Tuesday, April 30, 2019

ज्योतिष : करिअर कौन्सेलिंग - कॉमर्स कि शेती?


"सायेब, देवाच्या किरपेने बक्कळ हाय बगा. १२ एकर जिमीन हाय. जनावर हायती. हिरीला १२ मयनं पानी असतंय. शाळू, घव, ऊस, भाज्या, सुरफूल मोप निघतय बगा. गडी माणूस बी हाय राबायला, पर ह्येच्या टकुर्यात काय बी जात न्हाय. आव करायचं काय हाय शेरात जाऊन? कसं राजावानी ह्राव. भाकर तुकडा खावा. जिमिनीत घाम गाळावा आन सुखानं बिरोबाचा संसार करावा, ते काय शेरात जाऊन नोकरी करायची हाये बगा. मोटा हापिसर होनार हाय गडी जनू." 
माझ्यासमोर केदार शिंदेच्या मराठी चित्रपटातला सिन तरळला, लांब वर नदर पोचेपतूर जिमीन हाय. शेताच्या बांधला एका कडेला कौलारू मोठं घर. घराला लागूनच गोठा. गोठयात दोन पुष्ट बैल. एक गाय आणि वासरू. वासरू गायीला ढुसण्या देतय. गाय आणि बैल शांतपणे पुढ्यातला कडबा खात रवंथ करीत बसले आहेत. शेतातल्या विहिरीवर पम्प बसवला आहे. पंपातून आलेलं पाणी शेतातून पाटाने जमीन भिजवत चाललंय. गडी माणसं शेतात काही बाही काम करत आहेत. सुकलेला शाळूची धेंड एकाबाजूला हारीने रचून ठेवली आहेत. मध्येच एखादे बाभळीचे झाड आपले काटे सावरत पिवळ्या फुलांनी डावरलंय. सूर्य डोक्यावर आलाय. वारा मंद वाहतोय. वातावरणात किड्यांचा एक स्वर भरून राहिलाय दुरून बिरोबाच्या देवळातला नगारा दुडदुडतोय आणि घंटानाद ऐकू येतोय. गावाजवळूनच पवना संथ वाहतेय.

पन्नाशीला आलेले धोंडू जगताप आपल्या कनिष्ठ चिरंजीवांना सागरला घेऊन माझ्याकडे आले होते. दहावीला उत्तम मार्क्स मिळाल्याने सागर खुशीत होता. तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळत होते. त्याचा स्वाभाविक ओढा कॉमर्स कडे होता. त्याला सी ए करायचे होते. घरोघरी मातीच्या चुली या चालीवर  धोंडू जगतापांच्या घरातही बाप लेकाची जुंपली होती. थोरला यथामती शिकून बापाला शेतीत मदत करीत होता. धाकट्यानेही हा बिरोबाचा संसार करावा असं धोंडू जगतापाला वाटत होत. पण सागर धोंडू जगतापांच्या भाषेत दिवट्या मातीत रमत नव्हता. उन्हातान्हातून रापलेला चेहरा. डोक्याला मुंडासं. पांढरा मळखाऊ सदरा आणि धोतर अशा वेशात धोंडू माझ्यासमोर बसले होते. सागरला मात्र शहरात जायचे वेध लागले होते. पाटातल्या पाण्यापरीस त्याला शहरातली मॉल संस्कृती खुणावत होती. नाकावरला चष्मा सावरत मी कुंडलीत लक्ष घातले. तत्कालीन कार्येश ग्रहांकडे एक नजर टाकली. लग्न - शुक्र, चंद्र नक्षत्र - धनिष्ठा (मंगळ), चंद्र राशी मकर (शनी) आणि वार रविवार - रवी. सागरच्या उपलब्ध कुंडलीत चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी चंद्र होता, पण चंद्र आर पी  मध्ये नसल्याने त्याचा लगतच शुक्र चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी म्हणून निश्चित केला. कारण शुक्र आर पी मध्ये लग्न स्वामी म्हणून उपस्थित होता. जन्मवेळ १०मिनिटानी चुकली होती ते करेक्ट केली. आता ग्रहांचे कार्येश भाव पहिले कि मला ठरवता येणार होते कि सागरने कुठल्या क्षेत्रात करिअर करावे. चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी शुक्र पुढील प्रमाणे कार्येश झाला होता. 

