Tuesday, December 24, 2019

ज्योतिष: कुंडलीतला शुक्र







कुंडलीतला शुक्र.

एखाद्याचं आयुष्य अतिशय कंटाळवाण, निरस असतं. रंगहीन, दिशाहीन..... आळसावलेल.... कशातच मन रमत नाही. नैराश्य, काळजी, चिंता, उन्माद... बिघडलेले नातेसंबंध, हात लाऊ तिथे माती, पैशाचा अभाव, असला तर टिकत नाही, ढोर मेहनत करून सुद्धा हाती काहीच लागत नाही. आर्थिक, वैचारिक दारिद्र्य, व्यसनिपणा, एकलकोंडेपणा, अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त. लाईफ मे चार्म नही, स्पाईस नही, अस्वच्छता, नखे वाढलेली, दाढी वाढलेली, मळलेले कपडे, अंघोळ करावीशी न वाटणे, लोकांशी दुर्वर्तन करणे, कोणात मिसळणे नाही, घरात सर्वत्र पसारा, गरजेच्या वस्तू जागेवर नाहीत, पत्नीशी बिघडलेले संबंध, अनैसर्गिक किंवा अति प्रमाणात असलेले लैंगिक संबंध, विवाहबाह्य संबंध, आक्षेपार्ह किंवा अनपेक्षित लैंगिक वर्तन किंवा सवयी, लैंगिक आजार, रसिकतेचा अभाव, अति प्रमाणात कामुकता, अशी व्यक्ती मित्र म्हणून, पती किंवा पत्नी म्हणून आपल्या आयुष्यात असेल तर निश्चितच ते आपल्याला त्रासदायक ठरते. उपासना, भक्ती, सद्गुणांचा अभाव, महत्वाकांक्षेचा अभाव, बस आला दिवस ढकलायचा........ असे काही असेल तर समजा आपल्या कुंडलीत शुक्र बिघडला आहे. भारतीय ज्योतिष शास्त्रात शुक्र या ग्रहाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्यक ग्रह हा काही ठराविक गोष्टींचा कारक असतो. काही गोष्टी या त्या त्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. तसा प्रामुख्याने स्त्रीत्वाचा, तारुण्याचा, वैवाहिक सुखाचा व प्रणयाचा कारक शुक्र आहे. शरीरात भले आपल्या ताकत आहे, जोम आहे जी गोष्ट मंगळाच्या अधिपत्याखाली येते. आपण जरी बुद्धिमान असलो जी गोष्ट बुधाच्या अधिपत्याखाली येते पण जर शुक्राची साथ असेल तर त्या ताकतीचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करतो. बुद्धीचा उपयोग आपण चांगल्या गोष्टीसाठी करतो. एखादी गोष्टीचा अभाव असणे किंवा अतिप्रमाणात असणे याचा अर्थ त्या गोष्टीचा कारक ग्रह कुंडलीत बिघडला असा घेता येतो. प्रेम, विवाह, भोगविलास, समृद्धी, वाहन सुख, संगीत, नृत्य, कला, अभिनय, सुंदर वस्त्र, प्रसिद्धी, पैसा, इंद्रिय सुख, प्रतिभा, चित्रकला, मूर्तीकला, उत्तम आरोग्य, नितळ त्वचा, सर्व गोष्टींचा समरसतेने आनंद आणि उपभोग घेण्याची इच्छा व क्षमता या गोष्टींचा कारक शुक्र हे. शुक्र मोहक आहे. शुक्र मादक आहे. आकर्षक आहे. ऐहिक सुखाचा कारक आहे. सर्व सुखसोयींनी युक्त, अलिशान घर, सुंदर पत्नी, स्टायलिश वस्त्र, वाहन हे शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. जे जे म्हणून इंद्रियांना – डोळ्यांना, कानांना, त्वचेला, जिभेला, नाकाला सुख देणारे आहे ते सर्व अगदी सर्व शुक्राच्या काराकात्वाखाली येते. नाटक, चित्रपट, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने, वाद्ये, अत्तर, उदबत्ती, धूप, सुगंधी वनस्पती, मद्य, तंबाखू, सिगारेट सर्व शुक्र. प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही सौंदर्य शोधत असाल, प्रत्येक गोष्ट करताना तुमच्याकडे सौदर्य दृष्टी असेल तर तुमचा शुक्र बलवान आहे असे समजा. जर तुम्ही कलासक्त असाल, तुमच्या वृत्ती सदा आनंदित असतील, तुम्ही दयाळू समंजस असाल तर शुक्र शुभ आहे असे समजा. या शुक्राला ज्योतिष शाश्त्राच्या माध्यमातून अजून समजून घेऊया. शरीराचे म्हणाल तर डोळे, नाक, हनुवटी, घसा, गळा, स्वरयंत्र, गुप्तांग, वीर्य, बीजांड, मूत्रपिंड, मूत्राशय, गर्भाशय इ भाग शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. वृषभ आणि तुला या शुक्राच्या राशी आहेत. भरणी, पूर्वाफाल्गुनी व पूर्वाषाढा हि शुक्राची नक्षत्र आहेत. मीन हि शुक्राची उच्च राशी आहे तर कन्या हि नीच राशी आहे. बुध आणि शनी हे शुक्राचे मित्र ग्रह आहेत. सूर्य आणि चंद्र हे शुक्राचे शत्रू ग्रह आहेत. व गुरु तटस्थ मनाला जातो. कुंडलीत राहू, केतू, मंगळ या सारख्या पाप ग्रहांच्या युतीत, प्रतियोगात, पापकर्तरी योगात, दृष्टीत, राशीत, नक्षत्रात असता, अशुभ नवमांशी असता शुक्र दुषित होतो. त्यामुळे शुक्राच्या कारक फळात न्यून निर्माण होते. अशा या शुक्राच्या अशुभ परिणामांमुळे पिडीत असाल तर आपल्याला आपल्या मानसिकतेत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व प्रथम आळस झटकून कामाला लागावे लागेल. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जसे आपले एखाद्या व्यक्ती कडे काम असेल तर आपण त्या व्यक्तीकडे जातो. पण त्याआधी आपण असा विचार जरूर करतो कि त्या व्यक्तीने आपले काम करावे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो. एखादा प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला जाताना काय करेल? स्वच्छ स्नान करेल, तिला आवडतील अशा रंगाचे कपडे परिधान करेल, छानसे अत्तर लावेल. दाढी केलेई असेल, नखे कापलेली असतील, तिला आवडतील म्हणून छान फुलांचा गुच्छ  घेऊन जाईल... शुक्र. तर या शुक्राला अनुकूल करायचे असेल तर सर्वप्रथम स्वतः आणि आपल्या अवतीभवती स्वच्छता राखा. सुंदर, नीटनेटके, स्वच्छ कपडे परिधान करा. आवडीचे अत्तर लावा. खासकरून कानाच्या पाळीच्या पाठी. स्वतःचे घर सुशोभित करा. आपल्या वागण्यात साधेपणा, सौजन्य, दिलदारपणा, आदर, प्रेम, स्नेह, मार्दव, आर्जव इ गुण कसे येतील त्याकडे लक्ष द्या. आपली प्रत्येक कृती सर्वोत्कृष्ट कशी होईल यासाठी आग्रही राहा. स्त्रियांचा आदर व सन्मान करा. आळशी व्यक्तींपासून दूर राहा. कुंडलीतील अशुभ शुक्रासाठी जमल्यास रोज गायीस चारा घाला. गायीची जमेल तशी सेवा करा. तज्ञ ज्योतिष सल्ल्यानुसार हिरा हे रत्न किंवा ६ मुखी रुद्राक्ष धारण करता येते. आपल्या डेस्कवर कुठलीही शुभ्र रंगाची सुगंधित फुलं कायम असुद्या. देवी उपासना करा. हे करून पहा .. माहोल बदल जायेगा.

आपला (रंगीत)
ज्योतिषी आमोद ननावरे.

Tuesday, September 10, 2019

ज्योतिष : पाहूया नक्षत्रांचा प्रताप..

नमस्कार मित्रहो, 

आपण आपली जन्म कुंडली पाहून आपले भविष्य काय आहे हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न करतो. आपले ज्योतिर्विद आपल्याला अनेकदा असे सांगतात कि कुंडलीत राज योग आहे. पुष्कर योग आहे, श्रीमंत योग आहे. हा शुभ योग आहे, तो शुभ योग आहे वगैरे, पण असही होते कि त्या योगाची शुभ फळे आपल्याला मिळत नाहीत किंवा अत्यंत नगण्य मिळतात. आणि आपल्याला अनेक मनाविरुद्ध गोष्टींचा बराच काळ सामना करावा लागतो. सांगितलेले शुभयोग आपल्याला का फळत नाहीत याचीही बरीच करणे आहेत. एक म्हणजे ज्या ग्रहांमुळे तो शुभयोग झाला आहे त्या ग्रहाची अवस्था बाल, कुमार, वृद्ध किंवा मृत असेल तर. दुसरे तो ग्रह आपल्या नीच राशीत असेल तर, तिसरे त्या ग्रहावर एखाद्या पाप ग्रहाची दृष्टी असेल तर, चौथे तो ग्रह आपल्या शत्रू राशीत असेल तर, पाचवे तो ग्रह पाप ग्रहाच्या युतीत असेल तर, आणखी असे कि तो ग्रह तुमच्या विपत नक्षत्रात असेल तर किंवा प्रत्यरी (शत्रू) नक्षत्रात असेल किंवा वध नक्षत्रात असेल तर असा ग्रह आपल्याला अपेक्षित चांगलं परिणाम ना देता मनस्तापच देतो. उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुमच्या जन्म कुंडलीत शुक्र ग्रह हा वृषभ राशीत लाभ स्थानात आहे म्हणजे जालना पुष्कर योग आणि आता तुम्हाला शुक्राचीच महादशा चालू आहे म्हणजे या योगाचे फळ काय सांगाल? गाडी बंगला पैसे अडका, मन मरातब, छान नोकरी, मॉड छोकरी सर्व ऐहिक सुख पायाशी अगदी लोळण घेतील अशी परिस्थिती असायला हवी ना राव, पण तसे होत नाही. का? कारण तो शुक्र तुमच्या शुभ नक्षत्रात नाही ना. तर हि विपत, प्रत्यारी, वध, नक्षत्र कोणती आहेत हे आता जाणून घेऊया. 

