निताचे (नाव बदललेले आहे), whats app वरील messages वाचून अतिशय वाईट वाटलं, अरे चाललंय काय आज काल? अवघ्या २ वर्षापूर्वी तिचा प्रेम विवाह झाला होता. दोघे नवरा बायको अगदी २-३ महिन्यापुरीच मला भेटली होती. दोघेही एकमेकांबरोबर खुश होती. त्यांना काही आर्थिक समस्या होती म्हणून ती माझा सल्ला घेण्यासाठी आली होती. माझ्यापरीने त्यांना मी काही उपायहि दिले होते अचानक तिचे मेसेजेस वाचून मला तर धक्काच बसला. अगदी अचानक एका सकाळी तिचा नवरा ऑफिसला जातो सांगून जो निघाला तो घरी परत आलाच नाही. फोन नाही, मेसेज नाही, काही निरोप नाही. त्यांच्या एका मित्राकडून कळले कि हा पुण्याला निघून गेलाय. तिथे त्याने एक जॉब अटेंड केलाय आणि आता तो पुण्यातच राहणार. नीताने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मेसेजेस पाठवले पण काही उपयो नाही. हि इथे हवालदिल झाली. जबरदस्त मानसिक धक्का बसलेल्या अवस्थेत तिने मला फोन केला आणि सगळी कर्मकहाणी सांगितली. साधारण ७-८ दिवसांनी तिचे त्याच्याबरोबर फोनवर बोलणे झाले, तो एवढाच म्हणतोय, त्याला तिच्याबरोबर राहायचं नाही. बस्स ! नो रिजन ! असे होते का? नीताने घरासाठी व इतर कारणासाठी लोन्स घेऊन ठेवली होती. लोनचे हप्ते फेडण्यासाठी तिचा पूर्ण पगार खर्च होत होता. तिच्यावर तिच्या वृद्ध आईची जबाबदारी होती. हे असं का होतं? चूक कोणाची हे न पाहता तिच्या कुंडलीच विश्लेषण करायचं मी ठरवल. पहिल्यांदा तिला धीर दिला. मी म्हटलं, होल्ड! आधी आपण कुंडली पाहू. मग ठरवू पुढे काय करायचं ते.
वैवाहिक जीवन आणि पती हे कुंडलीमध्ये सप्तम स्थान आणि सप्तमेश तसेच वैवाहिक सुखाचा कारक शुक्र यावरून पाहिले जाते. वरील जन्म लग्न कुंडलीत सप्तमावर निचेच्या बुधाची दृष्टी आहे. सप्तमेश स्वतः बुध आपल्या मीन या नीच राशीत आहे. म्हणजे बिघडला. वैवाहिक सुखाचा कारक शुक्र जरी स्वराशीत असला तरी हर्षल व वक्री शनीच्या पूर्ण प्रतियोगात आहे. शनीच्या दृष्टीत आहे. शिवाय शुक्राचा नेपच्यून व मंगळाबरोबर षडाष्टक योग आहे. नवांशात सुद्धा सप्तमेश बुधाची मीन या नीच राशीत हर्षलबरोबर युती. हर्शल म्हणजे अकस्मात आणि अचानक काहीतरी घडवून आणणारा ग्रह. जन्म लग्न कुंडलीत रवी राहू पितृदोष आणि वाचा दोष दर्शवतो कुटुंब स्थान बिघडले. भाग्यातली शनी हर्शल युतीही अडचणीची. नवांशात शुक्र राहू युती वैवाहिक सुख कमालीचे बिघडवते. सध्या शनी (जून २०३३ पर्यंत) महादशेत बुधाची अंतर्दशा (फेब्रुवारी २०२० पर्यंत) व राहूची विदशा (मे २०१९ पर्यंत) चालू आहे. आता पुढे असा प्रश्न आहे कि नीताला हा त्रास कधी पर्यंत होत राहील? तिची यातून सुटका होईल का? तिचे तिच्या नवर्याशी संबंध सुधारतील का? नीताचा घटस्फोट होईल? कि ती तिच्या नवऱ्यापासून विभक्त राहील? आणखी खोलात जाण्यासाठी कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे विश्लेषण करूया.
सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी : बुध.
बुध : - १, ७, ४.
बुधाचा नक्षत्र स्वामी - बुध : - १,७,४.
बुधाचा उपनक्षत्र स्वामी - शनी : - ८, ११, १२.
शनीचा नक्षत्र स्वामी - शनी. म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी राहू : - ७, १, २, ९, १०.
अशाप्रकारे बुध हा १, ८, १० व १२ या विवाह विरोधी स्थानांचा कार्येश झाला असल्या कारणामुळे नीताला त्रास होतोय.
