सौ. सावंत काकूंनी दिलेली गोळी घेऊन दिनू तडक निघाला. पावणे दहा वाजले होते. उन्हात बसची वाट पाहत न राहता त्याने सरळ रिक्षा घेतली. अंगात अजूनही अशक्त पणा होता. कणकण होती. रिक्षाने दिनू १० मिनिटातच बोरिवलीला आला. ब्रिजवर चढून १ किंवा २ नंबरला जाण्याचे त्याच्यात त्राणच नव्हत. रेल्वे लाईन क्रॉस तो लवकर पोचणार होताना. दिनू चालतच रेल्वे लाईन पाशी पोहोचला. आणि अचानक त्याला भोवळ आली. आजूबाजूला काय चाललय त्याला काहीच काळात नव्हत. रेल्वे लाईन क्रॉस करताना दोन्ह्ही बाजूनी ट्रेन येते कि नाही हे पाहण्याची सुद्धा त्याला शुद्ध राहिली नव्हती. क्षणार्धातच त्याची शुद्ध हरपली. त्याला कोणीतरी पाठी खेचल्यासारखा भास झाला. अंधार पूर्ण अंधार. डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हत. श्वास लागला होता. हातापायातलं त्राण निघून गेले होत. आणि त्याने जाग्यावरच बसकण मांडली. काही मिनिटे गेली असावीत. त्याने डोळे उघडले. समोर पाहतो तो काय, रेल्वे लाईनच्या जवळच तो अगदी २ फुटावर बसला होता. समोरून लोकल ट्रेन धडधडत निघून जात होती. जरा जरी पुढे गेला असता तर सरळ ठारच झाला असता. घामाने अंग भजून गेलं होत. घशाला कोरड पडली होती. रस्त्यावरचा सरबत वाला धावत त्याच्या जवळ आला. त्याने त्याला सावरलं. थंड सरबत प्यायला दिलं. जवळच्या साई बाबांच्या मंदिरात तो त्याला घेऊन गेला. सव्वा दहा वाजले होते. थोड बरं वाटल्यावर त्याने सरबत वाल्याचे आभार मानले. पण त्याला ह्या गोष्टीचे आश्चर्य वाटत होते. गेले दहा दिवस तो त्याच वाटेने येत जात होता, इतके दिवस तो सरबत वाला त्याला दिसला नव्हता. कसाबसा तो २ नंबर वर आला. चर्चगेट स्लो लागलीच होती. अजूनही अशक्तपणा वाटतच होता. जिवावरच्या प्रसंगातून तो वाचला होता. अंगावर कट येणारा तो क्षण. "दिनू. ए दिनू!!" कोणीतरी त्यालाच हाक मारत होते."अरेच्च्या! सिद्ध्येश? " " हा इथे कुठे?" दिनूच्या मनात स्वाभाविक प्रश्न आला. सिद्ध्येश तर राहतो मालाडला. मग हा बोरिवलीत कसा? एकूणच दिनूचा अवतार बघून सिद्ध्येश्च्या लक्षात आले. दिनू आजारीच होता आणि तसा दिसतही होता. त्यांचे पूर्ण अंग थरथरत होते. सिद्ध्येशने त्याला सावरलं.
"अरे यार किती ताप आहे तुला?"
"आणि फोन तरी करायचास तुला कंपनी दिली असती मी."
"तसाही मी कालपासून बोरिवलीत माझ्या मावशी कडे होतो."
"मावशीचे मिस्टर काल ऑफिसच्या कामाने बंगलोरला गेलेना, आईने सांगितले सोबत म्हणून जा."
"एनीवे, तू काही काळजी करू नकोस जाऊ आपण दोघे. मी तुला सोबत करतो क्लासरूम पर्यंत. मग येताना तुला घरी सोडेन आणि मग जाईन मावशीकडे."
दिनूला जास्त बोलायचं देखील त्राण नव्हतं. कसबसं दोघे अंधेरीला आले. रिक्षानेच कॉलेजला पोहोचले. दिनूने पेपर याथातथा दिला. पेपर झाल्यावर सिध्येशने त्याला घरी सोडलं.
काही दिवसांनी रिझल्ट लागला. दिनूला ७६% मिळाले होते. त्याने सिध्येशला फोन केला. सिध्येशहि चागल्या मार्क्सनी पास झाला होता. दिनूने त्याचे आभार मानले.
"सिध्येश, मित्रा त्यादिवशी तू बरोबर नसतास तर मी कोलेजला जाऊन पेपर नसतो देऊ शकलो. "
"काय बोलतोयस काय तू?"
"मी कुठे होतो त्या दिवशी"
सिध्येश आश्चर्याने म्हणाला.
"म्हणजे काय?"
" तू तर मावशी कडे बोरिवलीला आला होतास ना?"
"मावशीचे मिस्टर बंगलोरला गेले म्हणून?"
"तुझा काहीतरी गैरसमज होतोय"
सिध्येशने दिनूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
"अच्छा, चल ते सोड, मी चाललोय आई बाबांबरोबर १५ दिवस हिमाचलला.आल्यानंतर भेटू बाय".