१) शुक्र - , , ६, ११ (मिथुन [बुद्ध] द्विस्वभाव वायू तत्वाच्या राशीत )
२) शुक्राचा नक्षत्र स्वामी राहू - , , , ६, ११ (वृषभ [शुक्र] या स्थिर तत्वाच्या राशीत)
३) शुक्राचा उपनक्षत्र स्वामी चंद्र - , १, , ८ (मकर [शनी] या चर तत्वाच्या राशीत)
४) चंद्राचा नक्षत्र स्वामी रवी - ८, , १, ४, ( मिथुन [बुद्ध] द्विस्वभाव वायू तत्वाच्या राशीत)

आता पुढे त्याच्या वय वर्षे ५० पर्यंत येणाऱ्या महादशा पाहिल्या, त्या खालील प्रमाणे होत्या.
१) मंगळ (वर्ष २०२१ पर्यंत) - ५, २, १२
२) मंगळ नक्षत्र स्वामी राहू - , ५,, ६, ११
३) मंगळ उपनक्षत्र स्वामी केतू - ८, ११, १, ४, २, ५, १२
४) केतू नक्षत्र स्वामी गुरु -, ८, १०, ४, १

१) राहू (वर्ष २०२९ पर्यंत) - , ५,, ६, ११
२) राहुचा नक्षत्रस्वामी रवी - ८, , १, ४,
३) राहुचा उपनक्षत्र स्वामी गुरु - , ८, १०, ४, १
४) गुरूचा नक्षत्रस्वामी बुद्ध - , २, ३, १०

१) गुरु (वर्ष २०५५ पर्यंत) -, , १०, ४, १
२) गुरूचा नक्षत्रस्वामी बुद्ध - , २, ३, १०
३) गुरूचा उपनक्षत्र स्वामी बुद्ध - , २, ३, १०
४) बुद्धाचा नक्षत्र स्वामी शनी - ५, , ३, २


मी जन्म लग्न कुंडलीत दशमाचा अधिपती पाहिला, तो बुद्धच आहे. बुद्ध म्हणजे बुद्धीचा, वाणीचा, व्यापाराचा कारक. म्हणजे कॉमर्स ! जंत्रीमध्ये उपस्थित ग्रह मंगळ, शनी, बुद्ध व गुरु. वृषभ, मकर, मिथुन व तुला राशीआणि प्राधान्याने कार्येश झालेले भाव २, ३, ७, ९, १०, ८ आणि १२. माझी मनोमन खात्री पटली, सागरने  आय सी डब्लू ए , सी ए किंवा अक्युअर्स या क्षेत्रात करिअर करावं. आता प्रश्न होता धोंडू जगताप याना बाटलीत कसा उतरवावा. माझी कुडमुडेगिरी (काहीजण ज्योतिषाचा उपहासात्मक कुडमुड्या म्हणून उल्लेख करतात, मला गम्मत वाटते. बदनामहि सही मगर नाम होणं मंगता है | ) चालू असताना दोघेही अगदी शांत बसले होते. टोपीतून काय बाहेर येणार फुलदाणी कि कबुतर असे भाव दोघांच्या चेहऱ्यावर होते. मी मान वर करत म्हटले, ' धोंडूजी, सागरने कॉमर्सलाच जाऊन आय सी डब्लू ए किंवा सी ए करावे त्यातच त्याचे करिअर खूप छान होईल.' जंत्रीमधली चतुर्थ आणि नावं स्थानाची उपस्थिती बोलकी होती. त्याचे  त्याचे उच्च शिक्षणाचे योग उत्तम होते. पोरगा फोकस्ड होता. हुशार होता, आणि कमिटेड होता. पराभवाचे भाव बापाच्या डोळ्यात तरळले. मी म्हटले,' धोंडूजी, जरा विचार करा. शेती तुमचा थोरला संभाळतोय. धाकटा वेगळ्या वाटेने जायचे म्हणतो तर जाऊद्या. त्यातच त्याचे हित आहे. त्याच मन शेतीत रमणार नाही. जबरदस्ती कराल तर हाती काहीच येणार नाही. त्याची महत्वाची वर्ष वाया जातील. शिवाय त्याच्या ज्ञानाचा उपयोग पुढे तुम्हाला, गावाला, समाजाला, देशाला होणारच आहे कि ! मात्र मला तुमचं कौतुक वाटते, त्याच्या करिअरच्या दृष्टीने तुम्हाला ज्योतिष सल्ला घ्यावासा वाटला. अहो पुढे हा मुलगा करोडोंचे व्यवहार करेल. तुमच्या थोरल्याचे कष्ट, मेहनत आणि धाकट्याचे कौशल्य दोन्ही मिळून तुम्हाला उर्जितावस्था आणतील. तुमच्या घरात रॅम लक्ष्मण असताना काळजी का करता? करू द्या सागरला त्याला हव्या त्या क्षेत्रात करिअर. एक शेतीतज्ज्ञ आणि दुसरा अर्थ तज्ज्ञ असे तुमच्या पोटी उपजले आहेत. तेव्हा बिनघोर व्हा.' धोंडू जगतापांच्या डोळ्यातले भाव आता बदलले होते. 'बराय गुर्जी तुमि म्हंताय तसं, वाईच मला वाटलं हुतं समदं बयाजवार हुईल, पर चितार येगळंच हाये तर काय घ्या' ५०० च्या ३ कोऱ्या नोटा माझ्या पुढ्यात ठेवत ते उठले आणि जात जात म्हणाले, 'गुर्जी, बर्का थोरल्याचं लगीन होऊनशानी २ वर्स झाली आन आंगणात बाळ कृष्न न्हायी आजून तवा थोरल्यास्नी घिनेउं येतो म्हंतो.' मी म्हटलं , 'धोंडूजी आव तुमि बिनघोर ऱ्हावा दोगास्नी धाडा हिकडं ! , बरं बरं !!! म्हणत धोंडू जगताप आपल्या दिवट्यासह डोळ्याआड झाले. 