त्याआधी नक्षत्रांची नावे त्यांचे स्वामी आणि त्यांचा क्रम लक्षात घ्या. 

१) अश्विनी केतू          १०) मघा - केतू                      १९) मूळ - केतू 
२) भरणी - शुक्र        ११) पूर्वाफाल्गुनी - शुक्र          २०) पूर्वाषाढा - शुक्र  
३) कृत्तिका - रवी       १२) उत्तराफाल्गुनी - रवी        २१) उत्तराषाढा - रवी 
४) रोहिणी - चन्द्र       १३) हस्त - चंद्र                       २२) श्रवण - चंद्र 
५) मृग - मंगळ         १४) चित्रा - मंगळ                    २३) धनिष्ठा - मंगळ  
६) आर्द्रा - राहू          १५) स्वाती - राहू                     २४) शततारका - राहू 
७) पुनर्वसू - गुरु        १६) विशाखा - गुरु                  २५) पूर्वाभाद्रपदा - गुरु 
८) पुष्य - शनी           १७) अनुराधा - शनी                २६) उत्तराभाद्रपदा - शनी 
९) आश्लेषा - बुध       १८) ज्येष्ठा - बुध                     २७) रेवती - बुध 



१) जन्म नक्षत्र : आपला जन्म ज्या दिवशी झाला त्यादिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते आपले जन्म नक्षत्र असते. आपल्या जन्म नक्षत्रापासून १० वे आणि १९ वे नक्षत्र हे आपणास अशुभ असते. म्हणजे आपल्या कुंडलीत जे ग्रह आपल्या जन्म नक्षत्रापासून १० व्या किंवा १९ व्या नक्षत्रात असतील त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत आपल्याला अशुभ फळे मिळतात. थोडक्यात त्रास होतो. उदाहरण द्यायचे झाले तर तुमच जन्म नक्षत्र जर मृग असेल तर तुमच्या कुंडलीत जे ग्रह चित्रा आणि धनिष्ठा नक्षत्रात आहेत त्यांचण्या दशा अंतर्दशेत त्रास होतो. 

2) संपत नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून २ रे, ११ वे आणि २० वे नक्षत्र हे संपत नक्षत्र म्हटले जाते. संपत याचा अर्थ संपत्ती. म्हणजेच आपल्या कुंडलीतील जे ग्रह संपत नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशेत जातकाला समृद्धी, संपत्ती, आरोग्य इ चा लाभ होतो. 

३) विपत नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ३ रे १२ वे आणि २१ वे नक्षत्र हे विपत नक्षत्र म्हटले जाते. विपत याचा अर्थ विपत्ती. संकटे, अडथळे. म्हणजे जे ग्रह विपत नक्षत्रात असतील त्यांच्या दशा अंतर्दशेत आपल्यावर संकटे येतात. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. 

४) क्षेम नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ४ थे, १३ वे आणि २२ वे नक्षत्र हे क्षेम नक्षत्र म्हटले जाते. क्षेम नक्षत्र हे शुभ नक्षत्र असून जे ग्रह क्षेम नक्षत्रात आहेत त्यांचा दशा अंतर्दशा आपणास शुभ फळ देतात. 

५) प्रत्यरी नक्षत्र: आपल्या जन्म नक्षत्रापासून ५ वे, १४ वे आणि २३ वे नक्षत्र हे प्रत्यारी नक्षत्र म्हटले जाते. हे अशुभ फळ दायी असून प्रत्यारी चा अर्थ शत्रू असा होतो. म्हणजे कुंडलीतील जे ग्रह आपल्या प्रत्यारी नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा आपणास त्रासदायक जातात. 

६) साधक नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ६ वे, १५ वे आणि २४ वे नक्षत्र हे साधक नक्षत्र म्हटले जाते. हि नक्षत्रे अत्यंत शुभ फलदायी असतात. कुंडलीत जे ग्रह साधक नक्षत्रात आहेत त्यांच्या दशा अंतर्दशा जातकास अत्यंत शुभ फळ देतात. या काळात अनेक नवीन गोष्टी प्राप्त करता येतात. 

७) वध नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ७ वे १६ वे आणि २५ वे नक्षत्र हे वध नक्षत्र म्हटले जाते. हे नक्षत्र आपणास अत्यंत पीडा दायक असते. कुंडलीत जे ग्रह वध नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा अत्यंत पीडादायक जातात. म्हणून म्हणतात, लग्न जुळवताना वधू वरांची जन्म नक्षत्रे एकमेकांपासून ७ वि, १६ वि किंवा २५ वि नसावीत त्यामुळे त्यांच्या वैवाहिक सुखात बाधा येते. 

८) मित्र नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ८वे, १७ वे आणि २६ वे नक्षत्र हे मित्र नक्षत्र म्हटले जाते. हे एक शुभ नक्षत्र असून कुंडलीत जे ग्रह मित्र नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा शुभ फळ प्रदान करतात. 

९) अतीमित्र नक्षत्र : आपल्या जन्म नक्षत्रापासून ९ वे, १८ वे आणि २७ वे नक्षत्र हे अति मित्र नक्षत्र म्हटले जाते. हे एक शुभ नक्षत्र असून कुंडलीत जे ग्रह अति मित्र नक्षत्रात आहेत त्या ग्रहांच्या दशा अंतर्दशा अत्यंत शुभ फळ प्रदान करतात. 

तर मित्रहो, शोधून काढा तुमच्या कुंडलीतील कुठली नक्षत्रे हि विपत, प्रत्यारी, वध इ अशुभ प्रकारची आहेत. कोणती नक्षत्रे मित्र, अतीमित्र, संपत इ शुभ प्रकारची आहेत. कोणते ग्रह अशुभ नक्षत्रात आहेत आणि कोणते ग्रह शुभ नक्षत्रात आहेत. आणि पुढे सोपे आहे समजा तुमचा महादशा किंवा विदशा स्वामी जर अशुभ नक्षत्रात असेल तर त्या नक्षत्र देवतेचा मंत्र रोज १०८ वेळा म्हणायचा कि झाली उपासना. आणि त्यातूनच मिळणार आपल्याला आपल्या त्रासातून मुक्ती. 

कळावे आपला (नक्षत्र) 

श्री. आमोद ननावरे
संपर्क : ७७०९५९४९०२ (व्हाट्स अँप)



जर आपणास ज्योतिष मार्गदर्शन हवे असल्यास सशुल्क मार्गदर्शनासाठी जरूर संपर्क करा.


ज्योतिष : तुमचे जन्म नक्षत्र आणि होणारे आजार व उपाय.

नमस्कार मित्रहो, 

जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याला आयुष्यात कधीच कुठला आजार झाला नाही. आपण सर्वच जण कधी न काही आजारी पडतोच. मग तो आजार कधी साधा सर्दी खोकला किंवा ताप असतो तर कधी एखादा आजार आपल्याला आयुष्यभर साथ करतो. आपल्याला कुठला आजार प्रामुख्याने होणार हे आपल्या कुंडलीत समजतेच. 

जर आपल्याला कुठला आजार प्रामुख्याने होणार आहे हे जर आधीच कळले तर आपण काही उपाय योजना करू शकतो जेणेकरून होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी करता येईल किंवा त्यासंबंधी आर्थिक तरतूद करून ठेवता येईल. आपल्या जन्म नक्षत्रा प्रमाणे आपण हे जाणून घेऊ शकतो कि आपल्याला कुठला आजार होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया. 

ज्योतिष शास्त्रात एकूण २७ नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी ग्रह मानण्यात येतो. हि २७ नक्षत्र व त्याचा स्वामी पुढील प्रमाणे. 

१) अश्वीनी - केतू
२) भरणी - शुक्र 
३) कृत्तिका - रवी
४) रोहिणी - चंद्र 
५) मृगशीर्ष - मंगळ
६) आर्द्रा - राहू 
७) पुनर्वसू  - गुरु 
८) पुष्य - शनी 
९) आश्लेषा - बुध
१०) मघा - केतू  
११) पूर्वाफाल्गुनी  - शुक्र 
१२) उत्तरा फाल्गुनी - रवी 
१३) हस्त - चंद्र 
१४) चित्र - मंगळ 
१५) स्वाती - राहू 
१६) विशाखा - गुरु 
१७) अनुराधा - शनी 
१८) ज्येष्ठा - बुध
१९) मूळ - केतू 
२०) पूर्वाषाढा - शुक्र 
२१) उत्तराषाढा - रवी 
२२) श्रावण - चंद्र 
२३) धनिष्ठा - मंगळ 
२४) शततारका - राहू 
२५) पूर्वा भाद्रपदा - गुरु 
२६) उत्तरा भाद्रपदा - शनी 
२७) रेवती - बुध 

आता आपण पाहूया कुठल्या नक्षत्रामुळे कुठला आजार होऊ शकतो त्याच बरोबर त्यासाठी उपायही आहेत. 

