Tuesday, December 22, 2015

इथे क्षणात होत्याचे नव्हते होऊ शकते!

कसला माज करतो आपण? कसला सार्थ(?) अभिमान असतो आपल्याला? सत्तेचा? पदाचा? संपत्तीचा? ज्ञानाचा? सौंदर्याचा? शिक्षणाचा? सुंदर घराचा? मी शहरात राहतो याचा? माझी बायको सुंदर आहे ह्याचा? माझी मुलं हुशार आहेत ह्याचा?
माज म्हणजे, ह्यापैकी माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून मी दुसर्याला कमी लेखतो. देवाच्या काठीला आवाज नसतो हे माहित आहे का तुम्हाला? इथे क्षणात होत्याचे नव्हते होऊ शकते. रातोरात रंकाचा राव होऊ शकतो. मी सडेतोड आहे. मला जे पटते तेच मी करतो. हे कोणाला सांगता आपण? ह्यालाच मी ताठा म्हणतो. माज म्हणतो. दुसर्याचे ते कार्ट, माझे ते मूल. मी मी म्हणणारे आले आणि गेले. काळ कोणासाठी थांबतो? काळाच्या ह्या पसाऱ्यात तुमची किंमत काय? सगळे क्षणभंगुर आहे. स्वतःच्या कोशातून बाहेर या. माज सोडा. अहंकार सोडा. नम्र व्हा. बोलते व्हा. मौनीबाबा होणे काय कामाचे? मौनं सर्वार्थ साधनं ह्याने काही साध्य होत नाही. जिथे बोलले पाहिजे, तिथे बोललेच पाहिजे. मौनामुळे गैरसमजाला थारा मिळतो. प्रसंगी एक छोटेसे हास्य सुद्धा खूप बोलके असते. तुमचा चेहरा हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवता येतेना. तसेच तुमचे एक हास्य दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आणखी एक हास्य निर्माण करू शकते. सुधारा. अजूनही वेळ गेलेली नाही. दुर्मुखलेपणा सोडा. का जळत राहायचं. का कुढत राहायचे? जाणते व्हा. कशाला कोणाचा मत्सर करायचा? त्याला जे मिळाले ते त्याचे प्रारब्ध. ते त्याचे कर्म. तुम्ही जेव्हा त्याच्यावर जळता तेव्हा तुम्हाला हे कळत नाही कि तुम्ही स्वतःचे अध्यात्मिक पतन करून घेत आहात. कशाला कुणाशी स्पर्धा करायची? त्याने काय साध्य होणार? तो सुखात असतो आणि तुम्ही गु खात बसता. त्याने गाडी घेतली झालं, तुम्हाला ज्वर चढला. तो वीक एंड ला सह कुटुंब फिरायला जातो झालं तुम्हाला फेफरे आले. त्याने एसी लावला झालं तुम्हाला पण तुमची बिलं वाढवायची आहेत. तिने छान साडी घेतली. महागातली. तुम्ही पण घेणार तुमच्या बायकोला साडी. महागातली. कोणाला दाखवायचं हे सगळ. काय साध्य करायचे. स्पर्धा हि स्वतःशी करावी. कष्ट त्यासाठी घ्यावेत. त्याच्याकडून घ्यायचे तर त्याचे गुण घ्या. त्याची शिस्त घ्या. तो कसा जबाबदारीने वागतो. तो कसा आपल्या कुटुंबाला वेळ देतो. तो इतरांशी कसा वागतो. त्याचे आदर्श काय आहेत. दुसऱ्याचा आदर करा म्हणजे तुमचा हि लोक आदर करतील. give and take. प्रेम द्या म्हणजे प्रेम मिळेल. जिथे माज आहे, जिथे मत्सर आहे, जिथे द्वेष आहे, ताठा आहे, तिथे प्रेम मिळेल? विचार करा.  तुम्ही स्वतःला साधक म्हणवता. तुमच्या तथाकथित गुरूंना भेटता. गुरु स्थानावर जाता. साधना करता. जर असे असेत तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्या ज्या वृत्ती तुमच्यात उफाळून येतात त्या शांत झाल्याच पाहिजेत. नाही. तर तुम्ही साधना भ्रष्ट व्यक्ती आहात. उगाच हि ढोंग सोडून द्या. सावध व्हा. वेळ खूपच कमी आहे. तुमची साधनेची गाडी डीरेल झाली आहे. तुमच्या गुरुंजवळ प्रांजळ पणे कबूल करा. ते कृपा करतील. निश्चित. 