जातक : पुरुष
जन्म दिनांक : १४-०७-२००३
जन्म वेळ (जातकाने दिलेली) १७:५२
जन्म ठिकाण : यवतमाळ

Wednesday, April 24, 2019

ज्योतिष: वैवाहिक समस्या. तुझ्यावर केल प्रेम अन तू माझाच केलास गेम !!


निताचे  (नाव बदललेले आहे), whats app वरील messages वाचून अतिशय वाईट वाटलं, अरे चाललंय काय आज काल? अवघ्या २ वर्षापूर्वी तिचा प्रेम विवाह झाला होता. दोघे नवरा बायको अगदी २-३ महिन्यापुरीच मला भेटली होती. दोघेही एकमेकांबरोबर खुश होती. त्यांना काही आर्थिक समस्या होती म्हणून ती माझा सल्ला घेण्यासाठी आली होती. माझ्यापरीने त्यांना मी काही उपायहि दिले होते अचानक तिचे मेसेजेस वाचून मला तर धक्काच बसला. अगदी अचानक एका सकाळी तिचा नवरा ऑफिसला जातो सांगून जो निघाला तो घरी परत आलाच नाही. फोन नाही, मेसेज नाही, काही निरोप नाही. त्यांच्या एका मित्राकडून कळले कि हा पुण्याला निघून गेलाय. तिथे त्याने एक जॉब अटेंड केलाय आणि आता तो पुण्यातच राहणार. नीताने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मेसेजेस पाठवले पण काही उपयो नाही. हि इथे हवालदिल झाली. जबरदस्त मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत तिने मला फोन केला आणि सगळी कर्मकहाणी सांगितली. साधारण ७-८ दिवसांनी तिचे त्याच्याबरोबर फोनवर बोलणे झाले, तो एवढाच म्हणतोय, त्याला तिच्याबरोबर राहायचं नाही. बस्स ! नो रिजन ! असे होते का? नीताने घरासाठी व इतर कारणासाठी लोन्स घेऊन ठेवली होती. लोनचे हप्ते फेडण्यासाठी तिचा पूर्ण पगार खर्च होत होता. तिच्यावर तिच्या वृद्ध आईची जबाबदारी होती. हे असं का होतं? चूक कोणाची हे न पाहता तिच्या कुंडलीच विश्लेषण करायचं मी ठरवल. पहिल्यांदा तिला धीर दिला. मी म्हटलं, होल्ड! आधी आपण कुंडली पाहू. मग ठरवू पुढे काय करायचं ते. 