त्यादिवशी संध्याकाळी दिनू पुन्हा बोरिवलीला जाऊन आला, तो सरबत वालाही तिथे नव्हता.
दिनूने बाबांना हि सर्व हकीगत सांगितली. बाबाही त्यादिवशी जोशिकाकांकडे गेले त्या दिवशी जोशी काका सुद्धा आजारी असल्याने बाबांना तिथे जास्त वेळ थांबावे लागले होते.
दिनूने हे सर्व सांगताना बाबांना गहिवरून आलं. अंगावर रोमांच उभं राहिलं. कंठ दाटून आला. बाबांचे थरथरते हात दिनूच्या डोक्यावर होते. डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. दिनूला समजेना काय चालले आहे. आईही सद्गदित झाली. हातातल्या पदराने तिने डोळे पुसले. प्रेमावेगाने दिनूला जवळ ओढले.
"ऐकलस का गं? देव्हार्यात महाराजांसमोर साखर ठेव".
"आज आपला पोरगा त्यांनी मरणाच्या दारातून परत आणला"
" दिनू! अरे तो सरबतवाला नव्हता, ते महाराज होते रे बाळा."
"तो सिध्येश नव्हता, महाराज होते.... महाराज होते "
भावावस्थेत गेलेल्या त्या पित्याने हळूच आपले डोळे पुसले.
आईने मायेने दिनूला आणखी जवळ घट्ट धरले. दिनूला हि कळून चुकले होते.
ते महाराज होते. महाराजच होते.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
"अरे यार किती ताप आहे तुला?"
"आणि फोन तरी करायचास तुला कंपनी दिली असती मी."
"तसाही मी कालपासून बोरिवलीत माझ्या मावशी कडे होतो."
"मावशीचे मिस्टर काल ऑफिसच्या कामाने बंगलोरला गेलेना, आईने सांगितले सोबत म्हणून जा."
"एनीवे, तू काही काळजी करू नकोस जाऊ आपण दोघे. मी तुला सोबत करतो क्लासरूम पर्यंत. मग येताना तुला घरी सोडेन आणि मग जाईन मावशीकडे."
दिनूला जास्त बोलायचं देखील त्राण नव्हतं. कसबसं दोघे अंधेरीला आले. रिक्षानेच कॉलेजला पोहोचले. दिनूने पेपर याथातथा दिला. पेपर झाल्यावर सिध्येशने त्याला घरी सोडलं.
काही दिवसांनी रिझल्ट लागला. दिनूला ७६% मिळाले होते. त्याने सिध्येशला फोन केला. सिध्येशहि चागल्या मार्क्सनी पास झाला होता. दिनूने त्याचे आभार मानले.
"सिध्येश, मित्रा त्यादिवशी तू बरोबर नसतास तर मी कोलेजला जाऊन पेपर नसतो देऊ शकलो. "
"काय बोलतोयस काय तू?"
"मी कुठे होतो त्या दिवशी"
सिध्येश आश्चर्याने म्हणाला.
"म्हणजे काय?"
" तू तर मावशी कडे बोरिवलीला आला होतास ना?"
"मावशीचे मिस्टर बंगलोरला गेले म्हणून?"
"तुझा काहीतरी गैरसमज होतोय"
सिध्येशने दिनूला खूप समजावण्याचा प्रयत्न केला.
"अच्छा, चल ते सोड, मी चाललोय आई बाबांबरोबर १५ दिवस हिमाचलला.आल्यानंतर भेटू बाय".
त्यादिवशी संध्याकाळी दिनू पुन्हा बोरिवलीला जाऊन आला, तो सरबत वालाही तिथे नव्हता.
दिनूने बाबांना हि सर्व हकीगत सांगितली. बाबाही त्यादिवशी जोशिकाकांकडे गेले त्या दिवशी जोशी काका सुद्धा आजारी असल्याने बाबांना तिथे जास्त वेळ थांबावे लागले होते.
दिनूने हे सर्व सांगताना बाबांना गहिवरून आलं. अंगावर रोमांच उभं राहिलं. कंठ दाटून आला. बाबांचे थरथरते हात दिनूच्या डोक्यावर होते. डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. दिनूला समजेना काय चालले आहे. आईही सद्गदित झाली. हातातल्या पदराने तिने डोळे पुसले. प्रेमावेगाने दिनूला जवळ ओढले.
"ऐकलस का गं? देव्हार्यात महाराजांसमोर साखर ठेव".
"आज आपला पोरगा त्यांनी मरणाच्या दारातून परत आणला"
" दिनू! अरे तो सरबतवाला नव्हता, ते महाराज होते रे बाळा."
"तो सिध्येश नव्हता, महाराज होते.... महाराज होते "
भावावस्थेत गेलेल्या त्या पित्याने हळूच आपले डोळे पुसले.
आईने मायेने दिनूला आणखी जवळ घट्ट धरले. दिनूला हि कळून चुकले होते.
ते महाराज होते. महाराजच होते.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आमोद, खुप छान कथा । keep it up.
ReplyDeleteआमोद, खुप छान कथा । keep it up.
ReplyDeleteNIce..
ReplyDelete