नमस्कार मित्रहो,
कोणालाही सिद्ध यंत्र हवे असल्यास संपर्क करा. कुरिअरने घरपोच पाठवू.
ज्योतिषी - आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२.
अनेकदा असं होते कि आपली काही चूक नसताना आपण अपघातग्रस्त होतो. वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून सुद्धा आपलं किंवा आपल्या गाडीचे नुकसान होते. प्रसंगी प्राणहानी होते. मनस्ताप, शारीरिक इजा इ गोष्टी घडतात. हे टाळण्यासाठी अपघात निवारण यंत्र सिद्ध करून आपल्या जवळ बाळगले असता निश्चितच फायदा होतो. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. अत्यंत गंभीर अपघात टळला आणि मामुली खरचटणे सारख्यावर निभावलं. खाली दिलेले यंत्र आपणही एका शुभ शनिवारी किंवा पौर्णिमेला एका पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल शायीने लिहून सिद्ध करा व प्रवासाला जाताना, गाडी चालवताना जवळ बाळगा.
हे यंत्र सिद्ध करणे अगदी सोपे आहे. एकदा हे यंत्र पांढऱ्या कागदावर लाल शायीने काढून झाले कि डोळे मिटून त्यावर बोट ठेवा आणि जी संख्या येईल तेवढ्या संख्येएवढा खालील जप करा व गंध, धूप, दीप, नैवेद्य इ उपचारांनी यंत्राची पूजा करा. तर मंत्र असा - ओम अंजनीसुत हनुमान रक्षतु रक्षतु स्वास्ति
पुढे जेव्हा प्रवासाला निघाल तेव्हा ११ वेळा वरील मंत्र म्हणून सुरुवात करा. असा अनुभव आहे कि साधा ओरखडा सुद्धा येणार नाही. लांबच्या प्रवासाला निघाल तेव्हा जवळच्या मारुती मंदिरात एक श्रीफळ अर्पण करा आणि मारुतीरायाला आपणाबरोबर चलण्याची विनंती करा. प्रवास्वरून परत आलात कि पुन्हा हनुमंताचे दर्शन घेऊन त्याला धन्यवाद द्या.
कोणालाही सिद्ध यंत्र हवे असल्यास संपर्क करा. कुरिअरने घरपोच पाठवू.
ज्योतिषी - आमोद विष्णू ननावरे
७७०९५९४९०२.
No comments:
Post a Comment