   
                   


वैवाहिक जीवन आणि पती हे कुंडलीमध्ये सप्तम स्थान आणि सप्तमेश तसेच वैवाहिक सुखाचा कारक शुक्र यावरून पाहिले जाते. वरील जन्म लग्न कुंडलीत सप्तमावर निचेच्या बुधाची दृष्टी आहे. सप्तमेश स्वतः बुध आपल्या मीन या नीच राशीत आहे. म्हणजे बिघडला. वैवाहिक सुखाचा कारक शुक्र जरी स्वराशीत असला तरी हर्षल व वक्री शनीच्या पूर्ण प्रतियोगात आहे. शनीच्या दृष्टीत आहे. शिवाय शुक्राचा नेपच्यून व मंगळाबरोबर षडाष्टक योग आहे. नवांशात सुद्धा सप्तमेश बुधाची  मीन या नीच राशीत हर्षलबरोबर युती. हर्शल म्हणजे अकस्मात आणि अचानक काहीतरी घडवून आणणारा ग्रह. जन्म लग्न कुंडलीत रवी राहू पितृदोष आणि वाचा दोष दर्शवतो कुटुंब स्थान बिघडले. भाग्यातली शनी हर्शल युतीही अडचणीची. नवांशात शुक्र राहू युती वैवाहिक सुख कमालीचे बिघडवते. सध्या शनी (जून २०३३ पर्यंत) महादशेत बुधाची अंतर्दशा (फेब्रुवारी २०२० पर्यंत) व राहूची विदशा (मे २०१९ पर्यंत) चालू आहे. आता पुढे असा प्रश्न आहे कि नीताला हा त्रास कधी पर्यंत होत राहील? तिची यातून सुटका होईल का? तिचे तिच्या नवर्याशी संबंध सुधारतील का? नीताचा घटस्फोट होईल? कि ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त राहील? आणखी खोलात जाण्यासाठी कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे विश्लेषण करूया.

सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी : बुध.

बुध : - १, ७, ४.
बुधाचा नक्षत्र स्वामी - बुध : - १,७,४.
बुधाचा उपनक्षत्र स्वामी - शनी : - ८, ११, १२.
शनीचा नक्षत्र स्वामी - शनी. म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी राहू : - ७, १, २, ९, १०.

अशाप्रकारे बुध हा १, ८, १० व १२ या विवाह विरोधी स्थानांचा कार्येश झाला असल्या कारणामुळे नीताला त्रास होतोय.

महादशा स्वामी : शनी.

शनी : - ८, ११, १२
शनी स्वतःच्याच नक्षत्रात आहे म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी राहू : - ७, १, २, ९, १०
राहूचा नक्षत्र स्वामी - केतू : - १०, ७, २, ९, ८, ३

शनी व राहू सुद्धा विवाह विरोधी स्थानांचा कार्येश होतो आहे.

म्हणजे बुधाची अंतर्दशा आणि राहूची विदशा एकूण त्रासदायकच जाणार !

राहूच्या विदाशेनंतर गुरूची विदशा सुरु होईल. मे २०१९.

गुरु:  १२, १, १०
गुरु स्वनक्षत्रात.
गुरूचा उपनक्षत्रस्वामी : शनी : - ८, ११, १२

गुरु महाराज सुद्धा मदतीला नाहीत. पुढच्या शनी विदशा  आणि केतू अंतर्दशा सुद्धा त्रासदायकच आहेत. उलट केतू अंतर्दशेत घटस्फोटाचे योग आहेत. तृतीय स्थान सिग्निफाय झालय म्हणजे त्रासात आणखी भर पडणार.

पुढे येणाऱ्या दशा अंतर्दशा या वैवाहिक जीवनात अस्थैर्य निर्माण करणाऱ्याच आहेत.










