Wednesday, October 10, 2018

ज्योतिष कथा: माझा मुलगा परत येईल का हो?


“शांत व्हा जयकर साहेब, नका असा जीवाला त्रास करून घेऊ”
“काही तरी मार्ग नक्की निघेल.”
“आपल्याच कर्माचे भोग असतात. विचार करा तुमचा मुलगा बुद्धिमान आहे. हाती पायी धड आहे. कुठलेही व्यंग त्याला नाही. कुठलेही व्यसन नाही. उच्च शिक्षित आहे. माझ्या माहितीत असे अनेक पालक आहेत ज्यांची मुले मतीमंद किंवा गतिमंद निपजतात. व्यसनी होतात. गुनेह्गारी कडे वळतात. जन्मजात व्यंग असते. आंधळी निपजतात. अल्पायुषी निघतात. त्यांनी काय करावं? नियतीच्या पुढे कोणाच काय चाललय का?”
“शांत व्हा”.
एका हतबल बापाशी मी बोलत होतो. परोपरीने समजावण्याचा प्रयत्न करत होतो. एक ज्योतिषी म्हणून प्राप्त परिस्थितीची योग्य जाणीव जातकाला करून देण गरजेचं असतं. माझा तसा प्रामाणिक प्रयत्न होता.
“अहो मी काय नाही केलं सुशांत साठी. त्याच्या आईने त्याच्या संगोपनासाठी तिच्या करिअरवर पाणी सोडलं. त्याने मागावं आणि मी आणून द्यावं. काही म्हणून कमी नाही ठेवलं. उत्तम शाळेत त्याच शिक्षण व्हाव म्हणून मी पार्ट टाईम काम करायचो. माझी परिथिती तेव्हा तशी चांगली नव्हती. शाळा, कॉलेज, त्याचे छंद, खेळ कुठे म्हणून मी कमी पडलो का?”
अत्यंत अगतिकतेने जयकर साहेब माझ्याशी बोलत होते. सुशांत, त्यांचा थोरला मुलगा. चुणचुणीत. हुशार. मोठ्या प्रयत्नाने इंजिनिअर झाला. चार चौघात देखणा. सडपातळ. बोलका. एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला होता. पण कुठे माशी शिंकली? कुठल्या आई बापाला नाही वाटत, मुलांनी छान शिकावं. उत्तम नोकरी –व्यवसाय करावा. योग्य वयात लग्न करावं. लौकिक रूढ वाटेने आयुष्याची  वाटचाल करावी. जगाशी दोन हात करावेत. नवनवी क्षेत्र पादाक्रांत करावीत. घरात नातवंड खेळवावीत. अंगणात चिमुकली पावलं दुडूदुडू धावावीत. त्यांच्या पाठी धावता धावता पुन्हा मुल व्हावं. आयुष्याच्या संध्याकाळी मुलांनी आधार व्हावं. संतती सुख म्हणतात ते अजून काय असत?
“पंचविशी सरली. तिशी उलटली. महिने चाललेत. वर्ष उलटत आहेत. ह्याच्या बरोबरीच्या मुलांची लग्न झाली त्यांना मूल झाली तरी हा काही लग्नाचं नाव काढत नाही.”
“येईल ते स्थळ नाकारत सुटलाय.”
“बर, आम्ही हे हि विचारलं तुझ्या मनात कोणी असेत ते तरी सांग, तर ते हि नाही.”
“मी तर आता ह्याच्या पुढे हात टेकले.”
“काही विचारव तर अंगावर वसकतो.”
“आता ह्या वयात हे भोग नशिबी यावेत का आमच्या?”
“३ महिन्यापूर्वी चांगली भली नोकरी सोडली.”
आता मलाही हे सर्व ऐकून धक्का बसला. इथे लोकांना चागल्या नोकऱ्या मिळत नाहीत आणि ह्यान असलेली नोकरी सोडावी?
“आत्ता काय करतो मग सुशांत?”
“अहो कुठल्याशा आश्रमात जाऊन राहिलाय, परत घरी यायचं नाही म्हणतो.”