महादशा स्वामी : शनी.
शनी : - ८, ११, १२
शनी स्वतःच्याच नक्षत्रात आहे म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी राहू : - ७, १, २, ९, १०
राहूचा नक्षत्र स्वामी - केतू : - १०, ७, २, ९, ८, ३
शनी व राहू सुद्धा विवाह विरोधी स्थानांचा कार्येश होतो आहे.
म्हणजे बुधाची अंतर्दशा आणि राहूची विदशा एकूण त्रासदायकच जाणार !
राहूच्या विदाशेनंतर गुरूची विदशा सुरु होईल. मे २०१९.
गुरु: १२, १, १०
गुरु स्वनक्षत्रात.
गुरूचा उपनक्षत्रस्वामी : शनी : - ८, ११, १२
गुरु महाराज सुद्धा मदतीला नाहीत. पुढच्या शनी विदशा आणि केतू अंतर्दशा सुद्धा त्रासदायकच आहेत. उलट केतू अंतर्दशेत घटस्फोटाचे योग आहेत. तृतीय स्थान सिग्निफाय झालय म्हणजे त्रासात आणखी भर पडणार.
पुढे येणाऱ्या दशा अंतर्दशा या वैवाहिक जीवनात अस्थैर्य निर्माण करणाऱ्याच आहेत.
थोडक्यात अत्यंत नाईलाजाने म्हणावस वाटत, तिने चांगल्या वकिलाचा सल्ला घ्यावा. अर्थात प्राप्त परिस्थितीत तिला मानसिक, नैतिक आणि सामाजिक आधार मिळावा म्हणून काही उपाय दिले आहेतच. तिच्या नवऱ्याच्या कुंडलीत दशा स्वामी आणि अंतर्दशा स्वामी हा पंचमाचा बलवान कार्येश झाल्याचे आढळले. सुज्ञास सांगणे नलगे!! सर्व डिस्कस करून झाल्यावर बाई म्हणाल्या नवऱ्याचे बाहेर लफडे असावे असे तिला वाटते. आता बोला.
जन्म तारीख: ३ मे १९८६
जन्म वेळ : पाहते ०४:००
जन्म ठिकाण : अंधेरी मुंबई
जन्म तारीख: ३ मे १९८६
जन्म वेळ : पाहते ०४:००
जन्म ठिकाण : अंधेरी मुंबई
दोन तासांनी तिच्याशी बोलल्यानंतर बाई म्हणाल्या कि त्यांनी नवरोबाला एक नोटीस आधीच पाठवली आहे. मनाचा पेटारा असा हळू हळू उघडत होता. मी मनात म्हटलं बरे झाले तीच तिनेच सांगितलं नाहीतर म्हणतात ना, बादशहाचा पोपट मेला होता हे त्याला सांगायचं कसं?
ReplyDeleteप्रिय वाचक मित्रहो, आपण वाचून कमेंट केलीत तर मलाही हुरूप येईल. तर चालावाकी बोटं कीबोर्डवर .... आणि हाना कमेंट!!
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteNice sir khip chan
ReplyDeleteSend me your email ID..
ReplyDeleteamodnanavare@gmail.com
Deleteवाचताना माझीच परिस्थिती समोर आली..... अगदी समेs चालू माझ्या बाबतीत
ReplyDeleteकाहीवेळा आयुष्यात अत्यंत कठोर निर्णय घ्यावे लागतात. प्रत्येक महिलेत एक दुर्गा असते तिने हे तिचे रूप वेळेला प्रकट करायलाच हवे. नवरा चुकीचे वागत असेल तर त्याला वठणीवर आणायलाच पाहिजे. हे चालणार नाही असे ठणकावून सांगायलाच पाहिजे. आज सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत. आजची स्त्री हे अबला नसून सबला आहे. शिवाय संघर्ष आह प्रत्यक्ष देवाला सुद्धा चुकला नाही, तिथे मानवाची काय कथा. त्याग, प्रेम अवश्य करावे पण ते योग्य व्यक्तीवर. आंधळेपणाने केलेले प्रेम कुचकामी ठरते. चांभाराच्या देवाला..... पूजा लागते. तुम्हास परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना.
ReplyDeleteअतिशय योग्य म्हणालात.
Deleteसुंदर माहिती
ReplyDeleteयावर काही उपाय
ReplyDeleteविवाहित महिला, ज्यांना अशा परिस्थितीतून जावे लागते अशांनी आपल्या मंगळसूत्राची पंचोपचार पूजा करावी. कुलस्वामिनीची उपासना करावी. निश्चित फरक पडतो.
ReplyDelete