्न कुंडलीला शनी महादशा व मंगळ
अंतर्दशा सुरु होती, महत्वाचं म्हणजे राहूची विदशा.
व्यवसायाचा विचार दशम स्थानावरून
करावा म्हणून मी दशम स्थानाचा उपनक्षत्रस्वामी पाहिला
दशमाचा उपनक्षत्रस्वामी बुध
शुक्राच्या नक्षत्रात सप्तमाचा व दशम स्थानाचा कार्येश होत नव्हता. तसेच तो चर
राशीत सुद्धा नव्हता. जर दशम भावाचा सब ७ किंवा १० व्या स्थानाचा कार्येश असून तो
चर राशीत असेल तर जातक स्वतःचा व्यवसाय करतो.
“तुम्ही सध्या नोकरी करताय?”
“हो”
दशमाचा सब बुध पंचम षष्ठ स्थानाचा कार्येश होत होता. सिंह ह्या
स्थिर तत्वाच्या राशीत असल्यामुळे तसेच त्याचा नक्षत्र स्वामी शुक्रही षष्ठ
स्थानाचा कार्येश होत असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्याच धाडस त्यांनी करू नये
ह्या मतापर्यंत मी आलो. पण तरी मला त्यांना निराश करायचं नव्हत.
“चिंतामणी जी, मला तुम्हाला निराश
करायचं नाही. पण असलेली नोकरी न सोडता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरच अगदी
कमीत कमी भांडवल गुंतवून करा.”
मी त्यांना सावध सल्ला दिला.
दशास्वामी शनी दशमाचा व लाभाचा
कार्येश होत होता. त्याचा नक्षत्र स्वामी केतुही दशम व लाभाचा कार्येश होत होता.
शनी धनु ह्या गुरूच्या द्विस्वभाव राशीत होता. नक्षत्र स्वामी केतू हि मंगळाबरोबर
शनिच्याच मकर ह्या चर राशीत होता. म्हणजे व्यवसाय संबंधी दशास्वामी अनुकूल होता.
अंतर्दशा स्वामी मंगळ मकर ह्या चर राशीत सप्तमाचा कार्येश. आता शनी मंगळ म्हणजे
बांधकाम क्षेत्रच मला खुणावत होत. कार्येश स्थानांपैकी अष्टम स्थानाची उपस्थितीती
बोलकी होती. बांधकाम साहित्याचा विशेषतः पाईप, नळ प्लंबिंग इ ची विक्री करण्यासंबंधी
सूचना मी त्यांना केली.
“अरेच्चा, हा विचारही माझ्या मनात
आला होता.”
चिंतामणी तर्जनी आपल्या ओठाशी लावत
म्हणाले.
शेवटी मी एवढच म्हणालो, “नोकरी न
सोडता जे करता येईल ते करा.”
“मला काही उपाय द्याल?”
प्रश्नाचा रोख मला समजत नव्हता.
इथे समस्या अशी नव्हती निर्णय घेण्यासाठी ज्योतीर्विदाची गरज होती.
माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह
त्यांना दिसलेच.
“नाही म्हणजे, कुठले रत्न वगैरे
वापरू?”
आत्ता माझी ट्यूब पेटली.
मी परत कुंडलीत डोके खुपसले.
अनामिकेत पाचू व गळ्यात गोमेद
वापरण्याची सूचना मी त्यांना केली.
“तुम्ही हात पहाता?”
चिंतामणी साहेबांचा पुढचा प्रश्न.
“मी फक्त कुंडली पाहतो, पण तुम्हाला
हस्त रेषा वरून फलादेश हवा असेल तर तशी व्यवस्था करता येईल.” एकीकडे हे मी त्यांना
म्हणालो आणि दुसरी कडे हेमंतजीना फोन लावला.
चिंतामणीजींच्या हाताचे काळजी
पूर्वक फोटो घेऊन ते हेमंतजीना whats अप केले.
पुढच्या १० मिनिटात हेमंत जी नि
फोनवरच फलादेश दिले. शनीचा उंचावता प्रबळ आहे. मंगळाच्या मैदानवर स्पष्ट शुभ चिन्ह
आहे. स्व कर्तुत्वावर आत्तापर्यंत सर्व उभे केले. वयाच्या ३४ व्या वर्षी अपघात
झाला होता. अंगठ्याच्या पर्वतावर शुभ चिन्ह आहे. संतती सुख उत्तम राहील. थोडे
वैवाहिक जीवनात पत्नीबरोबर मतभेद राहतात. इच्छाशक्ती प्रबळ आहे. अनामिकेत पाचू
रत्न धारण करावे. नोकरीत स्थैर्य आहे, सोडू नये. नोकरी न सोडता व्यवसाय करावा. हेमन्तजी
आणखी बरेच काही बोलले. वाक्या वाक्यागणिक चिंतामणी चिंतामुक्त होत असल्याचे मला
जाणवायला लागले होते. धोनीने येऊन शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना जिंकावा तसं
काहीसं मला वाटल. माझ्या आणि हेमन्तजींच्या फलादेशात साम्य होत.
पुढच्या क्षणी चिंतामणीनि आपल्या
विजारीच्या खिशातून ३ अंगठ्या बाहेर काढल्या. पाचू, मोती आणि गोमेद. मी त्यांना
एवढच म्हटलं, “अहो आधी तरी दाखवायच्या होत्या, विचारायचं ह्या वापरू का.” चिंतामणी
ओशाळले. अगोदरच ते कोणा ज्योतीर्वादाकडे जाऊन आले होते हे स्पष्ट होतें. पण
लपवायची काय गरज होती? अर्थात हे मी स्वतःशीच म्हणालो.
“छान, फक्त एक करा पाचू आणि मोती
एकत्र वापरू नयेत. मोती काढून ठेवा.”
अर्थात ते माझ्या सूचनांचं पालन
करतील कि नाहीत ते त्या प्रत्यक्ष “चिंतामणीलाच” माहित.
छान विश्लेषण, स्टेप बाय स्टेप.नोकरी न सोडता व्यवसाय . सुंदरच .आज प्रथम च तुमचा ब्लॉग पाहिला.
ReplyDelete