१) अश्विनी - डोक्याला मार लागणे, वात विकार, अर्धशिशी, पक्षाघात, निद्रा नाश, मेंदूतील रक्तस्त्राव, विस्मृती. उपाय : अश्विनी नक्षत्र ज्यांचे जन्म नक्षत्र आहे त्यांनी भरपूर दान धर्म करावा. गरिबांची, दुःखितांची सेवा करावी.

२) भरणी - कपाळाला इजा होणे, नेत्र विकार, त्वचा विकार, चेहऱ्याला सूज येणे, गुप्तेंद्रियांचे आजार. शीत विकार, मलेरिया, थायरॉईड, टॉन्सिल्सचे विकार. उपाय: गरिबांची सेवा करावी. दान धर्म करावा. 

३) कृत्तिका - तीव्र ज्वर, मलेरिया, मेंदू ज्वर, अग्निभय, रक्तविकार, अग्नी भय, जखमा. उपाय : नक्षत्र देवता मंत्राचा जप करावा. औदुंबराच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी.

४) रोहिणी - गळ्याला सूज, कफ, शीतज्वर, पाय दुखणे, ओटीपोटात दुखणे, शरीराला सूज, रक्तस्त्राव. उपाय: जांभळाच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

५) मृगशीर्ष - चेहऱ्याला सूज, चेहऱ्यावर व्रण, मल - मूत्र अवरोध, सर्दी खोकला, कर्ण विकार. उपाय: ओम सोमाय नमः या मंत्राचा रोज १०८ वेळा जप करावा. 

६) आर्द्रा - गळ्याचे रोग, टॉन्सिल्स, थायरॉईड, दमा, खोकला, कर्णविकार. उपाय: शिव उपासना करावी, पिंपळाची मुळी अभिमंत्रित करून उजव्या दंडावर बांधावी. 

७) पुनर्वसू - न्यूमोनिया,कर्णविकार, फुप्फुसाचे विकार, क्षयरोग, रक्तविकार, कंबर व डोकेदुखी, ब्रॉन्कायटिस. उपाय: रवी पुष्य नक्षत्रावर वेळूच्या झाडाची मुळी घरी आणून अभिमंत्रित करून उजव्या दंडावर बांधावी किंवा जवळ बाळगावी. 

८) पुष्य - क्षय, कॅन्सर, पायोरिया, एक्झिमा, पित्ताशय व श्वसन नलिकेचे रोग. उपाय: पिंपळ वृक्षाची पूजा करावी. पाणी घालावे. ओम अश्वत्थाय नमः या मंत्राचा जप करावा. 

९) आश्लेषा - वात रोग, श्वसन विकार, अपचन, उन्माद, स्नायू दौर्बल्य, कफ रोग. उपाय : ओम सर्पेभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 

१०) मघा - हृदय विकार, पाठीचे दुखणे, मणक्याची झीज,  किडनी स्टोन, मानसिक रोग. उपाय: वादाच्या झाडाचे पूजन करावे. वादाच्या झाडाची पारंबी / मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

११) पूर्वाफाल्गुनी  - गर्भपात, हृदयरोग, रक्तदोष, ऍनिमिया. उपाय: ओम भगाय नमः या मंत्राचा जप करावा. 

१२) उत्तरा फाल्गुनी - पाठदुखी, वात विकार, मानसिक रोग, मानेचे दुखणे, यकृताचे विकार, पित्त ज्वर. उपाय: ओम उत्तरा फाल्गुनीभ्याम नमः या मंत्राचा जप करावा. 

१३) हस्त - उदरवायु, पोटदुखी, आतड्याना सूज, अग्निमान्द्य, स्नायू दौर्बल्य, उन्माद, श्वासरोध. उपाय: ओम सवित्रे  नमः या मंत्राचा जप करावा. 

१४) चित्रा  - पोटात व्रण, पाय दुखणे, मूत्रविकार, किडनी विकार, कंबरदुखी, डोकेदुखी. उपाय: विष्णू उपासना करावी. बेलाच्या झाडाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी.

१५) स्वाती - श्वेतकुष्ट, मूत्ररोग. उपाय: शिव उपासना करावी. 

१६) विशाखा - मधुमेह, फिट्स, चक्कर येणे, मूत्राशय संबंधी विकार. उपाय: नागकेशर अभिमंत्रित करून जवळ बाळगावे.

१७) अनुराधा - रक्तस्त्राव, मूळव्याध, ऍसिडिटी, बद्धकोष्टता.  उपाय : नागकेशर अभिमंत्रित करून जवळ बाळगावे.

१८) ज्येष्ठा - श्वेत प्रदर, मूळव्याध, गुप्तेंद्रियांचे रोग, पित्त विकार, उन्माद. उपाय: ओम इंद्राय नमः या मंत्राचा जप करावा. 

१९) मूळ - कंबर दुखी, रक्तदाब, मातीभ्रंश, सायटिका. उपाय : ओम निरुतये नमः या मंत्राचा जप करावा.

२०) पूर्वाषाढा - कंबर दुखी, सायटिका, मधुमेह, श्वासरोग, शीतप्रकोप, रक्तदोष, धातुक्षय. उपाय: ओम अद्वभयो नमः या मंत्राचा जप करावा. 

२१) उत्तराषाढा - सायटिका, त्वचारोग, श्वासरोग, एक्झिमा, श्वेतकुष्ट, अपचन. उपाय: ओम विश्वेभ्यो देवेभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 

२२) श्रवण - गुढगेदुखी, त्वचारोग, कोड, क्षय, अतिसार, अपचन. उपाय: ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. 

२३) धनिष्ठा - पायाला जखमा होणे, पंगुत्व, कोरडा खोकला. ओम वसुभ्यो नमः या मंत्राचा जप करावा. 


२४) शततारका - पायाचे विकार, गजचर्म, कोड, उच्च रक्तदाब. उपाय: ओम वरुणाय नमः या मंत्राचा जप करावा. 

२५) पूर्वा भाद्रपदा - कमी रक्तदाब, घोट्याला सूज येणे, हृदयाचा आकार वाढणे. आम्र वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगणे. 

२६) उत्तरा भाद्रपदा - पायात अस्थिभंग, पायाचे दुखणे, हर्निया, उदरवात, क्षयरोग. उपाय: कडुनिंबाच्या वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

२७) रेवती - पायाचे विकार, तळव्यांची विकृती, पायाला भेगा पडणे, श्रवण दोष. उपाय: पिंपळ वृक्षाची मुळी अभिमंत्रित करून जवळ बाळगावी. 

तर मित्रहो, जन्म कुंडलीत चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते तुमचे जन्म नक्षत्र म्हणून जाणावे. तुमच्या जन्मनक्षत्राप्रमाणे तुम्हाला काय आजार होऊ शकतात त्याचा धांडोळा घेऊन त्यासंबंधी उपाय केल्याने निश्चितच लाभ होईल. 

शुभम भवतु.  

ज्योतिषी - श्री आमोद ननावरे, वसई. 
संपर्क - ७७०९५९४९०२.
सशुल्क ज्योतिष मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.

Sunday, September 8, 2019

ज्योतिष : सैन्यदल व पोलीस दल नोकरीकरिता कुंडलीत असावे लागतात हे योग.

१. तृतीयेश आणि दशमेशचे परिवर्तन होत असेल आणि षष्ठेश चा संबंध तृतीय भाव किंवा तृतीयेशाशी किंवा      दशम भाव किंवा दशमेश शी येत असेल.
२.  लग्नेश आणि षष्ठेश यांचे परिवर्तन असेल आणि दशमेश चा संबंध तृतीय भाव किंवा तृतीयेशाशी येत असेल.
३.   दशमेश आणि तृतीयेशाची युती षष्ठ भावात होत असेल आणि षष्ठेश नवम भावात असेल.
४.   दशमेश आणि षष्ठेशात परिवर्तन होत असेल आणि तृतीयेश लग्नात असेल.
५.   लग्नेश आणि तृतीयेशात परिवर्तन असेल आणि दशमेशाचा संबंध षष्ठ भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
६.   लग्नेश आणि दशमेश यांची युती तृतीय भावात होत असेल आणि तृतीयेश षष्ठ भावात असेल.
७.   कुंडली मध्ये मंगळ शुभ भावाचा स्वामी असून दशम भावात असेल आणि लग्नेशाचा संबंध तृतीय भाव किंवा
   तृतीयेशाशी  आणि षष्ठ भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
८.   षष्ठ भावात सूर्य आणि मंगळ असेल आणि दशमेशाचा संबंध तृतीय भाव किंवा तृतीयेशाशी आणि षष्ठ भाव
   किंवा षष्ठेशाशी असेल.
९.    दशम भावात सूर्य आणि मंगळ असेल आणि लग्न किंवा लाग्नेशाचा संबंध तृतीय भाव किंवा तृतीयेशाशी आणि
   षष्ठ भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
१०.  लग्नात सूर्य आणि मंगळ असेल आणि दशम भाव किंवा दशमेशाचा संबंध तृतीय भाव किंवा तृतीयेशाशी आणि
    षष्ठ भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
११.    तिसऱ्या भावात मंगळ असेल आणि त्यावर गुरु ची दृष्टी असेल आणि दशम भाव किंवा दशमेशाचा संबंध षष्ठ
    भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
१२.   नवम भावात दशमेश आणि तृतीयेशाची युती होत असेल आणि लग्न आणि लग्नेशाचा संबंध षष्ठ भाव किंवा
    षष्ठेशाशी असेल.
१३.    तिसऱ्या भावात मंगल असेल आणि लग्नेश नवम भावात असेल आणि दशम भाव किंवा दशमेशाचा संबंध षष्ठ
    भाव किंवा षष्ठेशाशी असेल.
१४.   दशम भावात लग्नेश, तृतीयेश आणि षष्ठेशाची युती असेल.
१५.  लग्नात तृतीयेश आणि षष्ठेशाची युती असेल आणि दशमेश सातव्या भावात असेल.
१६.  तृतीयेश आणि षष्ठेशा मध्ये परिवर्तन असेल आणि सातव्या भावात लग्नेश आणि दशमेशाची युती असेल.
१७. एकादश भावात षष्ठेश आणि नवमेशाची युती असेल आणि दशमेश नवम भावात असेल.
१८.  लग्नात षष्ठेश आणि नवमेशाची युती असेल आणि दशमेश आणि एकादशेशा ची युती तृतीय भावात असेल.
१९. दशमेश षष्ठ भावात असेल आणि लग्नेश आणि नवमेश यांची युती तृतीय भावात असेल.
दशमेश तिसऱ्या भावात असेल आणि षष्ठ भावात नवमेश आणि एकादशेश यांची युती असेल.