Monday, November 23, 2015

साक्षीभाव

साधनारत साधकाची अत्यंत उन्नत अवस्था असते साक्षीभावात  राहणे. सहज सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर आपले विचार आणि कृती (जे आपल्याला आपले वाटतात), आपले अनुभव, अनुभूती ह्या सर्वाकडे तटस्थ त्रयस्थ दृष्टीने पाहणे. स्वतःच्या देहाकडे आणि जीवनाकडे वेगळे पणाने पाहणे म्हणजे साक्षी भाव अशी व्याख्या पुज्य बाबा बेलसरे ह्यांनी केली आहे.  एक अभ्यास आहे. साधना पथावरील प्रगतीचे काही टप्पे आहेत. हा त्या पैकी एक. समजण्यासाठी थोडे अवघड आहे तरी इथे लिहितो. साधनारत असताना आपल्या उपास्य दैवाताशी जेव्हा साधक एकरूप होतो तेव्हा त्याला साक्षीभावाचा  अनुभव आपोआप येतो. स्वामी रामतीर्थ ह्यांचे उदाहरण घेऊया. त्यांना जेव्हा भूक लागायची तेव्हा ते म्हणायचे रामाला भूक लागली. तहान लागली तर म्हणायचे रामाला तहान लागली. बाहेर जायचे असले कि रामाला आज फिरायला जायचे आहे. थंडी असली कि, काल खूप मजा आली राम थंडीने अगदी कुडकुडत होता. कोणी काही अपमानास्पद बोलले तर म्हणायचे आज रामाचा अपमान झाला.  व्याकरणाच्या भाषेत सांगायचे तर ते सतत तृतीय पुरुषात बोलायचे. त्यांचा एक नवीन शिष्य गोंधळून गेला. त्याने स्वामी रामतीर्थांना  विचारले. असे का? ते म्हणाले. "मी आणि माझे शरीर वेगळे आहोत. " "भूक, तहान, इच्छा वगैरे शरीराच्या आहेत."
साधनेच्या ह्या प्रवासात साधकाचे शरीराचे आणि त्याच्याशी संबंधित अथवा संलग्न गोष्टींचे ममत्व रहात नाही. तो विरक्त होतो. एका उपास्य दैवता शिवाय त्याला कशाशीही कर्तव्य रहात नाही. स्वामी रामतीर्थांची  अवस्था अशीच होती.
ह्या साक्षी भावाची काय आवश्यकता आहे? कारण साक्षी भावाचा कर्माशी घनिष्ट संबंध आहे. आपण सतत काहीना काहीतरी कर्म करत असतो. एका कर्मातून दुसरे कर्म निर्माण होते. काहीही न करता स्वस्थ राहणे हे देखील कर्मच. कारण कर्मावाचून ह्या जगात जीवाची सुटका नाही. अनैच्छिक कर्म सुद्धा असतातचकी उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या नकळत होणारे पचन, रक्ताभिसरण, पापण्याची हालचाल. तर हि कर्माची साखळी निर्माण होते त्यामुळेच जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कर्म भोग भोगण्यासाठी. कर्म मग ते चांगले असो कि वाईट. पुनर्जन्माचे कारण बनते. भगवान श्री कृष्णांनी गीतेमध्ये ह्यासंबधी भाष्य केले आहेच.


युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते॥५- १२॥

ह्याचा अर्थ आता सांगतो.