आई बात समज में | मी मनाशीच म्हटलं
“परोपरीने समजाऊन सांगितलं, त्याला कुटुंबा विषयी काही वाटतच नाही.”
सोसाट्याच्या वाऱ्यात शीड फाटलेल्या गलबतासारखी मनाची अवस्था झाली होती. सैरभैर.
सर्व भावना बोथट झाल्या होत्या. एक एक दिवस नुसता ढकलायचा.
“माझा सुशांत परत येईल का हो?”
जयकर साहेबांनी कळवळून प्रश्न विचारला होता.
का जन्माला येतो आपण. कोण आहोत आपण. जन्माला येऊन काय करायचंय? काळाच्या पुस्तकातली वर्षाची पान उलटत राहतात. जन्म, बालपण, शाळा, सोबती, परीक्षा, खेळ, स्पर्धा, छंद, कॉलेज, समारंभ, प्रेम, प्रेमभंग, लग्न, संतती, नोकरी, करिअर, हॉस्पिटल, आजारपण, फसवणूक, लांड्यालबाड्या, खुन्नस, अपमान, मारामाऱ्या, राजकारण, ......एक दिवस मृत्यू. हीच का आयुष्याची इति कर्तव्यता? का वाटल असेल सुशांतला घर सोडून आश्रमात राहावंसं? त्याला सन्यासी व्हायचय? कि त्याला आयुष्यात जबाबदाऱ्या नको आहेत? एका तरुणाच त्याच्या पालकांप्रती , समाजाप्रती, देशाप्रती काहीच कर्तव्य नाही का? कुठे गेल पौरुष? कुठे गेली विजीगिषु वृत्ती? कुठे गेली मनगटातली रग? अरे घे अंगावर जगाची आव्हानं. कर कठीण परिस्थितीशी दोन हात. उठ! जागा हो! जग तुझ्या आई साठी जीन तुला तळहाताच्या फोडासारखं जपला. जग तुझ्या बापासाठी ज्याने तुझ्यावर मायेच छत्र धरल. जग तुझ्या छोट्या धाकट्या भावासाठी जो सतत दादा दादा करत तुझ्यावर निरपेक्ष प्रेम करतो. जग त्या मित्रांसाठी जे तुझ्या अवतीभवती असतात सतत तुझ्यासाठी. तुझ्या अडचणीत. तुझ्या सुखात, तुझ्या दुखात. जग त्या समाजातल्या वंचितांसाठी, अडलेल्यांसाठी, नडलेल्यांसाठी, हो त्यांच्या अंधारातला प्रकाश देणारा दिवा. हो त्यांच्या आधाराची काठी. त्या परमेश्वराने तुला सर्व दिलय. एक सुंदर सशक्त शरीर. एक मजबूत कणखर मन. का करायचा करंटेपणा? का पळायच परिस्थितीपासून? काय मिळणार आहे त्या आश्रमात हरी हरी करून? तो पुंडलिक कुठल्या आश्रमात गेला होता हरी हरी करायला? प्रत्यक्ष परब्रह्म आले त्याच्या भेटीला. परमेश्वर नाही आश्रमात, तो नाही मंदिरात, तो नाही कुठल्या मठात. तो आहे तुझ्या आत. तो आहे तुझ्या आई बापाच्या चरणाशी. गधड्या तुझ डोक दुखत तेव्हा परमेश्वर येत नाहीरे तुला बाम लावायला, ती माउली येते. करंट्या १०३ ताप असताना कोणी रे तुला खांद्यावर उचलून डॉक्टरकडे नेलं? तो हरी आला होता का? तुझा बाप होता भर पावसात चपला झिजवत तुला डॉक्टरकडे नेणारा. आठवतय का तुला मुलाखतीला जाताना टिफिन विसरून गेला होतास, दुपारी भर उन्हात कोण आले होते रे तुला टिफिन घेऊन? तुझा हरी कि तुझा भाऊ? बाईक वरून धडपडला होतास. ८ दिवस हॉस्पिटलमध्ये होतास. तुला भरती करणारे तुझे मित्र होते. तुझ्या आईला आणि वडिलांना धीर देणारे तुझे मित्र होते. औषधाचे पैसे भरणारे तुझे मित्र होते. तू बरा होऊन घरी येईपर्यंत तुझी सुश्रुषा करणारे तुझे मित्र होते. तुझासाठी देव पाण्यात टाकून ठेवणारी तुझी आई होती. पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, फायर ब्रिगेड इथे तिथे धावणारे तुझे वडील होते. अशा तुझ्या मायेच्या माणसांना सोडून तला त्या टुकार आश्रमात रहावस वाटत? धिक्कार आहे तुझा.