Sunday, August 25, 2019

ज्योतिष: झाली संसाराची दुर्दशा, पुढे तरी आहे का आशा?



नशिबाने तरी कशी थट्टा मांडावी! लग्नानंतर १२ वर्ष झाली तरी संतती नाही. संततीच्या इच्छेपायी विवाहबाह्य संबंधांकडे झालेला मनाचा कल, त्यातून झालेली फसगत पुन्हा त्यामुळे झालेला घटस्फोट हे थोडं म्हणून कि काय नोकरीच्या ठिकाणी आलेला चोरीचा आळ व त्यातून नोकरीवरून कमी केले जाणे. मधूनच झालेली मणक्याची दुखापत आणि सर्जरी. जातकाने विचारले आयुष्यात काही तरी राम आहे का? 

जन्मलग्न कुंडलीत मुळातच व्यय स्थानी शुक्र मंगळ व रवी युती, म्हणजे वैवाहिक सुखाचा कारक तसेच स्त्री सुखाचा कारक शुक्र बिघडला. वैवाहिक जोडीदार व विवाहाचे कारक सप्तम स्थान. सप्तमेश गुरु पराक्रमात प्लूटो बरोबर म्हणजे प्लूटो इफेक्ट. सप्तमेश बिघडला. त्यातून पुन्हा सप्तमाचा व्ययात वृश्चिकेचा चंद्र नेपच्यून, वैवाहिक सुखात बाधा.  संतती चा कारक (शुक्राणूंचा कारक) हि शुक्रच , पंचमेशही शुक्रच, शुक्र कसा बिघडला ते आपण पहिलेच,म्हणजे संतती सुखाचा बट्ट्याबोळ. दशम स्थानात शनी - राहू युती म्हणजे दशम स्थान बिघडले नोकरीत आलेला चोरीचा आळ हे त्याचेच फलित, शिवाय दशमेश गुरु प्लूटो बरोबर पराक्रमात म्हणजे याचीही त्या फलिताला जोड.  आता आपण कृष्णमूर्ती पद्धती कडे वळूया. लग्न स्थानाचा सब बुद्ध वक्री असून तो राहूच्या नक्षत्रात व राहूंच्याच उपनक्षत्रात त्याचा उप उप नक्षत्रस्वामी शुक्र उपनक्षत्र स्वामी म्हणून गृहीत धरला. बुद्ध - १०, १, २, ५  तर राहू १,१०,२,५,११,७,८,३ या स्थानांचा कार्येश होतो. शुक्र ६,१२, ३ या स्थानांचा कार्येश होतो. परिणाम म्हणजे मार्च -२०१४ या काळात नोकरीवरून कमी केले गेले. त्यावेळी शुक्र महादशा वक्री बुद्धाची अंतर्दशा आणि राहूची विदशा चालू होती. १,५,९,१२,८ हि स्थानं नोकरीला विरोधी स्थानं झाली. महादशा, अंतर्दशा आणो विदशा स्वामी हे या स्थानांचे बलवान कार्येश होतात. सप्तमाचा सब शुक्र हा ६ (सप्तमाचा व्यय), १२ व ३ या विवाह विरोधी स्थानांचा बलवान कार्येश होतोय. शुक्र चंद्राच्या नक्षत्रात आणि चंद्र देखील ६,९,१०,३ या विवाह विरोधी भावांचा कार्येश होतोय. शुक्राचा उपनक्षत्र स्वामी रवी हा देखील १२, ४ या स्थानच कार्येश होतोय म्हणजे रविचीही आशा नाही. रवीचा नक्षत्रस्वामी मंगळ ६,१२ या थानांचा कार्येश होतोय म्हणजे या व्यक्तीला आयुष्यात स्त्रीसुख नाही. वैवाहिक सुख नाही आणि तृतीय स्थान लागल्यामुळे घटस्फोट नेमका शुक्र महादशेत व वक्री बुद्धाच्या अंतर्दशेत व मंगळाच्या विदशेत चंद्र सूक्ष्म दशेत झाला. जातकाने प्रश्न केलाय, दुसऱ्या विवाहाचे योग आहेत का? दुसरा विवाह होईल का हे द्वितीय स्थानावरून पाहतात (सप्तमाचे अष्टम) द्वितीय स्थानाचा सब केतू हा ६,४,३,५,१,२ या स्थानांचा कार्येश होतोय. केतू चंद्राच्या नक्षत्रात असून चंद्र ११,६,९,१०,३ स्थानांचा कार्येश होतोय. केतूचा उपनक्षत्रस्वामी शुक्र ६,१२,३ म्हणजे चौथ्या पायरीला २,७,११ पैकी एकही स्थानाचा कार्येश होत नाही. म्हणजे दुसरा विवाह होणार नाही. दशा स्वामी रवी देखील सपोर्ट करत नाही. हि व्यक्ती म्हणाली कि सध्या एक महिला त्यांना अप्रोच होतेय. मग लिव्ह इन शिवाय आपल्याकडे काय पर्याय उरतो का! 

थोडक्यात असे कि आपल्या नशिबातच नाही हे स्वीकारणे गरजेचे तरच आयुष्यातला राम शोधता येईल. शेवटी आयुष्य म्हणजे फक्त विवाह? स्त्री? nothing other than that? 


जातक : पुरुष 
जन्म दिनांक : १०/०६/१९६८ 
जन्म वेळ : सकाळी ०६:३० मी. 
जन्म स्थळ : वेंगुर्ला (जिल्हा सिंधुदुर्ग)







ज्योतिषी श्री. आमोद विष्णू ननावरे, वसई. 
सशुल्क ज्योतिष मार्गदर्शन - पारंपरिक व केपी.
संपर्क: ७७०९५९४९०२, ९८९०७८७५०२ 

Tuesday, August 13, 2019

ज्योतिष : ज्योतीर्विदांची युती आणि परदेश गमनाला गती !!!