आपण काहीतरी काम करतो त्यापासून काही तरी आपल्याला साध्य करायचे असते. जे साध्य करायचे ते कर्मफल. पण साधक जर कर्म फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत असेल तर त्याला कर्म योग प्राप्त होतो. थोडक्यात परा शांती. मोक्ष. किव्वा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर साधनेची सफलता. मुक्ती. त्याउलट जर साधकाने कर्म फळाची अपेक्षा ठेवली तर? तर तो त्या कर्माशी व कर्म फलाशी  बांधला जातो.  त्यातून दुसरे कर्म जन्म घेते आणि मग पुनरपि जननम. पुनरपि मरणं. कारण क्रम फळ मिळणे न मिळणे हे जीवाच्या हातात नसते.म्हणून कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याकरिता साधकाला साक्षीभावाचा  अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. ह्याला आणखी एक उपाय आहे. संपूर्ण शरणागती. जे काही कराल ते तुमच्या उपास्य दैवताला अर्पण करा. तुमच्या प्रत्येक कृतीला तुमच्या उपास्य दैवताचे अधिष्ठान असू द्या. परम पुज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात ना - राम हा कर्ता. भावना अशी असू द्या कि आयुष्यात जे काही चांगले आहे ती त्याची (रामाची) इच्छा. जे काही वाईट आहे ती त्याची (रामाची) इच्छा. त्याने ठेवले तसे राहावे. त्याने जे दाखवले ते पाहावे. त्याने जे ऐकवले ते ऐकावे. अशाप्रकारे आपोआप एक समज निर्माण होते. जे रामाला आवडणार नाही ते तुम्ही कसे कराल? जे तुम्हाला रामापासून दूर नेईल त्याचा तुम्ही अंगीकार कराल काय? अशाने मग कर्म आपोआप सुधारतील. साक्षी भाव हा आहे सोडून देण्याचा मंत्र. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण निरनिराळी कामे करतो. करावी लागतात त्यांच्या फळ स्वरूप आपल्याला सुख, दुःख, मान, अपमान, अशा, निराशा, यश, अपयश, राग, द्वेष, मोह इत्यादी वृत्तींचा सामना करावा लागतो. ह्या सर्वातून स्थिर होण्यासाठी आहे साक्षीभाव. हाच सोडून देण्याचा मंत्र आपणास मुक्तीचा आनंद देऊ शकतो. कुठल्याही पाशात ना राहता.
ह्याचा अभ्यास करायलाच हवा. कठीण आहे. अशक्य नक्कीच नाही. तूर्तास आपली राजा घेतो. आणखी बऱ्याच अध्यात्मिक गुणांची चर्चा करूया. तो पर्यंत.. श्री राम राम राम | श्री राम राम राम | श्री राम राम राम |

टीप: ह्या संबंधी तुमचे काही प्रश्न असल्यास कृपया नक्की विचारा. सूचना असल्यास स्वागतच आहे. अगदी टीका देखील करू शकता. धन्यवाद.

Happy Chanting

This world. enitire world. your and mine. what we see through our eyes. What we hear through our ears. What we experience. What it appears to us. This world. a Universe. There is a cosmic mind behind this universe. How does this mind appear to us? How does it exist? This appears through it's vibrations. Millions of thoughts dwells in that cosmic mind. Thoughts which are deserted by millions of people. When a person thinks, his thought gets merged in the thoughts of the cosmic mind. a curl of similar thoughts and vibrations smudges around him. It creates an atmosphere of those thoughts around him. If he thinks good, the curl of good thoughts is attracted towards him . Likely If he thinks bad, he attracts bad. This is the secret. If you think good for somebody, good will happen to you. If you think bad for somebody, bad will happen to you. That is why think good. Do good. And Chant Hari Naam. Naam has a tremendous power to create divine excellent curl of thoughts and environment around you. So. Happy chanting.

Monday, November 9, 2015

Being Positive!!!