थोडक्यात अत्यंत नाईलाजाने म्हणावस वाटत, तिने चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा. अर्थात प्राप्त परिस्थितीत तिला मानसिक, नैतिक आणि सामाजिक आधार मिळावा म्हणून काही उपाय दिले आहेतच. तिच्या नवऱ्याच्या कुंडलीत दशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी हा पंचमाचा बलवान कार्येश झाल्याचे आढळले. सुज्ञास सांगणे नलगे!! सर्व डिस्कस करून झाल्यावर बाई म्हणाल्या नवऱ्याचे बाहेर लफडे असावे असे तिला वाटते. आता बोला.

जन्म तारीख: ३ मे १९८६
जन्म वेळ : पाहते ०४:००
जन्म ठिकाण : अंधेरी मुंबई 

Tuesday, April 23, 2019

यंत्र विभाग : अपघात निवारक यंत्र

नमस्कार मित्रहो,

अनेकदा असं होते कि आपली काही चूक नसताना आपण अपघातग्रस्त होतो. वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुद्धा आपलं किंवा आपल्या गाडीचे नुकसान होते. प्रसंगी प्राणहानी होते. मनस्ताप, शारीरिक इजा इ गोष्टी घडतात. हे टाळण्यासाठी अपघात निवारण यंत्र सिद्ध करून आपल्या जवळ बाळगले असता निश्चितच फायदा होतो. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. अत्यंत गंभीर अपघात टळला आणि मामुली खरचटणे सारख्यावर निभावलं. खाली दिलेले यंत्र आपणही एका शुभ शनिवारी किंवा पौर्णिमेला एका पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल शायीने लिहून सिद्ध करा व प्रवासाला जाताना, गाडी चालवताना जवळ बाळगा. 


हे यंत्र सिद्ध करणे अगदी सोपे आहे. एकदा हे यंत्र पांढऱ्या कागदावर लाल शायीने काढून झाले कि डोळे मिटून त्यावर बोट ठेवा आणि जी संख्या येईल तेवढ्या संख्येएवढा खालील जप करा व गंध, धूप, दीप, नैवेद्य इ उपचारांनी यंत्राची पूजा करा. तर मंत्र असा - ओम अंजनीसुत हनुमान रक्षतु रक्षतु स्वास्ति 

पुढे जेव्हा प्रवासाला निघाल तेव्हा ११ वेळा वरील मंत्र म्हणून सुरुवात करा. असा अनुभव आहे कि साधा ओरखडा सुद्धा येणार नाही. लांबच्या प्रवासाला निघाल तेव्हा जवळच्या मारुती मंदिरात एक श्रीफळ अर्पण करा आणि मारुतीरायाला आपणाबरोबर चलण्याची विनंती करा. प्रवास्वरून परत आलात कि पुन्हा हनुमंताचे दर्शन घेऊन त्याला धन्यवाद द्या. 

कोणालाही सिद्ध यंत्र हवे असल्यास संपर्क करा. कुरिअरने घरपोच पाठवू.


ज्योतिषी - आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२. 

Wednesday, April 17, 2019

यंत्र विभाग : सुखसमृद्धी यंत्र


सौ. केळकर (नाव बदललेले आहे) यांनी फोनवर त्यांची व्यथा सांगितली. तस पहिला तर त्या एक निवृत्त शिक्षिका आहेत. वानप्रस्थापनाचे  त्यांचे दिवस. दोन तरुण मुले. एक मुलगा आणि मुलगी. दोघेही नोकरी करतात. मुलीचे लग्नाचे अजून जमत नाही. त्यांना पेन्शन मिळतंय, मुलेही कमावती आहेत. त्यांचे यजमानही पेन्शनर आहेत. म्हणजे एकूण आर्थिक स्थिती चांगली म्हणता येईल अशी, पण तरीही त्या सध्याच्या परिस्थितीत समाधानी नाहीत. मुलीचे लग्न चांगल्या घरात व्हयला हवे. मुलाला प्रमोशन वगैरे मिळायला हवे. सर्व सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्या इच्छा. घरात पैसा टिकत नाही. सतत छोट्या छोट्या कारणावरून मुलांशी, नवर्याशी वाद होत राहतात. एकूण परिस्थिती तशी हाताबाहेर नाही गेलेली पण अवस्था अशी कि सुखी माणसाचा सदरा शोधण्याचे मनसुबे रचणे चालले आहेत. घरात सतत भांडणे होत असतील. आजारपण असेल, कार्यात सतत अपयश येत असेल, महत्वाची कामे अडलेली असतील, परस्पर संबंध बिघडलेले असतील, अथक परिश्रम करूनही यश मिळत नसेल, तर अशा परिस्थितीत घरात सुख समृद्धी यंत्राची विधिवत स्थापना करून नित्य पूजन करत राहावे. त्यामुळे निश्चित लाभ होतात असा माझा अनुभव आहे. 