मुले शिकली, उच्च विद्या विभूषित झाली, छान नोकरीला लागली कि करिअरच्या एका टप्प्यावर त्यांना आणि त्यांच्या पालकांनाही परदेश गमनाचे वेध लागतात. नाशिकचे माझे स्नेही श्री. हेमंतजी रणनवरे म्हणजे एक अत्यंत निष्णात हस्तसामुद्रिक शास्त्री. गेली साधारण २० वर्षे हस्त सामुद्रिक शास्त्राचा त्यांचा गाढा व्यासंग. त्यांचा आजच सकाळी मला फोन आला. त्यांच्याकडे आलेल्या एका जातकाच्या मुलीला (नाव - आपण तिला प्रिया म्हणूया) बडोद्याला एका चांगल्या फार्मा कंपनीत नोकरी लागली. कामाचे एकूण स्वरूप पाहता परदेशगमनाचेहि चान्सेस होते असे मुलीच्या वडिलांचे म्हणणे  होते. हेमन्तजींनी प्रियाच्या दोन्ही तळ हातांचे अभ्यासपूर्वक निरीक्षण करून डिसेंबर महिन्यात म्हणजे या वर्ष अखेरीस ती कार्यालयीन कामाकरिता परदेशात जाईल असा निर्वाळा दिला. हेमंतजींनी प्रियाचे जन्म तपशील मला दिले आणि कुंडलीवरून फलादेश देण्याची आदेशवजा सूचना (प्रेमाची) केली. अर्थात ते माझे स्नेही आणि त्यातून वरिष्ठ (वयाने) असल्याने त्यांची सूचना तत्काळ अमलात आणणे अगत्याचेच नाही का!
हेमंतजींच्या मते प्रियाच्या तळहातावर रवी रेषा चांगलीच डेव्हलप झाली होती. रवी रेषेवर कुठलेही दुषित चिन्ह नव्हते. रवी रेषा हि चांगलीच स्पष्ट होती. ग्रहमालिकेतील रवी हा ग्रह (खगोल शास्त्रच्या दृष्टीने रवी हा तारा असला तरी ज्योतिष शास्त्रात त्याला ग्रह मानतात). नोकरीचा कारक, मान सन्मानाचा कारक, अधिकाराचा कारक, आरोग्याचा कारक रवी ग्रह, नोकरीत अधिकार योग असण्यासाठी कुंडलीत रवीची स्थिती बलवान असावी लागते. आणि तळहातावर रवी रेषा अशी स्पष्ट विकसित झाली म्हणजे अशा व्यक्तींचा नोकरीत आणि करिअरमध्ये उत्कर्ष होतो. साधारण वय वर्ष २४ पुढे आणखी ६ महिने या कालावधीत नोकरीचे योग हातावर स्पष्ट दिसत होते. तसेच आयुष्य रेषेवरून विकसित झालेल्या काही ऊर्ध्व रेषाही या  योगांना बळ देणाऱ्या होत्या. प्रवासाचा कारक चंद्र. प्रियाच्या हातावर चंद्राचा उंचवटा हि चांगला विकसित होता. चंद्राच्या उंचवट्यावर प्रवास रेषा चांगलीच डेव्हलप झाल्याची दिसत होती. साडे चोवीस वर्षानंतर ती अधिक क्लीअर दिसत होती. तळहातावर मंगळाचे मैदानही स्पष्ट व कुठल्याही दुषित चीन्हाविना विकसित झालेले होते. मंगळ म्हणजे आक्रमकता, चपळता, धडाडी, पराक्रम, धाडस, नेतृत्व, ठाम निर्णय घेऊन राबविण्याची क्षमता इ गोष्टींचा कारक म्हणजे तळहातावर स्पष्ट दिसत होते कि प्रिया वयाच्या साडे चोवीस वर्षानंतर नोकरीतील कामानिमित्त परदेशात जाणार!!! तो कालावधी ह्या वर्ष अखेरीस येत होता म्हणजे डिसेंबर २०१९ ! आता हाच योग कुंडलीत दिसून येतो का हे पाहण्यासाठी पामराला पाचारण करण्यात आल्याचे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल !! असो. तर प्रियाच्या कुंडलीचे  विश्लेषण करायचे ठरवले. जन्म लग्न कुंडलीत रवी सप्तमेश असून बुधाच्या मिथुन राशीत व मंगळाच्या मृग नक्षत्रात पंचम स्थानात ० अंशावर आहे. तसेच नवमांश कुंडलीत तो भाग्येश असून लाभ स्थानात तूळ (वायू तत्वाची चर राशी)  राशीत आहे. रवी बुधाच्या मिथुन राशीत म्हणजे सम (ना मित्र, ना शत्रू) राशीत. मृग नक्षत्रात म्हणजे मित्र नक्षत्रात. पंचम स्थानात म्हणजे त्याच्या श्रेष्ठ भावात. नवांशात शुक्राच्या तूळ राशीत म्हणजे शत्रू राशीत. त्यात तो विषम राशीत ० अंश २८ कला म्हणजे बाल्यावस्थेत म्हणजे पूर्ण विचारांती रवी बळ यथातथा पण अनुकूल. अगदी उच्च नाही पण मिडल Management पर्यंत नक्कीच पोहोचवेल. आता दुसरा महत्वाचा घटक म्हणजे करिअर चे कारक दशम स्थान व दशमेश. प्रियाच्या दशम स्थानात गुरु (एक नैसर्गिक शुभ ग्रह) जो धनेश व लाभेश आहे. त्यात तो १५ अंश म्हणजे युवावस्था हि एक चांगली गोष्ट. दशमेश मंगळ सप्तमात सिंह राशीत (मित्र राशीत) १६ अंश - युवावस्था हि आणखी एक चांगली गोष्ट, कारण दशमेश व पराक्रमाधिपती मंगळ मित्र राशीत. म्हणजे करिअर मध्ये चांगली प्रगती नक्कीच अपेक्षित. आता महादशा स्वामी राहू तूळेचा भाग्यात व अंतर्दशा स्वामी शनी मीनेचा धनात. त्यातून प्रवासाचा कारक चंद्र व्यय स्थानात म्हणजे परदेश प्रवासाच्या कारक व्यय स्थानात. हि ग्रहस्थिती परदेश प्रवासाला अनुकूल. मूळ कुंडलीत परदेश गमनाचे योग्य आहेत का हे कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे अधिक स्पष्ट होते. व्यय स्थानाचा उपनक्षत्रस्वामी केतू २,३,७ व् १० भावांचा कार्येश होतो. केतूचा नक्षत्रस्वामी केतू, म्हणून त्याचा उपनक्षत्रस्वामी गुरु नक्षत्रस्वामीचे कार्य करेल गुरु १,९,१२,२,११ भावांचा कार्येश म्हणजे परदेश गमनाला आवश्यक नवम व व्यय स्थान लागलंय. याचा अर्थ परदेश गमन होणार. महादशा स्वामी राहू देखील नवम वःतृतीय स्थानाचा कार्येश होतोय. तृतीय स्थान बदल दाखवते. नवम स्थान दूरचे प्रवास दाखवते. राहू स्व नक्षत्रात. त्याचा उपनक्षत्र स्वामी गुरु वरील प्रमाणे परदेश गमनाला साहाय्यभूत होतो आहेच. अंतर्दशा स्वामी शनी सुद्धा नवम व व्यय स्थानाचा कार्येश होतो. शनी गुरूच्या नक्षत्रात म्हणजे गुरूचा हि सपोर्ट. शनी मंगळाच्या उपनक्षत्रात मंगळ हि नवम व व्यय स्थान यांचा कार्येश होतो. मंगळ शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र हि ३,९,१२ या स्थानाचा कार्येश आता एवढे सगळे जण प्रियाला परदेशात पाठवणार म्हटल्यावर प्रियाचं विमान या वर्ष अखेरीस उडणारच... अर्थात प्रिया सकट!!!!







ज्योतिषी : आमोद विष्णू ननावरे, वसई - संपर्क : ७७०९५९४९०२, ९८९०७८७५०२ 
ज्योतिषी : हेमंत रणनवरे, नाशिक - संपर्क: ७७२००६६६१८, ९६३७३२३०४१

Monday, August 12, 2019

ज्योतिष : पहिल्या पत्नीने केली आत्महत्या !!!


तसा हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी. वैरयावरही असा प्रसंग येऊ नये, पण अटळ प्रारब्धाचे भोगच असे विचित्र असतील तर आपण पामर काय करणार. सदर कुंडलीचे विश्लेषण करायचे झालेच तर याला मी प्लूटो नेपच्यून इफेक्ट म्हणेन. जन्म लग्न कुंडलीत सप्तम स्थानात चंद्र नेपच्यून युती. चंद्र १ अंश तोही वृश्चिकेचा, नेपच्यून हि वृश्चिकेचा जल राशीत. अतिशय संवेदनाक्षम मन असणार. त्यात वैवाहिक सुखाचा कारक शुक्र धनात मंगळाच्या युतीत. कुंडलीत कुठेही शुक्र मंगल युती हि वैवाहिक सुखात बाधा आणते. सप्तमाचा व्ययात तूळेचा हर्षल. पंचमात प्लुटो राहू म्हणजे संतती सुखही बिघडले. एकूणच वैवाहिक सुखाच्या बाबतीत स्फोटक स्थिती आणि झालेही तसेच. सदर जातकाच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली. नवोदितांना अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून निव्वळ या हेतुकरिता या कुंडलीचे विश्लेषण प्रकाशित करण्याचे धाडस करतोय. नवमांश कुंडलीत सप्तमात मंगल तोही तुळेचा म्हणजे शुक्राच्या राशीत. सप्तमेश शुक्र पराक्रमात प्लूटोच्या युतीत, म्हणजे वैवाहिक सुख किती कमालीचे बिघडले आहे ते दिसूनच येते. पुन्हा सप्तमेश शुक्रावर नेपच्यूनची दृष्टी. कृष्णमुर्ती पद्धतीप्रमाणे सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ असून १,७ व १२ स्थानांचा कार्येश होतो. मंगल स्वतःच्याच नक्षत्रात त्याचा उपनक्षत्र स्वामी बुध आहे. तो ४,२,५ स्थानाचा कार्येश होतो. बुध रवीच्या नक्षत्रात असून रवी लाभ व चतुर्थ स्थानाचा कार्येश होतो. १, ४ व १२ हि विवाहास विरोधी स्थान आहेत. जाणकारांनी सदर लेखावर आणखी आपले मत व्यक्त करावे हि विनंती. गुप्ततेच्या कारणास्तव नाव, जन्मवेळ, ठिकाण इ तपशील दिलेले नाहीत याची नोंद घ्यावी. 


काय करणार, आलिया भोगासी | असावे सदर ||

Sunday, August 11, 2019

ज्योतिष : ....... आणि नोकरी लागली!!!


  

बायकोचा तुटपुंजा पगार. पदरात ३ वर्षाची मुलगी आणि आईकडून पैसे घ्यावे लागत असल्याची नामुष्की. गेल्या २ वर्षापासून अभयवर बेकारीची वेळ आलेली. नोकरीचा शोध चालूच होता पण यश येत नव्हते. अगोदरचा त्याचा अनुभवही तसा चांगला. आय टी कंपनीत नोकरी होती. नवीन नोकरी कधी लागणार हा प्रश्न, प्रश्न कुंडलीवरून सोडवावा म्हणून मी त्याच्याकडून १ ते २४९ मधला नंबर मागितला. त्याने नंबर दिला १२९ . १४ मे २०१९ रोजी संध्याकाळी ७:४७ मी. वसई येथे हा प्रश्न पाहिला. त्या वेळेचे रुलिंग पुढील प्रमाणे होते. लग्न: मंगळ, नक्षत्र: शुक्र, राशी: बुध, वार: मंगळ

दशमाचा सब शनी शुक्राच्या नक्षत्रात आणि केतूच्या उप नक्षत्रात आहे. केतु शुक्राच्या नक्षत्रात. शनी, शुक्र व केतू पुढील प्रमाणे कार्येश होत होते.