I watched a TV program about positive thinking today. off course such programs are aired on National Geographic channel. It was about a case study of the impact on the performance of being positive. Many Gurus have been telling us since long to be positive. Think positive. Do positive etc. But somehow we come across a sort of situation that makes us down. We become Erratic, confused or depressed which changes our perspective towards seeing the things. It changes our attitude, approach towards things. Our mind entertains negative thoughts. It impacts on our decision making process and the situation may goes worse.
A group of people were asked a question. What kind of thought comes into your mind first when a telephone rings in the mid night? most of the people reacted the same way. Who died? No body did think that a friend may have called for an outing in the moon light. This is an instance of negative thinking.
Research concludes that people who think positive, attracts good luck, health, money, success and  harmony in relationships. Let me share some day to day examples with you. It is 12:47 PM in the clock and I have to catch a bus at 1 PM. the distance from my home to the bus stop is exactly 15 minutes walk. I have 3 minutes short. What do I think? Oh no! I am gonna miss the bus! again late! hell! I am disturbed. I yelled at my wife and had a small dispute while leaving for office. Obviously I began my day on a bad note. Instead, I could have thought in some different (+ve)way. Oh its just 11 minutes left and any how I must catch the bus. Let me walk fast. And it really happened, I made my mind to rush to the bus  stop and started acting on that node, I get lift from a bike rider to the bust stop. I did not miss the bus. My mid does not co operate with me. It has a habit to think negative. My boss sent me an email attached with a report and asked me to keep the print out ready in half an hour to discuss on that. It was the task of taking the print outs from the office common printer. Very instantly a thought came into my mind, Oh! will I be able to get the print out from the common printer? Will there be a paper available in the tray? who will go after the admin guy to insist on the paper if it is not there? I don't like this job. I should have though in a different way right. And see what happened, I had been to the printer bay and I found that there was no paper in the tray. I should have thought positive. The same thing happened with my colleague, But it was positive this time. He did not think much. He just thought of taking the print out any which ways. He went in the printer bay. pulled the report on that computer and gave the print command. The print out is ready. Had he found no paper in the tray, I asked him what would be his reaction? He was cool. He gave me a composed look. He said, " I would have tried later, may be after another half an hour" What a big deal?
My mind again misbehaves with me. My wife asked me to meet Mr. ABC as to collect the insurance papers from him. I instantly reacted. Will he be in his office this time? Ok. She asked me to call him and see if I can meet him in his office this time. Very next though came into my mind. Will he pick up my phone. (because he is a very busy person) and both of us ended with a quarrel. I was very upset on her statements. Her behavior. and so on. How negative person I am. I did not visit to my friend's home on the occasion of pooja a religious ceremony. why? because he did not invite me. Though I was aware that he had talked to me some 10 days ago that he is planning to   take this function at his home and cordially had asked me to visit. Even though I was reluctant to visit his place why? simple. He did not officially invite me. Ego. Most of us are leading this kind of life. Isn't it?
In the TV show 2 clips were shown. each clip was 8-10 seconds long. A man was shown traveling in the metro train in both the clips. However the background music was different. On the basis of the clip a group of people were asked to make out the story of on the man's state of mind. In the first clip the background music was like dull, slow and boring, tedious. In the second clip the back ground music was fast, zealous & elated. Obviously though the clip was same. The first clip, the group of people made out that the man's state of mind was sad. In the second clip the man's state of mind was joyous. It was the impact of the music. So to conclude, hear that kind of music which will make your mood fresh and you will feel energetic.
A Group of people were asked to take 10 shots to put the ball in the volleyball basket. A girl was hardly able to make any go. Then she was asked to take 10 shots more but this time with her eyes tied with a ribbon. All the other participants were asked to cheer the girl. She started putting the ball in the basket, obviously the ball did not make in to the basket, though the participants cheered and she was told by the host that she made it. this was an attempt to instill positive thoughts into her mind. She was  told and made to believe that she made 6 successful attempts to put the ball in the basket when eyes were tied blind. Then she was again asked to try 10 more shots and this time her eyes were not tied. This time she could make 5 successful shots. This proves that positive thinking does a positive impact on your mind and it enhances the quality of your overall performance.
In the another instance a couple were made to pose one of them in a sad mood and the other in a happy mood. The participant was suppose to act as if one is sad and other is happy. Good. They were given 50 dollars each for posing. Then they ware asked to bait on odd and even numbers if they win they will be given another 50 dollars and if they loose they will loose entire money. Surprisingly among the couple a lady who had posed sad did not agree to play a game of wheel and was reluctant to try on her luck, but the man happily agreed to play a game and won another 50 dollars. This is an impact of being positive on your decision making ability.  So the message is already delivered. isn't it?
The very first step toward being positive is to 'smile' at your self and then others. A good smile does not require any reason. That shows. That reflects the state of your mind. Your state of mind should be seen on your face and not on Facebook or whats up. You will see the difference. Just Smile and be positive. Make your mood. Pamper yourself. There are many ways. Music, shopping, movies, books, friends, sport, hobby, Mcdee, Domino's, Temples, Churches, pets, parents, spouse, children, orphanages, old age homes, schools, colleges, art.................. life is beautiful. Love it. Love yourself.