जयकर साहेबांचं बोलण ऐकून माझं विचार चक्र अस सुरु झालं. वाटलं सरळ जावं आणि सुशान्ताचे कान उपटावेत, जयकर साहेबांनी दिलेल्या सुशांतच्या कुंडलीतली पाने उलटण्या व्यतिरिक्त तरी त्याक्षणी मी काय करू शकत होतो?
सुशांतची कुंडली पाहत असतानाच मी मनातल्या मनात सन्यास घेण्या संबंधी ज्योतिष शास्त्राचे नियम जे आहेत त्यांची उजळणी करू लागलो. ज्याअर्थी जातकाला सन्यास घ्यावासा वाटतो त्याअर्थी त्याचा लौकिक आयुष्यातला रस संपला असावा. त्याला उपरती होऊन सद्गुरूंचा शोध घ्यावासा वाटत असावा. त्याला मोक्षाचा अधिकारी व्हावस वाटत असाव. माझ्या मनात हाही विचार आला कि हा टेम्पररी फेज तर नाही? मठ मंदिरातून राहण्याची खाण्याची फुकट सोय होते. कुठलीही हि जबाबदारी नकोय, पडेल ते काम केले. दोन वेळ गिळायचं आणि स्वस्थ बसायचं. जर खरच अध्यात्मात प्रगती होणार असेल तर गोष्ट वेगळी. सुशांतची कुंडली अभ्यासात असताना मी पुढील सन्यास योगांची पडताळणी करू लागलो.
एकूणच वैराग्य आणि सन्यस्त वृत्तीचा कारक ग्रह म्हणजे शनी. तसेच आयुष्य समरसून जगण्यासाठी, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी बळ लागते चंद्र, रवी, गुरु, मंगल अशा ग्रहाचं.
भाग्येश आणि दशमेश हे दोन्ही ग्रह जर षष्ठेश आणि अष्टमेश याबरोबर असतील तर व्यक्ती सन्यास घेते. लग्नेश व शनी दोन्ही तूळ, मकर व कुंभ या व्यतिरिक्त इतर कुठल्या राशीत असतील तर सन्यास योग निर्माण होतो. रवी, चंद्र किंवा गुरु यापैकी एक ग्रह निर्बली असून लग्न, दशम किंवा व्यय स्थानी असून तूळ, मकर किंवा कुंभ राशीतील शनीच्या पूर्ण दृष्टीत असेल तर वैराग्य येते. अशा ग्रह स्थिती बरोबरच जर सप्तम स्थान कमालीचे बिघडले असेत तर आयुष्यातला रस नाहीसा होतो. लग्न स्थानावर रवी, मंगळ अथवा गुरूची दृष्टी असता विरक्ती येते. जन्म लग्न कुंडलीत चार ते पाच ग्रह एकाच भावात असून त्यापैकी एक ग्रह बलवान असतो. कुठल्याही अन्य ग्रहाच्या दृष्टीत नसतो तसेच यापैकी कुठलातरी एक ग्रह दशमाधीपती असतो अशावेळी जातक संन्यासी वृतीचा असतो. कुंडलीमध्ये लग्न स्थानाचा संबंध शरीराशी तसेच चंद्राचा संबंध मनाशी असतो. असे लग्न स्थान व चंद्राचा संबंध शनीशी असता जातकाला विरक्ती येते. लग्नेश कुणाच्या दृष्टीत नाही पण लाग्नेशाची शनिवर दृष्टी असता विरक्ती येते. तसेच शनिवर कोणाची दृष्टी नसताना शनीची लग्नेशावर दृष्टी असेल तर सन्यस्त वृत्ती निर्माण होते. चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीस्वमीवर फक्त शनीची दृष्टी असेल तर वैराग्य येते. दशमेश इस्तर चार – पाच ग्रहांबरोबर असून केंद्र किंवा त्रिकोण