शनी – ६,३,१,८,५,४
शुक्र – ३,६,१,८
केतू – ६,३,१,८,२

नोकरी मिळण्यासाठी दशमाचा उप नक्षत्रस्वामी २,६,१०,११ यापैकी स्थानांचा कार्येश असावा लागतो. वरील उदाहरणात सहाव्या स्थानाबरोबरच अष्टम स्थानही ‘लागलंय’ म्हणजे नोकरी लागेल पण समाधानकारक पगार मिळणार नाही.

आता दशास्वामी पाहू.

मे २०२२ पर्यंत रवीची महादशा व मार्च २०२० पर्यंत शनीची अंतर्दशा चालू असणार आहे. रवी व शनी कशाप्रकारे कार्येश होतात ते पाहू.

रवी : रवी स्वतः सप्तमात व रवीची सिंह राशी लाभ स्थानात म्हणून रवी ७ व ११ स्थानाचा कार्येश होतो.
रवीचा नक्षत्र स्वामी – रविच आहे म्हणून त्याचा उपनक्षत्रस्वामी राहू हा नक्षत्रस्वामी म्हणून गृहीत धरायचा. राहू पुढील प्रमाणे कार्येश होतो. २,९,३,६,१२,७
राहू स्वतः नवम स्थानात आहे म्हणून तो नवम स्थानाचा कार्येश होतो. राहू बुधाच्या राशीत आहे म्हणून बुध ज्या स्थानाचा कार्येश होईल त्या सर्व स्थानाचा राहू कार्येश होईल. बुध सप्तमात आहे व त्याच्या राशी नवम व व्यय स्थानात आहेत. राहू गुरूच्या नक्षत्रात आहे म्हणून गुरु ज्या स्थानांचा कार्येश होईल त्या सर्व स्थानांचा राहू कार्येश होईल. गुरु धन स्थानात आहे व गुरूच्या राशी तृतीय व षष्ठ स्थानात आहे म्हणून राहू २,९,३,६,१२,७ स्थानाचा कार्येश झाला. राहू मंगळाच्या युतीत आहे म्हणून मंगल ज्या स्थानाचा कार्येश होतो त्या स्थानांचा देखील राहू कार्येश होईल. 

शनी: ६,३,१,८,५,४

म्हणजे नोकरीसाठी आवश्यक षष्ठ स्थानाचा महादशा व अंतर्दशा स्वामी कार्येश होतात याचा अर्थ रवीच्या महादशेत व शनीच्या अंतर्दशेत नोकरी लागणारच. आता नोकरी कधी लागणार ते पाहू.

महादशा स्वामीची राशी आणि अंतर्दशा स्वामीचे नक्षत्र यातून जेव्हा रविचे गोचर भ्रमण होईल तेव्हा घटना घडेल.

रवीच्या राशी – सिंह
शनीच्या राशी  – मकर व कुंभ.

रवीची नक्षत्रे: कृत्तिका, उत्तर फाल्गुनी व उत्तराषाढा
शानिची नक्षत्रे: पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा

कृत्तिका नक्षत्र – २६ अंश ४० कला ते ३० अंश मेष राशी व ० अंश ते १० अंश पर्यंत वृषभेत.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र – २६ अंश ४० कला ते ३० अंश सिंह राशी व ० अंश ते १० अंश कन्येत.
उत्तराषाढा नक्षत्र – २६ अंश ४० कला त ३० अंश धनु राशी व ० अंश ते १० अंश मकरेत
पुष्य नक्षत्र – ३ अंश २० कला ते १६ अंश ४० कला पर्यंत कर्केत.
अनुराधा: ३ अंश २० कला ते १६ अंश ४० कला पर्यंत वृश्चिकेत.
उत्तराभाद्रपदा : ३ अंश २० कला ते १६ अंश ४० कला पर्यंत मीनेत.

म्हणजे रविचे उत्तराषाढा नक्षत्र व मकर राशीतून भ्रमण घडेल तेव्हा अभयला नोकरी लागलेली असेल. १४ जानेवारी ते २४ जानेवारी या दरम्यान रवी मकरेत उत्तराषाढा नक्षत्रात असताना हि घटना घडेल. म्हणजे अजून ७-८ महिने!!! अभय मेटाकुटीला आला होता. माझं मन सांगत होत शनीच्या अंतर्दशेत नोकरी लागणारच मग शनीची विदशा तरी का अपवाद धरायची? या प्रश्न कुंडलीला शनीची विदशा २९ मे २०१९ पर्यंत होती. पंचांग पहिले असता समजले रवी वृषभेत (शुक्राच्या राशीत) रोहिणी या चंद्राच्या नक्षत्रात होता. शिवाय शुक्रही नक्षत्रस्वामी म्हणून रुलिंग मध्ये होता. म्हणजे रवीने स्वतःचे नक्षत्र पूर्ण भोगून नुकताच चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश केला होता.

मी माझा फलादेश दिला – मे महिन्या अखेर नोकरी लागलेली असेल. व जानेवारी २०२० मध्ये तू नोकरी पुन्हा बदलशील.

आत्ता हा लेख लिहिण्यास कारण म्हणजे, काही वेळा पूर्वीच अभयचा फोन आला होता. नवीन नोकरीवर रुजू होऊन आज त्याला साधारण २ महिने झाले होते. मी विचारले, “ म्हणजे तुला मे महिन्यात नोकरी लागली होती”? तो हो म्हणाला. टू बी प्रिसाईज २८ मे !

मी त्याचे कोरड अभिनंदन केले. अर्थात त्याने हि न्यूज मला तब्बल २ महिन्यांनी दिली म्हणून. काय करणार दुनियेचा नियमच आहे गरज सरो वैद्य मरो!

इथे नियमाबरोबरच निरीक्षण महत्वाचे आहे. घटना घडण्यासाठी रवी चंद्र बरोबरच कारक ग्रहाचे गोचर सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे ठरते. रुलिंग मधले ग्रह सुद्धा महत्वाचे ठरतात. महादशा, अंतर्दशा व विदशा सुद्धा महत्वाच्या ठरतात. नोकरी लागण्यासाठी शनीची अंतर्दशा जर अनुकूल आहे तर शनीची विदशा सुद्धा अनुकूलच असणार म्हणजे नोकरी लागणे हि घटना पुढील १५ दिवसात घडणे अपेक्षित आहे अशावेळी चंद्राचे भ्रमण लक्षात घ्यायला हवे. म्हणजे येत्या १५ दिवसात चंद्र जेव्हा शनीच्या राशीत किंवा नक्षत्रात जाईल तेव्हा घटना घडणे अपेक्षित शिवाय त्याचा नोकरीसारख्या घटनेचा कारक गुरूशी सुद्धा संबंध असणार. पंचांग पाहिले असता समजले २८ मे २०१९ रोजी चंद्र गुरूच्या पूर्व भाद्रपदा नक्षत्रात व शनीच्या कुंभ राशीत होता आणि प्रश्न कुंडलीला सुद्धा शनीची अंतर्दशा व विदशा सुरु होती. 


लेखक : ज्योतिषी श्री. आमोद विष्णू ननावरे, वसई. संपर्क: ७७०९५९४९०२, ८७८८०१३७१४

Sunday, July 21, 2019

ज्योतिष : वैवाहिक समुपदेशन : - तू याच्याशी विवाह करशील तर एक तर विधवा होशील किंवा मरशील!