Wednesday, October 28, 2015

जीवनाचा खेळ

कधी कधी आपण भारावून जातो. मनाचा भारलेपणा अनुभवतो. असा अनुभव जो शब्दात व्यक्त नाही करता येत. दऱ्याखोर्यात संपूर्ण आयुष्य घालवलेल्या खेडुताला समुद्रावर न्या. अथांग दूरवर पसरलेला समुद्र पाहून त्याच्या मनाची अवस्था काय होईल? आयुष्यात पहिल्यांदा भर पौर्णिमेच्या रात्री ताज महाल पाहिल्यावर काय होईल? उंच उंच हिमाच्छादित शिखर, सुर्याकिरणात सोन्यासारखी चमकणारी शिखर पाहिल्यावर काय होईल? सुंदर फुललेलं फुल, बाळाच्या चेहऱ्यावरच निरागस हास्य. एखाद आवडतं गाणं, उगाचच घेतलेली एखादी गिरकी, मारलेली एखदी तान, काढलेलं मस्त चित्र. हि असते मनाची उन्नत अवस्था. जेव्हा मन विचारशुन्य  होतं. अशी अवस्था जिथे आपल्याला काहीच नको असतं. सर्व काही मिळाल्याची भावना. एखादी पूर्ण झालेली जुनी इच्छा. खूप खूप वर्षांनी भेटलेला जुना मित्र. त्याच्याशी मारलेल्या भरपूर गप्पा. मन ना कधी भूतकाळाचा मागोवा घेत कि भविष्यात डोकावत. अशा क्षणी अवचित स्वतःला स्वतःचा शोध लागतो. आणि हाच असतो क्षण आनंदाचा. हीच असते एक प्रकारची समाधी. पण खरी समस्या हि आहे कि मनाची हि अवस्था क्षणिक असते. शाश्वत नसते. परत पुनः आपल्या उन्नत जाणिवांचा स्तर खाली येतो आणि आपले रहाट गाडगे चालू होते. पहिले पाढे पंचावन्न. आपण पुनः तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे आपल्याला तशी अनुभूती आली होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण तसे होत नाही. ती प्रक्रिया मग कंटाळवाणी होते. कवचित पुन्हा तशी अनुभूती येते हि. हीच तर खरी मेख आहे जीवनाची. हे एक खेळ असतो A game of life.  जीवनातले हे हळवे क्षण शोधायचे असतात. मनातल्या खोल कप्प्यात जोपासायचे असतात. आठवणींची पाखरं भिरभिरणारी मोजायची असतात. हे क्षण कोणाला सापडतात तो जिंकतो ज्याला नाही सापडत त्याने शोध चालू ठेवायचा असतो जीवनाला जिंकण्यासाठी.


डोकं जरा थंड ठेवा म्हटलं !!!