स्थानात असेल तर जातक जीवन्मुक्त होतो. नवमेश बलवान असून तो नवमात किंवा पंचमात असून गुरु अथवा शुक्राच्या पूर्ण दृष्टीत असेल तर जातक संन्यासी होतो. कुठल्याही कार्यात यश हवे असेल तर गुरुबळ असणे अत्यावश्यक आहे. त्यातूनही मोक्ष प्राप्ती, सन्यास अशा बाबतीत तर ते खास महत्वाचे. सुशांतच्या पत्रिकेत लाभत कर्केचा चंद्र आहे खरा, पण त्यावर धनातल्या तुळेच्या शनीची दहावी दृष्टी. हा एक योग मला त्यादृष्टीने योग्य वाटतोय मुख्य म्हणजे नवमांशात सुद्धा चंद्र शनीच्या तिसऱ्या दृष्टीत. थोडं धाडसी विधान करतोय खर, यामुळे सन्यस्त वृत्ती पेक्षा आळशी वूर्त्ती वाढीस लागते अस वाटते. कुठलीही महत्वाकांक्षा नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी वृत्ती. पंचमातला रवी शनीच्या मकर राशीत त्यामुळे बिघडला. भाग्येश आणि धनेश शुक्र षष्ठात मंगळाबरोबर म्हणन बिघडला. नवमांशात सुद्धा तो चतुर्थात हर्शल व प्लुटो बरोबर मंगळाच्या राशीत. जन्म लग्न कुंडलीत गुरु हर्शल बरोबर तृतीय स्थानात. म्हणजे एकूणच शुभ ग्रहांचे पाठबळ नाहीच. थोडक्यात सन्यास मार्गात सुद्धा हाती निर्भेळ यश नाही. बिघडलेल्या शुक्रामुळे स्त्रीसुख नाही. वैवाहिक सौख्यात न्यून. एकूणच आश्रमाच्या नियमावलीतील काही नियमामुळे नामस्मरण घडत आहे त्याचा काही परिणाम झाला तर उत्तम. वात्स्तविक कर्क राशीचे लोक कुटुंबाशी सलग्न असतात. कुटुंबापासून दूर राहू शकत नाहीत. पण इथे सर्व उफराटा कारभार. तसा सुशांत अधून मधून घरी येतो पण पुन्हा परत जातो. चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्रस्वामी तृतीय स्थानाचा बलवान कार्येश होतो. तृतीय स्थान हे चतुर्थ स्थानाचे व्यय स्थान त्यामुळे तो तसा कायम घरापासून दूरच राहील. किंबहुना त्यातच त्याचे हित आहे, या निष्कर्षाप्रत मी आलो. कर्क राशीचा स्वामी चंद्राची महादशा जेव्हा सुरु होईल तेव्हा तो घरी येईल. म्हणजे २०१९ च्या शेवटी. अर्थातच नोकरी व काम धंद्यात त्याला रस नसणार कारण षष्ठ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी शुक्र पंचम स्थानाचा बलवान कार्येश होतोय. त्याचा नक्षत्र स्वामी मंगळ सुद्धा पंचम स्थानाचा बलवान कार्येश होतोय. तसे चित्र निराशाजनक आहे खर, पण काय करणार ईश्वर इच्छा बलीयेसी. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी कि हेमंत जी नि सुशांतच हात बघून हि हाच फलादेश दिला. २०१९ – २० च्या सुमारास तो घरी येईल पण....

नुकताच रिलीज झालेला चित्रपट पहिला. “सुई-धागा” त्यात्तल्या त्या नायकाचे उद्गार असतात, “सब बढीया है|”

समाप्त.

No comments:

Post a Comment