प्रिया (नाव बदलेले आहे), अत्यंत चिंताग्रस्त अवस्थतेत माझ्या समोर बसली होती. सतत ओढणीशी चाललेला चाळा तिची मनोवस्था अधोरेखित करीत होता. मी मात्र तिच्या कुंडलीत लक्ष घालीत मनातल्या मनात विश्लेषण करीत होतो. जे काही सांगायचे ते तिने सांगितलं होतच. समीर बरोबर असलेले तिचे प्रेमसंबंध विवाहात बदलणार होते. सुखी संसाराची गोड स्वप्न उभयतांनी रंगवली तर होतीच. आता काही दिवसातच तो तिचा आणि ती त्याची होणार होती. And they lived happily together, forever..... आम्ही आपले होतोच दोन्ही मांडवाचे व्हाराडी! "नांदा सौख्यभरे!" असा आशीर्वाद भरभरून द्यायला. बाहेर पावसाचा ताशा वाजत होताच. मी मात्र तिच्या कुंडलीशी चाललेल्या संवादात गर्क होतो. 
दोघांच्याही कुंडलीचे विवाहमेलन मी अष्टकवर्ग तालिकेवरून केलं, १२ पैकी ८ स्थानाचे गुण दोघांच्या बाबतीत चांगले होते. तनु स्थान, धन स्थान, सप्तम आणि व्यय स्थानाचे गुण कमी होते त्यावरून कुंडली जुळत असल्याचा निष्कर्ष मी काढला. तसं मी प्रियाला सांगितलेहि, तरीसुद्धा तिच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर कुठलीतरी अनामिक भीती दिसतच होती. शेवटी तिने मौन सोडले. जर समीरशी विवाह केला तर एक तर ती विधवा होईल किंवा तो विधुर होईल असे भाकीत त्यांच्याबाबतीत एक नव्हे तर दोन ज्योतिषांनी केले होते. अष्टकवर्ग तालिकेत दोघांचेही तनु स्थानाचे गुण कमी होतेच, आता मला दोघांच्याही कुंडली आणखी काळजीपूर्वक पाहणे गरजेचे होते. प्रथम म्हणजे तिच्या कुंडलीत अकाली वैधव्याचे योग्य आहेत का ते पाहणे  व त्याच्या कुंडलीत विधुर होण्याचा किंवा द्विभार्या योग आहे का ते पाहणे महत्वाचे होते. दोघांचीही आयुर्मर्यादा पाहणे गरजेचे होते. कुंडलीत अपघात योग, अपमृत्यु योग आहे का नाही ते पाहणे ओघाने आलेच. मी पुन्हा एकदा कुंडलीतील भाव, राशी , नक्षत्र, भावेश, नक्षत्रस्वामी ,नवमांश, विंशोत्तरी दशा इ तपासणे चालू केले. 
तसे पाहिले तर ९९.९९% कुंडलीमध्ये वैधव्य किंवा विधुरत्व योग हा असतोच, मानव हा मर्त्य आहे म्हणजे दोघांपैकी कोणी न कोणीतरी पहिला जाणारच, पण ४० -४५ वर्षाचे वैवाहिक जीवन जगल्यावर, मुले आपापल्या मार्गात सेटल झाल्यावर वार्धक्यात जर वैधव्य अथवा विधुरत्व येणार असेल तर त्याला नाईलाज आहे. अशी परिस्थिती ऐन तारुण्यात उद्भवली तर कठीणच. तसे कोणाचे होऊ नये पण नशिबात तसेच असेल तर !!!
स्त्रीच्या कुंडलीत वैधव्य योग असताना पतीच्या कुंडलीत अल्पायु योग नसेल तर अशा बाबतीत स्त्रीच्या कुंडलीतील वैधव्य योग निष्प्रभ ठरतो. पाप ग्रह दृष्ट मंगळ जर लग्न स्थानात किंवा चंद्राच्या सप्तमात असेल तर वैधव्य योग निर्माण होतो. सप्तमात अशुभ ग्रह क्रूर नक्षत्रात असेल व ग्रहाच्या दृष्टीत असेल तर वैधव्य योग बनतो. अष्टमात अशुभ ग्रह क्रूर नक्षत्रात, शत्रू राशीत, शत्रू ग्रहाच्या दृष्टीत असेल तर अशी ग्रह स्थिती पतीच्या मृत्यूस कारण ठरू शकते. सप्तमेश व अष्टमेश यांच्यात परिवर्तन योग होत असेल तर वैधव्य येऊ शकते. सप्तमात पाप ग्रहाची राशी असून तेथे शनी असेल तर वैधव्य योग होतो. लग्न व सप्तमात राहू - केतू असून अष्टम वा व्ययात पाप ग्रह असतील तर वैधव्य योग होतो. 
समीरच्या कुंडलीत अल्पायु योग्य आहे का हे पाहणे आवश्यक होते. आयुर्मर्यादा हि एकूण ३ प्रकारे पाहिली जाते. साधारण ३३ ते ३४ वर्षे हे अल्पायु, ३३ ते ५५ -६० वर्षे मध्यायु आणि त्यापुढे दीर्घायु. आयुर्मर्यादा ठरवण्यासाठी मारक व बाधक स्थानांचा विचार करावा. कुंडलीतील २ व ७ हि मारक स्थाने आहेत तर बाधक स्थाने हे लग्न राशी नुसार बदलतात. लग्न राशी जर चर तत्वाची असेल म्हणजे मेष, कर्क, तुला व मकर असेल तर ११ वे स्थान हे बाधक स्थान होते. लग्न राशी जर स्थिर तत्वाची असेल तर म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक व कुंभ असता नवम स्थान बाधक मानले आहे. तसेच मिथुन, कन्या, धनु व मीन या द्विस्वभाव राशींचे लग्न असेल तर सातवे स्थान बाधक मानले आहे. कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आयुर्मर्यादा ठरवण्यासाठी पुढील नियम आहेत. १) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक व बाधक 'दोन्ही' स्थानांचा कार्येश असेल आणि १,५,९,११ यापैकी किमान दोन स्थानांचा कार्येश नसेल तर जातक अल्पायु असतो. अर्थात चर लग्नासाठी ११ वे आणि स्थिर लग्नासाठी नववे स्थान वगळावे. आणखी म्हणजे लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक बाधक स्थानांचा कार्येश होत नसताना तो जर आयुष्यवर्धक अशा १,५,९,११ या स्थानांचा देखील कार्येश होत नसेल तरी जातक अल्पायुषी असतो. २) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक किंवा बाधक या पैकी कोणत्याही भावांचा कार्येश नसेल किंवा फक्त मारक व बाधक यापैकी एका भावाचा कार्येश असेल त्याचबरोबर आयुष्य मर्यादा वाढविणाऱ्या किमान २ भावांचा कार्येश असेल तर अशी व्यक्ती दीर्घायु असते. ३) जर लग्न स्थानाचा उपनक्षत्रस्वामी मारक व बाधक या दोन्ही स्थानाचा कार्येश असेल त्याच बरोबर आयुष्यवर्धक अशा २ किंवा त्यापेक्षा जास्त स्थानांचा कार्येश असेल तर व्यक्ती मध्यायु असेल. अशाप्रकारे  एकदा आयुष्य मर्यादा निश्चित केल्यानंतर त्या काळात येणाऱ्या महादशा स्वामींचा अभ्यास करावा. जो महादशा स्वामी मारक व बाधक दोन्ही स्थानांचा कार्येश होतो त्या महादशेत मृत्यू होतो. एकापेक्षा जास्त महादशा स्वामी मारक व बाधक दोन्ही भावांचे कार्येश होत असतील तर रुलिंग प्लॅनेटचा आधार घ्यावा. गुरुवर्य कृष्णमूर्ती यांच्यामते अष्टम भावारंभाचे सह अधिपती म्हणजे अष्टम भाव ज्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात असतो त्यांच्या महादशा, अंतर्दशा, विदशा असतानाच कालखंड धोकादायक असतो. दुसरे असे कि अष्टमेश ज्या राशीत, नक्षत्रात व उपनक्षत्रात असतो त्या अधिपती ग्रहाची महादशा, अंतर्दशा, विदशा धोका दायक होतो. त्यातून हे स्वामी ग्रह अशुभ स्थानी किंवा क्रूर नक्षत्रात असतील तर अनैसर्गिक वा आकस्मिक मृत्यू होतो. हाच विचार वैधव्य योग पाहण्यासाठी पत्नीच्या कुंडलीत सप्तमाच्या उपनक्षत्र स्वामींच्या बाबतीत करायचा.

प्रियाच्या कुंडलीत लग्न स्थानी तुला राशी येते म्हणजे २, ७ हि स्थाने मारक व ११ वे स्थान हे बाधक झाले. प्रियाचा लग्न स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा चंद्र आहे. चंद्र हा मंगळाच्या चित्रा नक्षत्रात आहे. चित्रा हे उग्र प्रवृत्तीचे नक्षत्र आहे. चंद्राचा उपनक्षत्र स्वामी बुद्ध आहे. बुद्ध राहूच्या नक्षत्रात आहे. म्हणजे चंद्र, मंगळ, बुद्ध व राहू यांचे कार्येशत्व पाहायचे ते खालील प्रमाणे.

चंद्र - १०, १२, ७, २
नक्षत्र स्वामी मंगळ - ५, १०, ४, २, ७
उप नक्षत्र स्वामी बुध - १, ९, १२
बुधाचा नक्षत्र स्वामी  राहू - १, ७ ,८

ग्रहांचे कार्येश भाव पाहिले तर कुठेही ११ वे बाधक स्थान कार्येश झालेले नाही. १,५,९ हि आयुष्य वर्धक स्थाने कार्येश झालेली दिसतात म्हणजे प्रियाचे आयुष्यमान हे दीर्घायु या गटात मोडते.

आता तिच्या सप्तम स्थानाचा विचार करूया..

सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी - राहू हा गुरूच्या नक्षत्रात असून त्याचा उपनक्षत्रस्वामी शनी आहे. शनीचा नक्षत्रस्वामी राहूच आहे.

राहू, गुरु व शनी पुढील प्रमाणे कार्येश होतात
राहू - १, ३, ६, ८
गुरु - १, ३, ६
शनी - १, ५ , ४

वरील कार्येश ग्रहांचा विचार करता कुठेही मारक बाधक स्थान कार्येश झालेले दिसत नाही पण १,६,३, ८ हि सर्व विवाह विरोधी स्थान कार्येश झालेली दिसतात. तृतीय स्थान तर कायदेशीर विवाह विच्छेद दर्शवते पण प्रियाच्या पुढील दशा स्वामींचा विचार केला तर सध्या २०३१ पर्यंत गुरूचीच महादशा सुरु असून त्यापुढे शनीची महादशा चालू होईल. गुरु व राहू हे तुला या विषम राशीत २२ अंशावर आहेत म्हणजे वृद्धावस्थेत आहेत म्हणजे त्यापासून मिळणारी अशुभ फळे नगण्यच मिळतील. घटस्फोट निश्चितच नाही होणार , फार तर दुरावा तोही तत्कालीन संभवतो. म्हणजे चिंता नॉट. चंद्राच्या सप्तमात केतू सारखा पाप ग्रह आहे. केतू २२ अंशावर आहे म्हणजे वृद्धच. शुक्रही स्वराशीचा वृद्ध अवस्थेत. या सर्वच परिपाक म्हणजे वैधव्य नाही. घटस्फोट नाही.