)
"सुधा काकू."
सायलीने घरातूनच हाक मारली.
"आज रात्री सगळ्यांनी टेरेसवर कोजागिरी साजरी करायची आहे. तुम्ही येणार ना?"
सोसायटीतल्या सगळ्या बायका थोडे पैसे जमउन रात्री टेरेस वर कोजागिरी साजरी करणार असल्याचा निरोप सायलीने समोरच्या विंग मधला सुधा काकुना दिला.
"कधी ठरले? कधी झाली मीटिंग? मला का नाही बोलावले? "
"मी काही नाही येणार"
नुकताच वाळत घालायचा कपडा जोराने झटकत काकुनी दोरीवर वाळत घातला आणि आत निघुन गेल्या.
वास्तविक काही मीटिंग अशी झालीच नव्हती. सगळ्याजणी पैकी एक दोघींनी पुढाकार घेऊन ठरवलं होत आणि आवश्यकता भासल्यास मिटिंग घेणारही होत्या. त्यात सुधा काकू ह्या चौथ्या मजल्यावर राहतात. वय साधारण ६० च्या आसपास. त्यांच्या विंगला लिफ्टही नाही. म्हणून काही ठरण्या अगोदरच जर निरोप द्यावा म्हणून सायली ने निरोप दिला शिवाय कशाला काकुनी एवढे माजले उतरा चढा.

)
मिलिंदने त्याच्या इकोनोमिक्स च्या नोट्स वीणाला द्यायच्या कबूल केल्या होत्या. दोघेही अत्यंत जवळचे मित्र. वीणा तर त्याची जीवश्च कंठश्च मैत्रीण, पण मिलिंदने त्या नोट्स परस्पर निधीला दिल्या कारण तिची क्लास मध्ये दुसर्या दिवशी परीक्षा होती. मिलिंदच्या मते निधीला त्याची जास्त गरज होती. दिवस झाले मिलिंद आणि वीणा एकमेकांशी बोलत नाही आहेत.

)
निकम आणि साटम सोसायटीच्या कमिटीवर खजिनदार आणि सचिव म्हणून काम पाहतात. दोघांमध्ये खूप चांगल जमत अस सोसायटीतील इतर लोकांना वाटत.
"हलो! साटम. मी आलोय घरी. तुम्ही कुठे पोहोचलात?"
निकमना कमिटी मिटिंग घ्यायची होती. त्यामुळे दोघांचे एकत्र बसून काही महत्वाचे बोलणे भात होते. निकम आज जर लवकरच कामाहून घरी आले होते. आल्या आल्याच सौ. निकमनि त्यांना वन समान आणण्याकरिता बाहेर जायला सांगितले होते. पण साटम बरोबर असून महत्वाचे बोलायचे असल्यमुळे निकमनि ती सूचना धुडकाऊन लावली होती.
" मी पोचलोय बोरीवली पर्यंत, एक तास लागेल घरी पोचायला"
"बराय, घरी आलात कि फोन करा मी वाट बघतो."
दोघांचा असा संवाद झाला.
निकम बराच वेळ घरी वाट पाहत राहिले. साटम आलेच नाहीत
रात्री अमळ उशिरा निकम यांनी फोन केला.
"हेलो, आलात का घरी"
"हो"
"कधी आलात"
" एक तास झाला"
"मग फोन का नाही केलात?"
"मी खूप दमलोय, उद्या भेटू. गुड नाईट"
जवळपास महिने झाले सोसायटीची कमिटी मिटिंग नाही झालेली.
निकम आणि साटम दोघेही एकमेकांना भेटले नाहीत.

)
सकाळचे वाजले होते. अरुणला कशी काय पण आज जर लवकरच जाग आली.
डोळे चोळत आणि जांभय देत तो निलूच्या रुममध्ये आला. निलू अजून छान आणि गाढ झोपली होती. मस्त उठावं  आणि गरमागरम चहा घ्यावा म्हणून अरुणने चहाचे आधण स्टोव्हवर ठेवले. दात घासले आणि निलूला उठवायला गेला. छान एकत्र चहा घेऊन भल्या सकाळी फिरायला जावे असे अरुणला वाटत होते. झालं भलतंच, निलू भलतीच करवादली. झोपेतून उठवले म्हणून अरुणाला नाही नाही ते बोलली. आज काळ अरुण एकटाच जातो फिरायला. बऱ्याच अशा काही घटना घडल्या आहेत कि दोघांनी डिवोर्स फ़ाइल केलाय. 