आपणासहि सिद्ध केलेले सुख समृद्धी यंत्र हवे असेल तर खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर विनासंकोच संपर्क करा. सिद्ध यंत्र घरपोच कुरिअरने पाठवले जाईल.

ज्योतिषी.
श्री. आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२ 

Thursday, April 4, 2019

स्तोत्र विभाग : अद्भुत सामर्थ्यशाली श्री राम रक्षा स्तोत्र - असे करा सिद्ध


नमस्कार वाचकहो, 

सर्वप्रथम गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

स्तोत्र मंत्राच्या अध्भूत दुनियेत तुमचे मनःपूर्वक स्वागत. आपल्यापैकी अनेकजण नियमित काहीना काहीतरी साधना करतात. जपजाप्य, व्रतवैकल्य, पोथीवाचन इ. काही उपासना या काम्य असतात तर काही निष्काम. कुठल्याही उपासनेच विहित फळ आपल्याला अपेक्षित असत. प्रत्येकाचे एक विवक्षित आराध्य दैवत असतं. कोणी दत्त उपासक आहेत, कोणी देवी उपासक आहेत, कोणी हनुमान  भक्त आहेत, कोणी कृष्ण भक्त, कोणी श्री स्वामी समर्थांची उपासना करतात, कोणी श्री गणेशाची उपासना करतात तर कोणी श्री रामाचे उपासक आहेत.  आपल्या जन्म लग्न कुंडली वरून आपले उपास्य दैवत कोण आहे हे ठरवता येते. तसेही कोणा ना कोणा तरी भगवंताच्या अनेक रूपांपैकी एखादे आपल्याला विशेष भावते. आपल्या ऋषी मुनींनी या दैवतांचे विविध स्तोत्र व मंत्र मानव जातीला उपहार स्वरुपात दिले आहेत. कित्येक जन त्याचा प्रापंचिक आणि पारमार्थिक तसेच पारलौकिक लाभ घेत आहेत. पुराणात असे म्हटले आहे कि कुठल्याही स्तोत्र अथवा मंत्राची उपासना करावयाची असल्यास त्या स्तोत्र अथवा मंत्राचे विधान असते त्याप्रमाणेच ते करावे लागते तरच त्याचा पूर्ण लाभ घेता येतो. 'मंत्राधीनम देवता' याचा अर्थच असा कि देवता या त्या विवक्षित मंत्राच्या अधीन असतात. 'मननात त्रायते इति मंत्र' याचा अर्थ असा कि ज्याचे मनन केले असता तो तारतो तो मंत्र. थोडक्यात म्हणायचे झाले तर मंत्र किंवा स्तोत्र हे सिद्ध करावे लागतात तरच त्यांचा लाभ होतो. 

रामरक्षा स्तोत्र. अतिशय अध्भूत आणि सामर्थ्यशाली असे हे स्तोत्र आहे. विष्णुसहस्त्रनाम या स्तोत्रात असा उल्लेख आहे कि आदिशक्ती भगवती पार्वतीने भगवान आशुतोष शिव शंकरांना असा प्रश्न विचारला होता कि असे कुठले नाम आहे कि ज्याचा उच्चार केला असता संपूर्ण विष्णुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळेल? त्यावर नीलकंठ महादेव शंकरांनी असे उत्तर दिले कि 'राम' हे एकच नाम आहे ज्यामुळे सर्व पापांचा नाश होतो. पारमार्थिक आणि प्रापंचिक कल्याण होते. संपूर्ण विश्नुसहस्त्रनाम पठणाचे पुण्य मिळते. 'रामं रमेशं भजे'. 'पद्मपुराणात' याचा संदर्भ आलेला आहे. राम नामाचा महिमा असलेलं हे स्तोत्र महादेवांनी पार्वतीला एकांतात सांगितले. पुढे महादेवांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात या स्तोत्राचा महादेवांनी दृष्टांत दिला. 