आता समीरची कुंडली पाहूया..
समीरची लग्न राशी वृश्चिक आहे म्हणजे नवम स्थान हे बाधक झाले व २,७ हि स्थाने मारक झाली.
समीरच्या कुंडलीत लग्नस्थानाचा उपनक्षत्रस्वामी शनी हा राहूच्या नक्षत्रात असून त्याचा उपनक्षत्रस्वामी बुद्ध आहे. बुद्ध राहूंच्याच नक्षत्रात आहे. तर हे आपले  खेळाडू खालील प्रमाणे कार्येश होतात

शनी - ११, ३
राहू - ११,२,४,६,७
बुद्ध - ११,८, १०

वरील जंत्री पाहिली तर काय दिसते बाधक स्थान कुठेही कार्येश झालेले नाही. उलट आयुष्यवर्धक ११ वे स्थान कार्येश झालेले आहे. म्हणजे समीर दीर्घायु या गटात आला. समीरच्या कुंडलीत चंद्र मारक व बाधक दोन्ही स्थानांचा कार्येश झालेला आहे - ११,९,६,७ आणि चंद्राच्या महादशेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याचा अपघातही झाला होता त्यातून तो वाचला. आता एवढा सर्व उहापोह करून झाल्यानंतर मी प्रियाला निक्षून सांगितले , चिंता नॉट ! दोनच शब्द. - नांदा सौख्यभरे. पण मनात एक गोष्ट आलीच एवढ्या २-२ ज्योतिषांना असे काय दिसले कि एवढा निगेटिव्ह फलादेश द्यावा? प्रियाचे दोन्ही हाताचे ठसे घेतले आणि माझे स्नेही हस्त सामुद्रिक शास्त्राचा गाढा  व्यासंग असलेले श्री हेमंतजी रणनवरे यांना संपर्क केला. त्यांनी तिचे हात पाहून १० मिनिटात सांगितले. गो अहेड !! मग मी पण तिला म्हणालो, पहा २-२ ज्योतिषी सांगतायत - तू याच्याशी विवाह करशील तर एक तर विधवा होशील किंवा मरशील! हे साफ चुकीचे आहे!



ज्योतिषी - श्री. आमोद ननावरे (वसई) - ७७०९५९४९०२, ८७८८१३७१४
ज्योतिषी - श्री, हेमंत रणनवरे (नाशिक) - ७७२००६६६१८, ९६३७३२३०४१


जातक : महिला - प्रिया (नाव बदललेले) - ०६/१०/१९९४ स. ०७:४५ नाशिक.
जातक : पुरुष - समीर (नाव बदललेले) - ०३/१०/१९९४ स. ११:५० मुंबई.

प्रस्थापितांनी आणि नवोदितांनी जरूर आपल्या कमेंट व सूचना कराव्यात! स्वागतच आहे.




Sunday, June 30, 2019

ज्योतिष : करिअर कौन्सेलिंग - ऑटोमोबाईल इंजिनीअर




चि. गणेश १२ वी ला उत्तम गुण मिळवून पास झाला. करिअर कौन्सेलिंग प्रमाणे इन्जिनिअरिन्ग ला प्रवेश मिळवायचा हे ठरलंच होत पण पुढे काय? लाखो रुपये खर्च करून शिक्षण व्यवस्थित पूर्ण होईल का? इन्जिनिअरिन्ग ची कुठली फिल्ड निवडायची? हे प्रश्न तर होतेच. भविष्यात डोकावून बघायला काय हरकत होती? त्याच्या बाबांनी मला फोन केला. सगळी परिस्थिती सांगितली. गणेशची इच्छा ऑटोमोबाईल करायची होती. मी म्हटलं ग्रहमान बघूया कसं आहे.
गणेशची जन्मतारीख २८-११-२००१ सकाळी वेळ ०५:०५ मिनिटे आणि ठिकाण बोरीवली – मुंबई अशी माहिती त्याच्या बाबांनी दिली. करिअर म्हणजे शिक्षण आणि नोकरी हे दोन महत्वाचे कालखंड. साधारण वयाच्या २५ पर्यंत शिक्षण आणि पुढे ४० वर्षे करिअर. या संबंधी निर्णय घ्यायचा म्हटले तर इथून पुढे येणाऱ्या वय वर्ष ६० पर्यंतचे दशास्वामी कसे कार्येश होतात ते पाहणे आलेच. शिक्षणाचा विचार हा चतुर्थ स्थानाच्या उपनक्षत्रस्वामी वरून करायचा तर गणेशच्या कुंडलीत चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी शनी होता. पण...... जेव्हा हि कुंडली मी ३०/०६/२००६ रविवारी सकाळी १०:५२ ला वसई येथे पाहत होतो तेव्हाचे रुलिंगमध्ये लग्न स्वामी म्हणून रवी, रवीच्या युतीत राहू, नक्षत्रस्वामी म्हणून चंद्र, राशी स्वामी म्हणून शुक्र आणि वाराचा स्वामी म्हणून रवी होते. म्हणजे शनी रुलिंग मध्ये नव्हता. याचा अर्थ गणेशची जन्म वेळ चुकली होती. म्हणजे शनीच्या ऐवजी उपनक्षत्र स्वामी दुसरा ग्रह निश्चित करणे महत्वाचे होते. चतुर्थ स्थान मकरेत १३ अंश ३४ कला वर होते. शनीच्या लगतचे उपनक्षत्र स्वामी बुध. शुक्र, केतू, गुरु, राहू व मंगळ होते. त्यापैकी राहू निश्चित केला कारण कृष्णमुर्ती पद्धतीत राहू केतू हे नेहमीच बलवान असतात. शिवाय राहू हा लग्न स्वामी रवीच्या युतीत म्हणजे गणेशची जन्म वेळ साधारण १५ मिनिटांनी चुकली होती. आता उप उप नक्षत्र स्वामी निश्चित करायचा म्हणजे रवीचा विचार करायला हवा कारण रवी हा रुलिंग मध्ये लग्न स्वामी म्हणून उपस्थित आहे. त्याप्रमाणे गणेशची जन्मवेळ सकाळी ४:५० अशी निश्चित केली.

आता चतुर्थाचा उपनक्षत्र स्वामी राहू कोणत्या भावांचा कार्येश होतो ते पाहिले.
राहू नवम भावात आहे. त्याचा राशी स्वामी बुध द्वितीय भावात असून बुधाच्या राशी नवम व व्यय भावात आहेत. राहूची कुठल्याही ग्रहाबरोबर युती नाही. राहूवर कुठल्याही ग्रहाची दृष्टी नाही. बुधाचा नक्षत्रस्वामी शनी अष्टमात असून त्याच्या राशी चतुर्थ व पंचम भावात आहेत. बुधाची अष्टम भावावर दृष्टी आहे.
अशाप्रकारे राहू पुढील भावांचा कार्येश होतो. – राहू : - २, १२, ९, , , ५.

राहू मंगळाच्या नक्षत्रात असून मंगळ ४,७,२ भावांचा कार्येश होतो. राहूचा उपनक्षत्र स्वामी शुक्र २,१, स्थानाचा कार्येश होतो. शुक्राचा नक्षत्र स्वामी गुरु ९,६,३ स्थानाचा कार्येश होतो.

आता पुढील महादशा कशा कार्येश होतात ते पहायचे. ची. गणेशच्या २०२५ पर्यंत शुक्र, २०३१ पर्यंत रवी, २०४१ पर्यंत चंद्र, २०४८ पर्यंत मंगळ व २०६६ पर्यंत राहूची महादशा असेल.

 राहू पुढील प्रमाणे कार्येश होतो.

राहू - २, १२, ९, , , ५.
न. स्वा. मंगळ - , ७, २.
उ.न.स्वा. शुक्र – २, , .
शुक्राचा न. स्वा गुरु ९, ६, ३

शुक्र पुढील प्रमाणे कार्येश होतो.

शुक्र – ९, , ३, ६,
न.स्वा. गुरु – ९, ३, ६
उ. न. स्वा. मंगळ, ७, २
मंगळाचा न. स्वा मंगल म्हणून त्याचा उ. न. स्वा शनी -  ६, , १०, ५,

रवी पुढील प्रमाणे कार्येश होतो.

रवी – , , , ५, ११
न. स्वा. शनी – ६, , १०, ५,
उ. न. स्वा. चंद्र – २, ६, १०
चंद्राचा न. स्वा केतू  - २, ३, ६, ९

चंद्र पुढील प्रमाणे कार्येश होतो.

चंद्र – २, ६, १०
न. स्वा. केतू – २, ३, ६, ९
उ. न. स्वा. राहू –  २, १२, ९, , , ५.
राहूचा न. स्वा मंगळ, ७, २

मंगळ पुढील प्रमाणे कार्येश होतो.

मंगळ, ७, २
मंगल स्व नक्षत्रात म्हणून त्याचा उप नक्षत्र स्वामी शनी - ६, , १०, ५,
उ. न. स्वा. शनी - ६, , १०, ५,
शनीचा न. स्वा. चंद्र - २, ६, १०


वरील जंत्रीच विचार केला तर शुक्र, शनी व मंगळाची उपस्थिती उल्लेखनीय आहे. तसेच अष्टम स्थान वारंवार नजरेसमोर येते. शनी लोखंडाचा कारक. शुक्र – सौंदर्य, वाहनसुख व नाविन्याचा कारक. मंगळ वाहनाचा कारक आणि अष्टम स्थान म्हणजे तंत्रविज्ञान अर्थात इन्जिनिअरिन्ग. ऑटोमोबाईल इन्जिनिअरिन्ग.

चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्रस्वामी चतुर्थ स्थानाचा सुद्धा कार्येश होतोय याचा अर्थ शिक्षण व्यवस्थित पूर्ण होईल. पुढे महादश स्वामी २, ६, व १० वे स्थानाचे हि कार्येश होतात म्हणजे या क्षेत्रातून पुढे अर्थार्जन देखील होईल. आत्तापर्यंत माझा निर्णय झाला होता.... पठ्ठ्या विन्जिनिअर व्हनारच !!!
डायरेक्ट त्याच्या बाबांना फोन लावला ...........................