मनाच्या खोल तळाशी कुठेतरी सतत काळजी वास करत असते. विवंचना, चिंता, घोर, हुरहूर हे काही समानार्थी शब्द. कळत नाही कधी कधी कसली चिंता, कसली काळजी. सतत एका प्रकारचे भय पाठलाग करत राहते. असुरक्षितता, अस्थैर्य, सुटलेली कोडी, सुटलेले प्रश्न, राग, उद्वेग, संताप, अपमान, काही कारणाने मनाचा तळ ढवळला गेला कि हे सर्व उसळून वर येत. जर हातात पैसा असेल तर जीव निरनिराळ्या व्यसनामध्ये आपले सुख शोधतो. जिथे मिळेल तिथे, जसं मिळेल तसं सुख ओरबाडून घेतो. सत्ता असेल तर दुसर्याची पिळवणूक करण्यात जीवाला आसुरी आनंद मिळतो. विकृत आनंद मिळतो. आणि ह्या चक्रात तो वाहत जातो अजून कर्म निर्माण होत राहते. संचित जमा होत राहते आणि कर्म भोग अटळ होतात. पुण्याई संपली कि भोग भोगावे लागतात. नियतीचा फेरा अतर्क्य असतो. सुखाच्या कल्पना हि वेगवेगळ्या असतात. सुखाच्या आड येणाऱ्या व्यक्ती  किंवा परिस्थिती आपल्याला खल नायक वाटतात. आपण त्याचा पूर्ण बिमोड करण्याचा प्रयत्न करतो. तसं करता येत नसेल तर आपण त्या व्यक्ती किंवा परिस्थिती पासून पळ काढतो. एक तर त्यातून भीती निर्माण होते. दहशत निर्माण होते आणि आपण हतबल होतो. निराश होतो. हे जे होणे आहे एका मनस्थितीतून दुसर्या मनस्थितीत जाणे, मी आत्ता आनंदात आहे. माझ्या बॉसने मला सुट्टी नाकारली. मला त्याचा राग आला. त्याच्या बाबतीत घडलेल्या सर्व अप्रिय घटनांच्या स्मृती पुन्हा मनाच्या काठावर आल्या. राग आणखी वाढला. मी बॉसला अद्वातद्वा बोललो. मी काय केलं? मी माझी प्रतिक्रिया व्यक्त केली. स्वाभाविक प्रतिक्रिया.इथे माझे मनस्थिती बदलली. आपण काय करायला हवं? सर्व काही अवलंबून आहे आपल्या प्रतिक्रियेवर. जशी आपली प्रतिक्रिया तसा त्याचा परिणाम. नातेसंबंध जोपासताना, आपलं स्वतःशी सुद्धा एक नात असतं.  आपण आपल्या प्रतिक्रियांकडे जाणीव पूर्वक लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण त्यावर विचार करू तेव्हा तसा विचार करण्याची सवय आपल्याला लागेल. आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्या अगोदर हि प्रक्रिया आपल्या मनात पार पडली पाहिजे. म्हणतात ना जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ मग काय सगळ साध्य होईल. पण इथे आपल्या आतल्या संघर्षाचे काय? स्वतःचाच स्वतःशी जो संघर्ष चालू आहे त्याचे काय? इथे साक्षी भाव कामाला येतो. स्वतःच्या विचारंकडे त्रयस्थ सारखं पाहणे. विचार येतात आणि जातात. जे बदलण्यासारखे नाही ते बदलण्याचा व्यर्थ खटाटोप कशाला? म्हणून म्हणतात ना जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. कसं? अभ्यास. साधना. सद्ग्रंथांचे वाचन. सत्पुरुषांचा सहवास. सद्विचारांचे चिंतन आणि मनन. नाम स्मरण. नामाचे अनुसंधान. ध्यान आणि संपूर्ण शरणागती. कठीण आहे पण अशक्य नाही. बघा विचार करा!