सर्व पापांचे निरसन करणारे, पूर्व कर्माचे संस्कार बीज नष्ट करणारे असे हे राम रक्षा स्तोत्र आहे. त्यातील प्रत्येक अक्षर अन अक्षर श्रीरामाच्या नाम सामर्थ्याने पुरेपूर भारलेलं आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे निर्माण होणारे शक्तिशाली स्पंदन घरातील आणि मनातील नकारात्मक विचारांना, दुष्ट शक्तींना क्षणार्धात पळवून लावतात. असा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी हे रामरक्षा स्तोत्र सिद्ध करून मगच रोज ११ पाठ करणे अपेक्षित आहे. 

मूळ रामरक्षा स्तोत्र हे ११ पंक्तींचे आहे.  एकूण ३८ श्लोकांपैकी फक्त ६ श्लोकच 'रामरक्षा' म्हणून अंतर्भूत आहेत. ते खालील प्रमाणे. 

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ||
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती |
घ्राणम पातु मखत्राता मुखं सौमित्रवत्सलः ||
जिव्हां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः |
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भाग्नेशकामुर्कः ||
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजीत  |
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ||
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः |
उरू रघुत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत ||
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः |
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखीलम वपुः ||

या रामरक्षा मंत्राच्या नित्य पठणामुळे साधकाचे दुष्ट शक्तीपासून संरक्षण होते. सूक्षम असे संरक्षक कवच साधकाच्या शरीराभोवती तयार होते. अपघातापासून संरक्षण होते. ज्या साधकाने हे स्तोत्र सिद्ध केले आहे तो साधक इतरांसाठी देखील याचा (अर्थात विनामूल्य) उपयोग करू शकतो. 

रामरक्षा स्तोत्र सिद्ध करण्याकरिता चैत्र, श्रावण, अश्विन किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा या विशेष चांगल्या आहेत. १९ एप्रिल २०१९ रोजी येणारी चैत्र पौर्णिमा हि सुद्धा विशेष लाभदायक आहे. 

पहाटे सूर्योदयानंतर शौच मुखमार्जन व स्नान करून शुचिर्भूत होऊन घरातील नैमित्तिक नित्य पूजा करून झाल्यावर आसनावर उत्तराभिमुख बसावे. एका पांढर्या कागदावर सुरुवातीला ' श्री गणेशाय नमः' हे लिहावे. त्याखाली  'श्रीराम'; असे लिहावे. त्याखाली २ ओळी सोडून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र काळ्या शायीच्या पेनाने लिहून काढावे. सर्वात शेवटी ३ वेळा  ओमकार लिहावा. त्यानंतर एका पाटावर तांदूळ पसरावे. हे झाले आसन. तांदुळाच्या आसनावर तो कागद ठेवावा. त्याची पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर रक्षामंत्र ११ वेळा म्हणावा. वरील पूजा पुढील ११ दिवस तशीच ठेवावी. रोज शुचिर्भूत होऊन रामरक्षा मंत्राचा ११ वेळा पाठ करावे. पंचोपचार पूजा करावी. (पुढील ११ दिवस) बाराव्या दिवशी उपवास करावा. आसनाकरिता वापरलेल्या तांदळाचा भात करून प्रसाद म्हणून घरातील व्यक्तींनी ग्रहण करावा. त्यानंतर रोज रामरक्षेचा १ पाठ करावा. काही प्रसंगी रामरक्षेचा १, ५ किंवा ११ वेळा पाठ करून जल किंवा विभूती अभिमंत्रित करून वापरता येते. 

रामरक्षा सिद्ध करण्याच्या दुसऱ्या पद्धतीत, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सूर्योदयाला शुचिर्भूत होऊन  भस्म लाऊन राम रक्षा स्तोत्राचे संकल्पपूर्वक ११ पाठ करावेत. असे रामनवमिपर्यंत रोज करावे. आपण करार असलेली कुठलीही उपासना हि गुप्त ठेवावी. त्याची वाच्यता कुठेही करू नये. 

तर आशा करतो कि आपण या माहितीचा लाभ घ्याल. 

|| श्री राम समर्थ ||